इतिहास

तमिळनाडूचा इतिहास भाग- ६

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 6 September, 2022 - 15:11

एका रम्य सकाळी शहरातील पाॅश एरीया मयलापूरात चहा पिनारे काही अभिजन तरूण ऊत्साहात दिसत होते. ते सामान्य तरूण नव्हतेच. एक कचेरीत प्रतिष्ठीत वकील होता, एक “द हिंदू”तील प्रथम स्तंभलेखकात होता, एक सिवील सर्वंट होता, एक रिअल ईस्टेट मालक, एक प्रोफेसर. हा ईंग्रजींच्या तालमीत तयार झालेल्या काही ब्राम्हण तरूणांचा घोळका होता जे समजायचे की ह्या देशाच्या भविष्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. तसंच जसं पुणे-मुंबई आणी कलकत्त्यातील ऊच्चभ्रू सवर्णांना वाटायचं. हा भारताचा ताजा एलीट क्लब होता, जो मॅकालेवादी ईंग्रजी शिक्षणाच्या पायावर ऊभा होता. रक्ताने भारतीय विचारांनी ईंग्रज.

तमिळनाडूचा इतिहास भाग - ५

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 3 September, 2022 - 17:26

तैम्ब्रैम, म्हणजेच तमिळ ब्राम्हण. अमेरीकेतील विद्यापीठात शिकनारे अनेक भारतीय त्यांना भेटले असावेत. एका अ-ब्राम्हण तमीळ मित्राशी केलेली चर्चा मी ईथे काल्पनिक स्वरूपात देतो. जेव्हा मी तमीळ जाती व्यवस्था समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो तेव्हा त्याने सगळ्या जाती सांगायला सुरूवात केली.

मी विचारलं- “आणी ब्राह्मण?”

तो बोलला- “तू मनुष्याच्या जाती विचारतोय. तमीळ ब्राम्हण ह्या पृथ्वीच्या वर देवलोकात राहतात, ते आम्हाला किंमत देत नाहीत. सगळे तमीळ एका बाजूला नी तैम्ब्रेम एका बाजूला.”

“परंतू, ऊत्तर भारतात सवर्णांत ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य सगळे येतात”

तमिळनाडूचा इतिहास भाग - ४

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 2 September, 2022 - 02:12

ईथे ह्या निष्कर्षावर येऊ नका की कोण चुकीचं होतं कोण बरोबर. हे मत प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, अजूनतर ही गोष्ट सुरूच होत होती ह्याची पुर्वपिठीका मी ह्या आधी “रिनैशां” पुस्तकात लिहीलीय की कसे ईंग्रज आले नी झोपलेला भारतीय समाज जागा झाला.

आता पुढचा प्रश्न जास्त जटील परंतू सरळ निशाण्यावर आहे. बंगालातील तमाम समाज सुधारक भद्रलोकांतून (ऊच्च वर्णीय) आले, ते आपलं धोतर सांभाळत सुधारणा करत होते, राजा राम मोहन राय यांच्यासारख्या व्यक्तिनेही कधी जानवं काढून फेकलं नाही, पण दक्षीणेत हे आंदोलन ब्राम्हण आणी ब्राम्हणवादाविरोधात असे आक्रमक स्वरूपात प्रकट झाले, असं का झालं?

विषय: 

तमिळनाडूचा इतिहास भाग-३

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 1 September, 2022 - 11:40

चित्रः ते पुस्तक ज्यात “द्रविड” शब्दाचा प्रथमतः ऊल्लेख केला गेला.

ईंग्रज सुरूवातीला दक्षीण भारतात आले, ईंग्रजी भाषा सुरूवातीला दक्षीण भारतात आली, पाश्चिमात्य संस्कृतीदेखील तिथेच आधी आली. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटीश सगळे तिथेच आधी आले ईतकंच काय डेन्मार्क ची ईस्ट ईंडिया कंपनीदेखील तिथेच ऊपस्थीत होती.

