एन डी ए (मोदी) सरकार ची ५ वर्षे: २०१४-१९: आकडेवारी

Submitted by योग on 12 February, 2019 - 06:40

मोदी वि. ईतर... भाजपा वि. ईतर... गांधी कुटुंब वि. ईतर.. अशा अनेक वाद विवादांतून, चर्चा, प्रसंगी वैयक्तीक टीकांतून एक बाब प्रामुख्याने समोर येते ती म्हणजे स्वतंत्र भारताच्या गेल्या ७ दशकात, विशेषतः गेल्या दशकात आपली मते, भूमिका, विचारसारणी ही बर्यापैकी 'ठाम' असते. यात संस्कार, शिक्षण, मिडीया सर्वांचाच मोठा वाटा असतो. त्यामूळे व्यक्तीसापेक्षतेच्या कसोटीवर चूक व बरोबर, फायद्याचे का तोट्याचे याचे नेमकी ऊत्तर सापडणे मुश्कील असते. त्यातही भारता सारख्या महाकाय लोकशाही मधील प्रांत, भाषा, संस्क्रुती, ई. घटक बघता कुठल्याही (केंद्रातील) सरकारने राबवलेल्या योजना वा धोरणे ही सर्व गटांसाठी पुरक वा सर्वंकष विकासाला चालना देणारी असतात वा नाही यावर एकमत होणे तसे अवघडच.

सुदैवाने, सर्वसाधारण 'जागरूक' मतदार व नागरीक यांचे बर्याच गोष्टींवर एकमत असते. देशांतर्गत सुरक्षा असणे. सीमा सुरक्षा. सैन्य व ईतर मुख्य संस्थांचे बळकटीकरण. कुठलेही स्कॅम्स व घोटाळे न होता चालवलेला कारभार. देशाच्या सुरक्षा व विकासाला पुरक अशी आंतरराष्ट्रीय धोरणे राबवणे. दैनंदीन वापराच्या वस्तू, माल, वाहतूक यांच्या किमती वर नियंत्रण. स्वच्छता, आरोग्य, व पर्यावरण पुरक कार्यक्रम व ऊपाययोजना. करवसूली, जकात, ई. मध्ये पारदर्शकता. शहरे, राज्य यांच्या विकासाची कामे व योजना- दळण वळण, वाहतूक, ईंफ्रास्ट्रक्चर. आणि ईतरही बरेच काही. या सर्व अपेक्षा रास्त आहेत. पण आपल्या अपेक्षांच्या तराजूचे एक पारडे ७ दशकांच्या कारभाराचे आहे. तर दुसरे पारडे ५ वर्षाच्या कारभाराचे आहे. तेव्हा अचानक जादू होऊन संतुलन साधणे शक्य नाही.

कुठल्याही सरकार वा व्यक्तीवर वैयक्तिक टीका करणे, दोष दाखवणे, अपेक्षांच्या तराजूवर तोलणे हे सोप्पे काम आहे. पण सरकारच्या कामाची आकडेवारी तपासून नेमकी पुढे कशी वाटचाल अपेक्षित आहे आणि त्या साठी जागरूक मतदार म्हणून आपले कर्तव्य काय हे तपासून घेणे हे अधिक आवश्यक आहे. आपला देश अधिक विकसनशील व्हावा हीच आप्ली अपेक्षा आहे. मग सरकार कुणाचेही असो.
त्यातही सर्व गोष्टि, घडामोडी या तपासून पहाणे, वस्तुस्थिती पडताळून घेणे, संख्यात्मक माहिती हे सर्व तपासून बघायला सर्वसामान्य माणसाला वेळ नसतो. अशा वेळी मुख्यत्वे मिडीया (प्रिंट, केबल.. ई.) मधून ज्या बातम्या २४x7 समोर येत असतात त्यावरूनच साधारण मत व अनुमान निघत असते.

तेव्हा, एन डी ए सरकारच्या गेल्या पाच वर्षाच्या कारभाराची ही आकडेवारी. अर्थातच नरेंद्र मोदी हे या सरकारचे प्रमुख सेवक (पंतप्रधान) असल्याने त्यांच्या घोषणांच्या अनुशंगाने ही आकडेवारी दिली आहे. सरकारच्या अनेक वेब पोर्टल व गव्हरनंस माध्यमांवर ऊपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी एकत्रीत केली आहे. माहितीचे स्त्रोत विविध असल्याने सर्वच संदर्भ ईथे देणे टाळले आहे. पण आकडेवारमध्येच माहितीचे स्त्रोत चा उल्लेख आला आहे.

