हृदयातील भावना जेव्हा उचंबळतात
ओघळते अश्रू तेव्हा सहज मिसळतात
काय माहिती काय जादू असते?
फेसाळणाऱ्या त्या सोमरसाच्या ग्लासात
काहींसाठी ते टाकाऊ अन् नकोसे गटार असते
काहींसाठी ते हवेहवेसे स्वर्गाचे द्वार असते
व्यक्ती तितक्या वल्ली... पु लं चे अगदी खरे!
चांगले किंवा वाईट असे खरेच काही असते?
घटना घडतात आणि त्या घडणारच
त्यांचा अर्थ लावणारा हरवतो विचारातच
कित्येक पेले सोमरसाचे खाली होतात
मोजण्याच्या आत माणूस ढगात
काय होतं आणी काय होतं आहे ?
एखादि गोष्ट सुरु होते कशी आणी कालांतराने त्या गोष्टीच्या मुळाशी असलेली कारणे कशी विसरुन मागे पडतात आणी दुसरेच कुठले शीर्षक त्याला कसे चिकटते ह्याची काही उदाहरणे येथे देतो आहे.
१). रक्षाबंधन - कालामानाने मुळ अर्थ बदलुन एकाच दिशेला मनुष्य कसा एखादि परंपरा घेऊन चालत राहातो ह्याचे हे एक मोठे आश्चर्यजनक उदाहरण - जेव्हां सर्वप्रथम सुर आणी असुरांचा संग्राम होणार हे ठरले, तेव्हां असुरांनी सरळ सांगितले कि इंद्राची राजधानी अमरावती वर आक्रमण करुन ती जींकुन वर आम्ही इंद्रपत्नी "शची ", हिला सुद्धा घेऊन जाऊ.