परवा पावसाने
मला रस्त्यातच गाठलं
वविच्या आठवणीने त्याच्या
डोळ्यात, पाणी की हो दाटलं
सांग माबोकरांना
आलोय मी देशात
गटग करुया मिळून
लोणावळ्याच्या घाटात
मलाही व्हायचंय चार्ज
करायचेय मजा मस्ती
बघायच्यात माबोवरच्या
आयडी मागच्या हस्ती
मग काय म्हणता लोकहो? पावसाला निराश नको ना करायला? जायचं का मग लोणावळ्याला? कधी? कसं?
ते सगळं उलगडायलाच आलोय हा पावसाचा संदेश घेऊन...
माझी तर एवेएठि च्या आधी पासून तारंबळ ऊडाली होती. झक्कींची खास योजना होती २५ तारखेला बारा हून फिली ला जाताना वाटेत सुमा फुड्स मधून उकडीचे मोदक घ्यायचे. मुख्य म्हणजे कोणी विचारलं तर त्यांना " फचिन आणि टण्या ह्यांच्याकरता मुली सांगून आल्या आहेत आणि त्यांना भेटून आपण पुढे प्रस्थान करणार आहोत" असं ते सांगणार होते. कोणाला आजिबात काहीच सांगू नका असा दम पण भरला मला. आता घ्या! मी आपलं ह्या कार्यक्रमामुळे उशीर होईल म्हणुन हळूच पोस्टींमधून , जरा लवकरच निघूयात का असं आडून आडून सुचवत होतो.