जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तु कुठला पेन वापरणार पेपर लिहायला?
>>>
आणि ती बया भारताचा पंतप्रधान कोण होणार अस विचारल्यासारखं चेहर्‍यावर भाव घेऊन त्याच्याकडे बघतेय.
ती हुश्शार आहे दोन्ही पेन वापरणार नाही. स्वत:च एखाद पेन घेऊन पेपर लिहिल. नाहीतरी ब्लँक झालिच्चे काल आता काय ते लिहायच पेपरात दिसतयच.

तिची जाऊ तिला काही बोलत नाही कारण ती विरघळुन गेलिये ना देसाईंच्या घरात.

भगवती, गोगलगाईचा काहुन अपमान करुन राहिली तू?? ती पण कालांतराने पोचते तिच्या गोलपर्यंत फक्त संथ गतीने. इथे या बयेला काय करायचय हेच अजुन निश्चित नाही Lol

सोनाली,
मेघनाने आता कपाळावर 'sorry'ची पट्टी आणि गळ्यात 'Thank you'ची पाटी अडकवण्यास काही हरकत नाही.....
अगदी मान्य. पण असे केल्याने मालिका लवकर पुढे सरकेल ना! त्यामुळेच मालिका लांबवण्यासाठी मेघनाला सारखे sorry आणि thank you म्हणायला सांगतात.

भगवती,
गोगलगाय हि उपमा आवडली. अगदी शोभुन दिसते मेघनाला!

मेघना सारखं काय ते आदु आदु करत असते. एखाद्या लहान मुलाला हाक मारल्यासारखं वाटत ते! दोघे (ती आणि आन) एकत्र असताना आदु ठिक आहे. पण आपल्या आईवडिलांसमोर आणि आपल्या नवऱ्यासमोर (चांगला मित्र म्हणे तो तिचा!) आदु म्हणणारी मेघना नक्कीच बावळट आहे.

माझ्यामते अर्चु वागते ते बरोबरच आहे. असंच पाहिजे. कुणितरी त्या मेघीचे कान टोचलेच पाहिजेत.

हा. पण या हिरविणीला कोणी बोललं तरी "हो, तुमचं बरोबर आहे. मीच कित्ती वैट्ट ना!" म्हणते ना! मग दुसरा त्यावर काय बोलणार? आणखी भांडता येत नाही. वर समजूत घालावी लागते.

हा. पण या हिरविणीला कोणी बोललं तरी "हो, तुमचं बरोबर आहे. मीच कित्ती वैट्ट ना!" म्हणते ना! मग दुसरा त्यावर काय बोलणार? आणखी भांडता येत नाही. वर समजूत घालावी लागते.<<<

असंच काही नाही काही!

"मीच कित्ती वैट्ट" म्हंटले की झापायला पाहिजे! पण हे सुचणार कोणाला? जिभेवर साजूक तुपाचा थर लावून सगळे बोलणार!

तिचा तो गुलाबी, पण आता अ‍ॅनिमिया झाल्यासारखा पांढरट पडलेला ड्रेस कोणीतरी बोहारणीला द्यायला हवाय. एखादे उलथ्न किंवा सांडशी तरी मिळेल! (पण तो ड्रेस घ्यायला बोहारीण मिळेल का हा खरा प्रश्न आहे).

एवढ्या गाजलेल्या मालिकेत पात्रांचे पोषाख हा विषय इतका दुर्लक्षित कसा?

या देसायांकडे काय आणि त्या गोखल्यांकडे सगळा एकच प्रकार. सतत चहा/शिरा/पोहे/थालिपीठं. दोडक्याची भाजी. बाकी काही नाही. यांची घरं कोण साफ करतं?
एक दिवस सुमो(सुकन्यामोने) पण ती सुमोच झालिये अलिकडे.... तर एक दिवस ती मेघीला असं नाही म्हणत 'ए बाई जरा हाल आणि ते चार बादल्या कपडे धून टाक. किंवा अंगण धुवून घे. किंवा आज घरातले सगळे डबे काढलेत घासायला

परवाचे ते बॅडमिंटन पाहून ढल गया दिन गाण्याची आठवण झाली. ह्या मालिकेत ते गाणे कसे म्हंटले असते माहित्तीय तरी का कोणाला?

उड गया फूल
काम ना धाम
खेलने दो
खेलना है

अभी अभी तो
उड गया फूल
अभी अभी
झेलना है

दक्षे, यांच्या घरांत कधी झुरळं, कोळिष्टकं होतच नाहीत का ग? आणि स्वयंपाकघरात असं सगळं समोर ठेवलेलं असलं तरी मांजरं पण कधी येताना दिसत नाहीत!

घरातल्या बाईचं परक्या पुरुषावर प्रेम असलं की किडे वगैरे नाही होत घरात असं म्हणतात बुवा!

बेफि हा हा हा.

मला वाटतं मेघनाने राजकारणात जायला हवं, इथली सगळीच वाचतील, भेदरलेली आहे दाखवते, चांगलीच गेंड्याच्या कातडीची आहे, सर्वाचा उपयोग कसा करावा अगदी बरोबर कळतं.

बेफिकीर काहिही काय?? Rofl

ती अर्चु छान झापते पण तिला दरवेळी. आणि लॉजिकल पण असत ते. सगळे हिच्या पुढे पुढे करणार आणि ही आदुच्या मागे. बर त्याच्यापर्यंत तरी पोचावं की भराभर पण नाही आदेने हात ओढल्याशिवाय हिच्या पायाखालची मुंगी देखिल मरणार नाही Angry

आमच्या येथील एका अभयारण्यात एक मेघनाच्या कातडीचा गेंडा ठेवणार आहेत आता म्हणे!
>>>
मेघनालाच ठेवा म्हणावे तिथे. दोन्ही टाईपचे (आन आणि आदे) प्रेक्षकांचे मनोरंजन होईल.

बेफिकीर भारी कविता.:फिदी:

ती मेघना कधी हसताना दाखवलीय का?:अओ: कदाचीत हसली असेल सटी सामाशी, पण नेमके मी पहायला जाते तेव्हा ती कायम रडक्या चेहेर्‍यात असते आणी भाव तर असे असतात की तो फाटक्या चड्डीवाला हिला कायमचा नाही भेटला, तर हिचा हा जन्म वाया जाऊन हिला परत कधी मनुष्य योनीत येता येणार नाही आणी फा च बरोबर लग्न होणार नाही.:फिदी:

Pages