आयुष्याचा नेमका अर्थ काय असतो...?
शब्दकोशातील एक किरकोळ शब्द असतो,
का जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास असतो...
की एक एक क्षण जगण्याचा हव्यास असतो...!
आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं
रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं
शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्म असतं
मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं
होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,
कुठलंच पान कधी गाळायच नसतं,
चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं.
आयुष्य हा एका शाळेतून जाणारा मार्ग असतो,
तिथे प्रत्येकासाठीच एक स्वतंत्र वर्ग असतो.
आयुष्याचा हा रस्ता कधीच सरळ नसतो,
थोड्या वेगळ्या वृत्तामधला एक प्रयत्न
टाळतो किती मी त्यांचा ससेमिरा पण, सायास फोल आहे
तीच तीच नाती भेटायचीच कारण... आयुष्य गोल आहे
टाकले खडे मी नाना प्रकारचे पण, उपयोग शून्य झाला
समजले अखेरी... रांजण तुझ्या मनाचा भलताच खोल आहे
रोजच्या झळांनी गेली सुकून स्वप्ने, गेलेत खोल डोळे
त्यामुळे खरे तर डोळ्यांमधे जराशी अद्याप ओल आहे
शेवटी मिळाली... फुटकळ जुनीच दु:खे, किरकोळ जून जखमा
पुण्यसंचयाचे देवा तुझ्या दुकानी इतकेच मोल आहे?
दर्शनास डोळे आतूरले कधीचे... पण पालखी दिसेना
वीज अन ढगांचा नुसताच आसमंती ताशा नि ढोल आहे
घेउनी भरारी... आव्हान अंबराला देशीलही मना पण
आयुष्य
आयुष्य ही मजा आहे ... ... ती लुट्णा-यांना
आयुष्य ही सजा आहे ... ... ती भोगणा-यांना
आयुष्य हे व्यर्थ आहे ... ... ते अनर्थ जगणा-यांना
आयुष्य हे रूक्ष आहे ... ... त्यात रस न घेणा-यांना
आयुष्य हा खेळ आहे ... ... त्यात रमून खेळणा-यांना
आयुष्य हा रंगमंच आहे ..... त्याकडे एक भूमिका म्हणून पाहणा-यांना
आयुष्य ही कथा आहे ... ... तिच्याकडे गोष्ट म्हणून पहाणा-यांना
आयुष्य ही व्यथा आहे ... ... दु:खात बुडलेल्या जीवांना
आयुष्य हे अंतर आहे ... जन्म आणि मृत्यु मधील ... तत्ववेत्त्यांना
आयुष्य आही एक संधी आहे ... ... तिचा उपयोग करणा-यांना
आयुष्यात थोडं वेगळं,जगता आलं पाहीजे
आहे त्यात थोडं वेगळं बघता आलं पाहीजे
सूर्य तर रोज उगवतो,आम्ही त्याला रोज बघतो
असं म्हणून कसं चालेलं?
प्रकाशाचं देणं तसं देता आलं पाहीजे
आयुष्यात.......................
पहाटेच्या पुजेसाठी, वेणीतल्या गजर्यासाठी
काय तेवढी फुले फुलतात ?
मातीतले गंधगाणे गाता आले पाहीजे
आयुष्यात.........
नेमेची येतो पावसाळा,तेच पाणी तोच चिखल
येवढाच फक्त नको खल.
मऊ मुलायम श्रावण सरीत भिजता आलं पाहीजे
आयुष्यात........
घरची आणि शेजारची काय, मुलं म्हणजे पोरं टोरं?
ते खरे तर गोकुळचे चोर
पेंद्या सुदामा होऊन त्यांच्यात खेळता आलं पाहीजे