लहानपणी आमच्या घरी दरवर्ष आजोबांचं श्राद्ध व पक्ष होत असे. आई एक लहानसं केळीचं पान वाढत असे. ते पान आम्ही बाहेर कावळ्यासाठी ठेवत असू. आजोबा कावळ्याच्या रुपाने येऊन ते पान खातात अशी आमची ठाम समजूत होती.
नेहमीप्रमाणे बरोब्बर ५ वा. ७ मिनीटांनी आमची बस एल्. अँड टी. च्या ७ नंबरच्या गेट वरुन सुटली. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता. एव्हाना लोकल बंद झाल्या असतील की नाही यावर आमच्या बसमध्ये चर्चासत्र सुरु झालं होतं.
मुंबईतील राजकारण्यांनी मुंबईकरांच्या आणि विशेषत: मराठी मुंबईकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा नवीन मार्ग शोधून काढला आहे. लोकांच्या भावनांना हात घालून सत्ता सिंहासन मिळवता येईल अशी या राजकारण्यांची पक्की धारणा दिसते.