१. घोषणा/अपेक्षा/आश्वासनः
देशाच्या तळागाळातील घटकांना आपल्या अर्थव्यवस्थेत सामावून घ्यायचे असल्यास बचत्/बँक खाती असणे आवश्यक आहे.
आकडेवारी:
३३.४ कोटी नविन बँक खाती, विशेषत: मागास विभाग व प्रदेश.
२६ कोटी रुपे कार्ड्स वितरीत केली गेली
प्रधान मंत्री जनधन योजने अंतर्गत ८,५०० कोटी रक्कम बँक बचत खात्यांमध्ये जमा

२. सामजिक सुरक्षा, पेंशन, विमा हे निम्न मध्यमवर्गीय स्तरावर आवश्यक प्रमाणात ऊपलब्ध नाही.
आकडेवारी:
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत १४ कोटी लोकांना सुरक्षा विमा मिळाला आहे
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा फायदा जवळपास ५.५ कोटी कुटूंबांनी घेतला आहे
अटल पेंशन योजने अंतर्गत जवळपास १२.५ कोटी लोकांनी नोंदणी केली आहे

३. कमी व्याजदर कर्ज ऊपलब्ध केल्याने अनेक कुटूंबांना कर्ज घेणे सुकर झाले आहे, पर्यायाने त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला झाला आहे.
आकडेवारी:
प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत जवळपास १४.५ करोड लोकांनी स्वस्त/कमी व्याज दर कर्जाचा लाभ घेतला आहे.

४. देशाचा विकास व बांधणी ची सुरुवात खेड्यांच्या विकास व सुधारणांतून होणे आवश्यक आहे. आपल्याला आदर्श खेडी (मॉडेल व्हिलेज) ऊभारणे आवश्यक आहे.
आकडेवारी:
'परीवर्तन व सुधारणा उत्सूक जिल्हे' कार्यक्रमांतर्गत ११५ जिल्ह्यांची तपासणी व अधिकॄत नोंदणी झाली आहे.
५.८५ कोटी पेक्षा अधिक बिपील महिलांना एल्पिजी कनेक्शन दिले गेले आहे.
ग्रामपंचायती व खेडे परिसरात ९.२ कोटी शौचालये बांधली गेली आहेत (२०१४ पर्यंत ही संख्या फक्त ६.५ कोटी होती)

५. आपल्या खेड्यात वा गावात पक्का रस्ता असावा अशी प्रत्त्येकाची अपेक्षा असते
आकडेवारी:
२०१४ पर्यंत गावांना जोडणार्या पक्क्या रस्त्यांची टक्केवारी ५६% ईतकी होती. जी आता ९१% पर्यंत पोहोचली आहे.

६. आपल्याला एक असा भारत बनवायचा आहे जिथे गरीबांसाठी देखिल पक्की घरे, वीज, व पाणी ऊपलब्ध असेल.
आकडेवारी:
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जवळपास १.२५ करोड पक्की घरे, वीज व पाणी पुरवठ्यासकट बांधली गेली आहेत.

७. शेतकर्यांकडे जमिन आहे. त्यांना आवश्यक पाणी पुरवठा मिळाला तर मातीतून सोने (सुबत्ता) ऊगवण्याची किमया ते करू शकतात.
प्रधानमंत्री कृषीसिंचन योजना अंतर्गत जवळपास ५.७ लक्ष हेक्टर जमिनी या माय्क्रो इरीगेशन खाली आता सुपिक व पाणीदार करण्यात आलेल्या आहेत. प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत १४.४ कोटी पर्यंत फसल विमा जारी करण्यात आला आहे.

८. आपल्या देशातील गोडाउन व अन्यधान्य केंद्रात अन्न पुरवून शेतकरी देशाची सेवा करत असतात. त्यासाठी मदत करणे व क्षमता वाढवणे हे आपले ध्येय आहे.
फक्त २०१७-१८ या एकाच वर्षात धान्य निर्मिती १०.५% ईतकी वाढली. २०१०-१४ मध्ये ही आकडेवारी फक्त २५० मेट्रीक टन एव्हडीच होती. जी आता २८० मेट्रीक टन ईतकी वाढली आहे.
खरीप पिकांसाठी शेतकर्‍याला मिळणार्‍या बाजार भावात ५०%, तर रबी पिकात २१% ईतकी ऐतीहासीक वाढ झाली आहे.

