नातं
Submitted by जेसिका on 30 April, 2021 - 00:33
आपल्या मनातले समोरच्याला प्रत्येक वेळी समजेलच अस नाही ना..
त्यामुळे शाब्दिक संवाद हा वेळोवेळी व्हावा ,
नाहीतर नात्यांमध्ये विनाकारण अंतर वाढते......
बायकोशी कधीतरी खूप भांडावं
काढून टाकावं किल्मिष मनातलं
नंतर मात्र घेऊन अलवार मुका
समजवावं प्रेम स्पर्शातलं
कधीतरी भांडावं खूप मित्राशी
जमलं तर, द्याव्यात शिव्या मनापासून चार
ग्लासांची मग करत किणकिण
प्यावी बिअर त्याच्याचसोबत गारगार
खूप भांडावं कधीतरी आईशी
का एवढी धडपडतेस विचारावं
सोडून मग शिदोरी आठवणींची
तीचं प्रेम चाखत राहावं
खूप कधीतरी भांडावं देवाशी
का निर्माण केला भेदभाव
भांडून झालं की मग आठवावं
हा त्याचा नाही आपलाच डाव