प्रशासन
तडका - जनतेच्या भावना
तडका - शेतकरी,...
तडका - आमचा सल्ला
पर्यावरण म्हणजे काय रे भाऊ?
मायबोलीवर गेल्या काही दिवसांत पर्यावरण ह्या विषयाशी संबंधीत दोन धागे निघाले आणि त्या दोन्ही धाग्यांवरील चर्चेतून बरेच चांगले आणि महत्वपूर्ण मुद्दे समोर आले. मात्र ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. पर्यावरणस्नेही जीवनशैलीच्या धाग्यावर प्रामुख्याने पर्यावरणस्नेही उपाय आणि त्यांची अंमलबजावणी असा उद्देश होता. मात्र त्यावर काही पोस्ट्स ह्या पर्यावरणाच्या अनुषंगाने निर्माण होणारे/झालेले प्रश्न ह्यावर होत्या. त्या वाचून वाटलं की ह्या प्रश्नांना मांडण्यासाठी/त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी एक वेगळा धागा हवा.
तडका - पुरस्कार
पुरस्कार,..
पुरस्कारांच्या वाटा-घाटीला
भुतकाळाचाही वास असतो
कित्तेक-कित्तेक पुरस्कारांना
पारदर्शकतेचा भास असतो
मात्र पुरस्काराचा वाद घडणे हा
पुस्काराचाही अवमान असतो
प्रत्येक व्यक्तीच्या योग्यतेचा
समाज हाच परिमान असतो
त्यामुळेच पुरस्कार देताना
योग्य व्यक्तीलाच दिले पाहिजेत
त्यांच्या सन्मानाचे स्वागत
जनतेकडूनही झाले पाहिजेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
तडका - संवाद गायी-बाईचा
संवाद गायी-बाईचा,...!
एकदा गायी म्हणाली बाईला
माझ्यापोटी ३३ कोटी देव आहेत
जिथं तुला किंमतच नाही तिथेही
आम्हा गायींच्या उठाठेव आहेत
मग बाई पण म्हणाली गायीला
हा माझ्या नशिबाचा दोष नाही
पण माणसांच्याच कुकर्माचा
इथे माणसांनाच होश नाही
आज जे तुला किंमत देतात
त्यांनीही मोठा जुल्म केलाय
विसरले आहेत की त्यांनाही
एका बाईनंच जन्म दिलाय
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
तडका - सत्तेची वाटा-घाटी
सत्तेची वाटा-घाटी
सत्तेची साय चाटण्यासाठी
विरोधकासही लळा असतो
अन् महत्वाच्या पदांवरती
प्रत्येकाचाच डोळा असतो
महत्वाच्या पदांसाठी कधी
अंतर्गत आटा-आटी असते
तर कधी पदांच्या मलिद्यासाठी
इथे सत्तेचीही वाटा-घाटी असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
तडका - मृत्युचे राजकारण
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,...
मी शेतकरीच बोलतो आहे,...
तुम्हा सर्वांना आपुलकीनं सांगतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,...||धृ||
आजवर खुप भोगलं आहे
अजुनही खुप भोगतो आहे
जीवनावरती कर्ज काढून
जीवन आज जगतो आहे
आजही जगण्यासाठी धडपडतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,...||१||
दूष्काळानं होरपळलं आहे
अवकाळही छळतो आहे
आता निसर्गही आमच्या
जगण्याशीच खेळतो आहे
तरीही जगण्याला उमेदीनं पेलतो आहे
होय, मी शेतकरीच बोलतो आहे,...||२||
दुष्काळात अन् अवकाळात
कित्तेकजण दौरे करून गेले
कुणी सांत्वन करून गेले तर
कुणी-कुणी फक्त फिरून गेले
कुणी अजुनही कागदोपत्री फिरतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||३||
Pages