९. नोटबंदी, जीएस्टी या सारख्या धोरणातून आपण ( मुख्यतः देशांतर्गत) बराच काळा पैसा अधिकृत अर्थव्यवस्थेत आणला आहे.
६.८५ करोड लोकांनी २०१७-१८ मध्ये आयकर भरला आहे. जी आकडेवारी २०१४ पेक्षा ६५% अधिक आहे. २०१४ पर्यंत आयकर भरण्याची (income tax return filing) संख्या फक्त २२० करोड ईतकी होती. २०१७-१८ पर्यंत ही संख्या २०७० करोड पर्यंत पोहोचली आहे.

१०. छोटे, गृह व ईतर मध्यम आकाराचे व्यापार ऊद्योग [MSME Ecosystem. Most Micro, Small & Medium Enterprises (MSME)] हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांना अधिक ऊधारी, कमी व्याज दर, आणि अधिक भांडवल ऊपलब्ध करून देण्यात हे सरकार सक्रीय आहे.
Support and Outreach Initiative Launched for MSME by November 2018
१ कोटी रू. पर्यंतचे कर्ज अशा ऊद्योग धंद्यांना ५९ मिनीटात म़ंजूर करून देणे हा अध्यादेश जारी केला गेला आहे.
Under CGT-MSE in 2014-18, guarantee applications with coverage of over Rs 8000 Crores were approved
२०१४-१८ दरम्यान सरकारने जवळपास २२,३०० अशा ऊद्योगांना वेगवेगळे ऊद्योजक मेळावे, प्रदर्शन ई. मध्ये सहभाग घेण्यास अनुदानीत मदत केली.

११. PM appealed to all investors and enterpreuners across the globe and in India to Make In India and Manufacture In India .
२०१४ मध्ये ऊद्योगधंद्यास पोषक्/पुरक यादीत Ease of Doing Business Ranking) भारताचा क्रमांक १४२ ईतका खाली होता. २०१८ च्या अखेरीस हा क्रमांक ७७ वर आला आहे. म्हणजेच क्रमवारीत ६५ अंकांनी सुधारणा झाली आहे.
२०१४ मध्ये भारतात फक्त २ मोबाईल मॅन्युफॅक्चरींग युनिट्स होती. २०१८ अखेरीस ही संख्या १२७ वर पोहोचली आहे.

१२. विकास दर व जागतिक विकास टक्केवारी यात भारताने सहा बलाढ्य अर्थसत्तांना मागे टाकले आहे.
२०१८ च्या अखेरीस भारताचा विकास दर (growth rate in GDP) हा ८.२% होता. व जगभरातील विकासाच्या टक्केवारीतील वाटा (India's share in World GDP) ३.१% ईतका होता. जो २०१३ च्या अखेरीस २.३% होता. जागतिक अर्थवाढितील भारताचा हिसा २००५-२०१३ या ८ वर्षाच्या कळात फक्त .६% ने वाढला. जो गेल्या पाच वर्षात .७% ने वाढला आहे.

१३. पोस्ट ऑफीस चे पेमेंट बँक मध्ये बदल करण्याचे काम आमचे सरकार करेल. ज्यामूळे पोस्ट ऑफीस च्या मार्गाने अनेक बँकांचे जाळे देशातील सर्व खेड्या पाड्यात व गावांमध्ये पसरेल.
२०१८ सप्टेंबर अखेरीस अशा ६५० पोस्टाच्या पेमेंट्स बँक शाखा व ३२५० सुविधा केंद्रे प्रामुख्याने खेड्यांमध्ये स्थापन झाल्या आहेत. ३००,००० + पोस्ट्मन आणि ग्रामिण पोस्ट सेवा या अंतर्गत जोडल्या गेल्या आहेत.

१४. आपल्या देशातील लक्षावधी तरूणांनी हस्तकला, कौशल्य, व कार्यकुशलतेचे प्रशीक्षण घेतले पाहिजे. यासाठी अशा संस्थांचे एकत्रीत जाळे ऊभारणे आवश्यक आहे.
दीन दयाल ऊपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) अंतर्गत आजवर ६ लाख तरूणांनी प्रशीक्षण घेतले असून, शिवाय जवळपास ३.५ लाख तरूणांना रोजगार (नोकरी, धंदा) ऊपलब्ध झाला आहे.
via 587 number RSETI (Rural Self Employment Training Institues) च्या सहाय्याने जवळपास २४.५ लाख तरूणांना प्रशीक्षण तर जवळपास १६ लाख तरूणांना रोजगार मिळाला आहे.
CSC (EGovernance Services India Ltd) च्या माध्यमातून ३ लाख तरूण अशा केंद्रातून कार्यवाहक म्हणून काम करत आहेत.