विषय: 

तमिळनाडूचा इतिहास भाग- २

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 1 September, 2022 - 08:40

पहिल्या भागाची लिंक

https://www.maayboli.com/node/82174

ओस्लोच्या एका दुकानातील “पन्नास टक्के सवलतीत” विभागात मला एक पुस्तक दिसले. त्या पुस्तकाच्या आवरनावर एक विशाल हत्ती होता, त्याच्या डोक्यावर जाळीदार कवच आणी पाठीवर मशाली बांधल्या होत्या. ही वयोवृध्द थ्रिलर लेखक विल्बर स्मिथ ह्यांची “घोस्ट फायर” कादंबरी होती. त्यातील गोष्ट त्या काळखंडापासून आणी त्या जागेवरून सुरू होते जिथून मी ही ईतिहासकथा सुरू करतोय.

विषय: 

तमिळनाडूचा इतिहास. - भाग १

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 31 August, 2022 - 14:59

उत्तर भारतीय अनेक कारणांनी तमिळनाडूत जातात. तीर्थयात्रेला, चेन्नईतील एखाद्या संगणक कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी. कोणत्याही सरकारी पदावर. शिवकाशीच्या फटाका उद्योगात नोकरीला, कोईम्बतूर येथील गुजराती आणि मारवाड्यांच्या कारखान्यात. सालेमच्या कारखान्यात.
तिरुपूरमध्ये मी बिहारच्या एका माणसाला विचारलं, “तू इथे कसा आलास?”, गावातील एका भावाने त्याला नोकरी लावल्याचे त्यांनी सांगितले.
मी विचारले, "तुला इंग्रजी येते का?
तो म्हणाला, “इंग्रजी अवघड आहे. त्यामुळे मी तमिळ शिकलो.”

विषय: 

बलशाली भारत होवो .... !

Submitted by छन्दिफन्दि on 28 August, 2022 - 10:02

राष्ट्रगीताची धून ऐकू आली कि अंगावर काटा येतो, छाती अभिमानाने भरून येते. वंदे मातरम सुरु होताच कान टवकारतातच , पण तन-मन आर्त होत, कुठेतरी खेचलं जातं. जगाच्या काना कोपऱ्यात कुठेही असलेल्या ( बहुतांशी) सर्व भारतीयांचं असचं होत असावं.
आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, त्यानिमित्ताने खूप सारे कार्यक्रम आयोजित केले जातायत, 'हर घर तिरंगा' ह्या पंतप्रधानांच्या आवाहनाला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देऊन घराघरात तिरंगा फडकतोय, तिरंग्याचे पावित्र्य आणि सन्मान राखला जातोय ना ह्याचीही दक्षता घेतली जाईलच (ही अपेक्षा), सगळंच खूप सुखावणारं आहे.

भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन

Submitted by उपाशी बोका on 14 August, 2022 - 14:05

१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन दिमाखात साजरा होणार आहे. त्याबद्दल सर्व भारतीयांना शुभेच्छा.

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.

विषय: 

श्री तुळजाभवानी मंदीर परीसर

Submitted by अभि_नव on 28 July, 2022 - 23:00

श्री तुळजाभवानी मंदीर परीसर, धाराशीव येशील पावसाळ्यातल्या संध्याकाळी काढलेले छायाचित्र

किशोर रामचंद्र मुंढे...आपण पुढील लेख कधी टाकणार?

Submitted by फलक से जुदा on 1 July, 2022 - 07:53

मागील लेख क्रमशः वाचुन प्रतीक्षेत असणारा तुमचा एक चाहता.

"आफ्रिकन आरोपीला त्यांचे केस कापायला सांगून त्यांचे जेवण, गादी, पांघरूण ई व्यवस्था कोठे करायची याची चाचपणी करू लागला. हॉलच्या बाहेर ज्या ठिकाणी केस कापण्याचा कार्यक्रम सुरू होता तिकडे नविन आरोपींना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. ------ किशोर रामचंद्र मुंढे, अजमान. क्रमशः"

Pages

Subscribe to RSS - इतिहास