नेहमी प्रमाणे पांडुरंग तुंबाड च्या वाड्यात लिफ्ट समोर उभा होता.लिफ्ट थांबली.दार उघडताच भुश्श आवाज होऊन छतातून पिठाचा वर्षाव झाला.खाली जात असताना पांडुरंग हिशोब करत होता."बार मध्ये उडवायला-5 मोहरा.घरखर्च-8 मोहरा.गुंडू ला स्मार्ट वॉच हवंय दिवाळी ला.6 मोहरा.बायको ला पीठ भरायला सोन्याचा चमचा-4 मोहरा.इन हॅन्ड 30 मोहरा तरी पाहिजेत यावेळी.खर्च वाढतच चाललेत.काहीतरी जबरा डाकू डाव टाकून जास्त मोहरा मिळाल्या पाहिजेत."
"वारसाहक्काने मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर हक्क सांगणं शहाणपणाचं नसतं."
सतत मुसळधार पावसात भिजलेलं एक गाव, गरिबीत जगणारी एक विधवा आणि लहानपणीच बऱ्याच गोष्टींची समज आलेली तिची दोन मुलं.पैश्यासाठी भीतीदायक वाटूनही एक विशिष्ठ काम करत राहण्यातली अगतिकता.हे सगळं इतक्यावर थांबलं असतं.पण गरिबी पाहिलेली, पैश्याची अधिकाधीक लालसा बाळगणारी आणि हुशार होत जाणारी पुढची पिढी.
पाऊस, अंधार आणि एकटेपण, ह्या तिन्हींत एक समान धागा आहे. अजूनही असतील, पण एक नक्कीच आहे. तो म्हणजे 'भय'. अंधार आणि एकटेपणातल्या भयाचा अंश चित्रपटांतून व कथांतून अनेकदा समोर येतो, आला आहे. 'पाऊस' मात्र फार क्वचित अश्या रुपात समोर आला आहे.