१५. पं. दीनदयाल यांच्या शिक्षण, रोजगार, संधी या तरूणांसाठी अभिप्रेत असलेल्या स्वप्नपूर्ती साठी सरकारने देशाच्या ८०० लक्ष तरूणांसाठी काही ठोस पावले ऊचलली आहेत.
६ नविन IIT कार्यरत झाल्या आहेत. IIT Palakkad, IIT Tirupati, IIT Jammu, IIT Bhilai, IIT Goa, IIT Dharwad
२५०० अटल टेक्नोलॉजी लॅब्स मधून जवळपास ३०,००० विद्यार्थी reserach and innovation मध्ये कार्यरत झाले आहेत.
नॅशनल डिगीटल लायब्ररी ऑफ ईंडीया च्या माध्यमातून १.७ कोटी डिजीटल पुस्तके जवळपास ३० लक्ष युजर्स ना ऊपलब्ध केली गेली अहेत.

१६. जर सर्व खेडी व गावे ही डिजिटल ब्रॉड्बेंड व डिस्टंस लर्निंग माध्यामतून जोडली गेली तर गावातील सर्व मुलांना अत्यंत उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त करता येईल.
१.२ लक्ष ग्राम्पंचायती ब्रॉड्बँड द्वारे जोडल्या गेल्या आहेत. 'Swayam' शिक्षीत भारत, ऊन्नत भारत या संस्थेद्वारे ३३ लाख युजर्स ना साधारणपणे
१००० ऑनलाईन कोर्सेस ऊपलब्ध केले गेले आहेत.
E-Pathsha या पोर्टल व मोबाईल अॅप च्या आधारे जवळपास ३३०० ध्वनिक्लिप्स, ६५० ई पुस्तके आणि ५०४ फ्लिप पुस्तके ऊपलब्ध केली गेली आहेत.
Nantional Repository of Open Educational Research वर जवळपास १३,६३५ माहिती फाईल्स ऊपलब्ध केल्या गेल्या आहेत.

१७. Technology च्या सहाय्याने बदल व सुधारणा घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. Geo Technology, Space Technology, अशा ईतर सर्व टेक्नोलॉजी चे ईंटीग्रेशन करून अमूलाग्र बदल घडवून आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
मंगलयान- मंगळावर (ऑर्बीट मध्ये) यशस्वीपणे ऊपग्रह ऑपरेट करणारा भारत हा आशिया खंडातील पहिला देश आहे.
https://www.bbc.co.uk/news/science-environment-29341850
ईस्रो ने एकाच लाँच मिशन मध्ये १०४ ऊपग्रह यशस्वीपणे लाँच करण्याचा नवा जागतिक विक्रम केला.
IRNSS ही भारताची स्वयंपूर्ण व स्वतः बनवलेली सॅटेलाईट नॅविगेशन सिस्टीम आहे.
GSAT 11 च्या सहाय्याने देशभरात ब्रॉडेबेंड कनेक्टीविटी अधिक क्षमतेने वाढवण्याचे काम सुरू आहे.

१८. ग्लोबल वार्मिंग च्या लढाईत व पर्यावरण संरक्षण यात भारताचे योगदान हे विद्युत ऊर्जा वापर कमी करण्याच्या माध्यमातून असेल.
मर्च ११, २०१८ मध्ये भारत सरकारने जवळपास १७५ कोटी रु. गुंतवणूक करून International Solar Alliance या जागतिक संशोधन, संस्था व कार्यकारिणीची स्थापना केली. या संस्थेच्या पहिल्या जागतिक संमेलनाचे ऊद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजी केले.

१९. स्वच्छ, निरोगी व सुराज्य (सुदृढ) भारत बनवण्यासाठी आम्ही एकत्रीतपणे काम करू.
'मिशन ईंद्रधनुष' योजने अंतर्गत आजवर ३.३ कोटी मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री डायलेसिस योजनेचा लाभ जवळपास २.५ लाख लोकांनी घेतला आहे.
सार्वजनिक व खाजगी रूग्णालयांबद्दल अद्ययावत माहिती असलेली National Health Repository आता ऊपलब्ध आहे.

