नकळत कैसै होते सुरवंटाचे फुलपाखरू,
कोण पोशितो वाळवंटी उंच हिरवे तरू.
सूर्योदयीच का कुसुम फुलते,
कोण कळ्यांत भरते वारु,
का बगळ्यांची माळ फुले आकाशांत त्याच आकारू.
स्वर नी व्यंजन किती ही असले तरी मुळ नाद तो ओंकारु,
नाद ब्रम्ह हा ब्रम्हांडात या झाला कसा साकारु.
कोण सांगेल उत्तर यांचे, कोणास मी विचारू.
तो सर्व साक्षी कोण आहे, कोण माझा सदगुरू.
शनिवार, २०/९/२५ , ०८:३५ PM
अजय सरदेसाई -मेघ
meghvalli.blogspot.com
आयुष्याच्या या वळणावर मी तुझेच गाणे गातो ।
मी रडत नाही मी झुरत नाही मी प्रेम गाणे गातो।।
जन्मा पासुन आजवरी तुच मला शिकविले ।
तुझ्या च या शिक्षेचे मी आज पोवाडे गातो।।
तु दाखविली सुंदर स्वप्ने अन् मी ती रंगवली।
स्वप्नांच्या त्या हिंदोळ्यावर मी आनंद तराणे गातो।।
सुरवंटांची होताना फुलपाखरें मी रोज पहातो।
सुरवंटांसाठीच त्या बागेत मी किलबिल गाणी गातो।।
शुद्ध निसर्ग तुच निर्मीला,जीव त्यात मस्त रमतो।
मेघ गर्जती श्रावणात पहा ना, मी सरींचे गाणे गातो।।
व्योमरापवायूरतेज अन पृथ्वी चे हे शरीर माझे।