तपता अंबर, तपती धरती,
तपता रे जगती का कण-कण!
त्रस्त विरल सूखे खेतों पर
बरस रही है ज्वाला भारी,
चक्रवात, लू गरम-गरम से
झुलस रही है क्यारी-क्यारी,
चमक रहा सविता के फैले प्रकाश से व्योम-अवनि-आँगन!
डॉ. महेंद्र भटनागर...
या जगातील आद्य कवि असे नक्की कुणाला म्हणता येईल देवच जाणे. पण ज्याने कोणी पहिली कविता लिहीली असेल त्याचे खरोखर प्रचंड उपकार मानले पाहिजेत. प्रसंग, घटना कितीही त्रासदायक असो तिचा दाह कमी करण्याची ताकद कवितेत आहे, असते.
बेवारस व्याकूळ अश्व धावतो रणी
घायाळ होऊनी पडला ज्याचा धनी
ग्रीष्मात वाहतो वारा तसाच अगदी
भूवरी पेटता तप्त उन्हाची धूनी....
पात्रात नद्यांच्या ओल जराही नाही
वाळूची होते तीरावर का लाही
वादळी भोवरा आकाशी उडताना
क्षितिजावर दिसती लोळ झळांचे काही....
झाडांवर उघड्या चिटपाखरू नसते
निवडूंग एकटे थोडे हिरवे असते
कोरड्या जिव्हेची पाने खरवडताना
खोडातुन नुसते रक्त झिरपले दिसते..
सांगाडे निजले खडकांवरती विखरून
तेथेच व्हिवळतो प्राणी जखमा विसरून
डोक्यावर घिरट्या घालत क्षुब्ध गिधाडे
घेतात भरारी पंख हवेवर पसरुन.....
वाळक्या वनातुन शीळ अघोरी उठते
सोडून उसासा पोकळ फ़ांदी तुटते