मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते. ह्यातून बाहेर पडण्याचा राजमार्ग म्हणजे ओंकार जप, प्रार्थना, कल्पनाचित्रण इत्यादींच्या उपयोगाने मन एकाग्र करण्याची किमया साधणे. ह्यालाच 'ध्यानधारणा' म्हणतात. बहिणाबाई चौधरींनी मनाचे खूपच सुंदर वर्णन करून ठेवलेले आहे. त्या म्हणतातः
मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर । किती हाकला, हाकला फिरी येत पिकावर ॥
परदेशी कुरिअर करता येण्यासारख्या/ मागवता येण्यासारख्या वस्तू
वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या नियमांप्रमाणे काही गोष्टी/ वस्तू पार्सल केलेल्या चालत नाहीत. त्याबद्दल इथे चर्चा व्हावी अशी अपेक्षा.
स्वतःसाठी म्हणून मी हा धागा आधीच सुरु करणार होते. पण काही कारणामुळे नाही केला. आत्ता एका आयडीने विचारलेल्या प्रश्नामुळे मात्र सुरु करते धागा. योग्य माहिती मिळेल अशी खात्री आहे.
योगसाधनाः पतंजलि मुनींनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी अशा अंगांनी युक्त असा अष्टांगयोग (चित्तवृत्तीनिरोध) सांगितलेला आहे. महर्षी पतंजलि प्रणित अष्टांग योग, हा जीवन जगण्याचा असा मार्ग आहे, ज्यावरून जगातील प्रत्येक माणूस निर्भय होऊन, पूर्ण स्वातंत्र्याने चालू शकेल. जीवनात पूर्ण सुख, शांती व आनंद प्राप्त करू शकेल आणि इतर सर्वही लोक जरी तसेच करू लागले तरीही, परस्परांत कुठलेही अंतर्द्वंद्व उद्भवणार नाही.
गेल्या आठवड्यात माझा नवरा ताप, कॉन्स्टिपेशन आणि पित्त, घशाला इन्फेक्शन अशा त्रासाने आजारी पडला. २-३ रात्री सलग जागरण (पहाटेपर्यंत) करून केलेलं ऑफिसवर्क, सतत बदलणारी हवा, जेवणाच्या थोड्या बदललेल्या वेळा...
ऑफिसमधे गुरुवारी सकाळपासून अखंड उचकी, त्यामुळी जास्ती प्यायलं गेलेलं पाणी, मग भूक न लागणं आणि सन्ध्याकाळपर्यंत घसा खवखवणं, थोडी कणकण असं सगळं सुरु होऊन तो घरी आला तेव्हा प्रचंड थकलेला दिसत होता. शुक्रवारपासून तापच आला.
मग औषधं वगैरे होतीच, पण या काळात त्याला योग्य जेवण देणं महत्त्वाचं होतं. पित्तामुळे थोडं फिकं, घशाला आराम पडेल असं लिक्विड जास्त, आणि कॉन्स्टिपेशन वर उपाय होईल असं...
प्रस्तावना: वयपरत्वे येणार्या अवनतीकारक रोगांची आणि त्याच्या उपायांचीही अवस्था 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' अशी आहे. आज ना त्या रोगांविषयी पुरेशी जाग आहे, ना त्यांवरील उपायांविषयी. मात्र त्यांचा मुकाबला करण्याकरता 'सम्यक जीवनशैली परिवर्तना’ची आवश्यकता भासते. याचा अर्थ काय आहे ते समजून, ह्या लेखाच्या आधारे 'सम्यक जीवनशैली परिवर्तनास' सामान्यजनांनी सिद्ध व्हावे, कर्मठपणे ते आचरावे आणि हृदयरोगच नव्हे तर इतरही अवनतीकारक रोगांना आपल्यापासून दूरच ठेवण्यात यश मिळवावे अशी माझी अपेक्षा आहे. सम्यक जीवन शैली अंतर्गत ’आहार’ या घटकाचा विचार या लेखात करायचा आहे.
श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये. व्यक्तीपरत्वे वैद्यकीय चिकित्सा करवून घेऊनच उपचार घ्यावेत. हा लेख औषधोपचार अथवा आहारविषयक मार्गदर्शक सल्ला देणारा लेख नाही. माझी तशी वैद्यकीय पात्रता नाही. हे लेख ही माझीच अभिव्यक्ती आहे. इथे व्यक्त झालेली माहीती ही कुठल्याही पुस्तकाचे आधारे लिहावी असे प्रयोजन नाही. हे संदर्भलेखन नाही.
श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये. व्यक्तीपरत्वे वैद्यकीय चिकित्सा करवून घेऊनच उपचार घ्यावेत. हा लेख औषधोपचार अथवा आहार विषयक मार्गदर्शक सल्ला देणारा लेख नाही. माझी तशी वैद्यकीय पात्रता नाही. हे लेख ही माझीच अभिव्यक्ती आहे. इथे व्यक्त झालेली माहीती ही कुठल्याही पुस्तकाचे आधारे लिहावी असे प्रयोजन नाही. हे संदर्भलेखन नाही.
समाधिननेन समस्तवासना ग्रन्थेर्विनाशोऽखिलकर्मनाशः |
अन्तर्बहि: सर्वत एव सर्वदा स्वरूपविस्फूर्तिरयत्नतः स्यात् || विवेक चूडामणि ३६४
या निर्विकल्प समाधीच्या योगाने, अंतःकरणांतील सर्व वासनारूप ग्रंथींचा नाश होतो आणि त्यापासून निर्माण होणार्या कर्माचा पूर्ण क्षय होतो. असे झाले म्हणजे, आत आणि बाहेर, दोन्ही प्रसंगी स्व-स्वरूपाचे स्फुरण सर्वदा प्रयत्न केल्यावाचून सहजपणे होऊ लागते.
॥ चतुर्थः कैवल्यपादः ॥
चवथा मोक्ष पाद सुरू होत आहे.
१. जन्मौषधिमन्त्रतपःसमाधिजाः सिद्धयः ।
विशिष्ट जन्म, दिव्य औषधी, भिन्न देवतांचे मंत्र, तपःसामर्थ्य आणि समाधी अशा पाचांपासून सिद्धी प्रकट होत असतात.
अनंतशक्तिरैश्वर्यं निष्यन्दाश्चाणिमादय: ।
स्वस्येश्वरत्वे संसिद्धे सिध्यन्ति स्वयमेव हि ॥
पुष्पमानया गन्धो विनेच्छामनुभूतये ।
पूर्णाहम्भावयुक्तेन परिच्छिन्ना विभूतय ॥ - मानसोल्लास:
पुष्प आणत असतांना त्यातील गंध यदृच्छया अनुभूतीला येतो तद्वत्, ज्याचा अहंभाव पूर्णत: नष्ट झालेला आहे अशा, स्वत:मधील ईश्वरत्वाने मोक्ष प्राप्त झालेल्या योग्याला अनंत शक्ती आणि ऐश्वर्य यांचा परिणाम असणार्या अणिमा इत्यादी सिद्धी स्वत:हूनच प्राप्त होतात.
॥ तृतीयो विभूतिपादः ॥
तिसरा चतकोर. विभूतीपाद. विभूती म्हणजे सिद्धी.