२०. गरीब रूग्णांना प्रसंगी स्वस्त वा फुकट औषधे मिळावीत व चांगल्या मोठ्या रुग्णालयांमधे प्रवेश व वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून सरकारने प्रधानममंत्री जन आरोग्य योजना राबवण्याचे ठरवले.
या अंतर्गत आरोग्य सुरक्षा विमा रू.५ लाख पर्यंत/ दर वर्षी/एक कुटूंब ऊपलब्ध केला गेला. यात १३०० आजार, व १३५० ऊपचार पॅकेजेस (सेकंडरी, टर्शियरी) अंतर्भूत आहेत. धोरणात्मक लक्ष्य-५० कोटी लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवणे.

२१. २०१९ मध्ये १५० व्या गांधीजयंती निमित्त स्वच्छ भारत (अभियान) समर्पीत करणे
२०१४ पासून आजवर ९.५ कोटी शौचालये बांधली गेली आहेत. जवळपास ५.३ लाख गावे आणि २५ राज्ये ही open defecation free म्हणून घोषित झाली आहेत. येथिल सांड्पाणी नियोजन व विल्हेवाट टक्केवारी ३९% (२०१४) वरून ९७% पर्यंत वाढली आहे.

२२. IT च्या माध्यमातून देशाचा प्रत्येक नागरीक जोडला जाऊ शकतो. म्हणूनच 'डिजीटल ईंडीया' च्या माध्यमातून अखंड भारत व ए़कात्मतेचा प्रसार होवू शकतो.
MyGov.in वर आता ७१ लाख लोकांनी अधिकृत रजिस्ट्रेशन केले आहे. जगातील सर्वात मोठा डिजीटल डेमोक्रसी प्लॅटफॉर्म असा हा विक्रम आहे. १.२ लाख ग्राम पंचायती आता फायबर ऑप्टीक मूळे जोडल्या गेल्या आहेत.

२३. मुलगी, महिला, स्त्री या खर्या अर्थाने स्वतंत्र असाव्यात आणि स्त्रीभ्रुण हत्त्या पूर्णपणे बंद ह्वावी म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागतील.
'बेटी बचाओ बेटी पढाओ' अंतर्गत १०४ जिल्ह्यांमध्ये महिला/पुरूष ratio ऊंचावला आहे. 'मिशन ईंद्रधनुष' च्या अंतर्गत ८६ लाख गरोदर महिलांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. मॅटर्निटी बेनिफीट कायद्यामध्ये २०१७ मध्ये सुधारणा करून आता गरोदर नोकरदार महिलांना २६ आठवड्याची पगारी सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. जगात ही सर्वात मोठी paid maternity leave आहे.

२४. बलात्कारा सारख्या घटना घडतात तेव्हा देश म्हणून आपली मान झुकते. अशा वेळी (पुरूषांची) मानसिकता बदलण्याची गरज असताना आपण ऊलट मुलींवर/महिलांवर प्रतीबंध लादू पाहतो.
१२ वर्षा खालील मुलींवर बलात्कार करणार्‍यास म्रुत्यूदंड ची शिक्षा देण्याचा कायदा/ऑर्डीनंस मंजूर झालेला आहे.

२५. सुसूत्रीकरण व एकत्रीकरणाचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूणच बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियाना अंतर्गत आम्हाला समाजातील सर्वच घटकांचे सहाय्य गरजेचे आहे.
'स्वच्च्छ विद्यालये' योजने अंतर्गत, एका वर्षात, विक्रमी १.९ लाख स्वच्छतागृहे शाळेत फक्त मुलींसाठी बांधण्यात आलेली आहेत. मुलींची शालेय शिक्षण प्रवेश संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.

या आकडेवारी व्यतिरीक्त, सरकारच्या पोर्टल वर प्रत्येक विभाग, खाते, योजनावार कामाचा चार वर्षाचा प्रगती अहवाल Performance KPI Dashbaords ऊपलब्ध आहेत. माझ्या माहितीत तरी हे पहिलेच सरकार असेल ज्यांनी अशी माहिती व पोर्टल अतीशय ऊत्तम प्रकारे संकलीत करून आपल्या समोर ठेवली आहे. मोठ मोठ्या कॉर्पोरेट्स मध्ये देखिल असे KPI Dashboards पहायला मिळत नाहीत.
Governance- Transeprency- Accountability.!
पोर्टल ची लिंकः 48months.mygov.in
प्रत्येक 'जागरूक' नागरीकाने आवश्य या पोर्टल ला भेट द्यावी व सरकारचे प्रगतीपुस्तक पहावे.

आता राहिला प्रश्ण आगामी निवड्णुकांचा. ज्या प्रकारे कॉ. व ईतर मिळून रोज नव नविन कुरापती व निव्वळ दिशाभूल करत आहेत त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की देशाच्या भविष्यासाठी ना त्यांच्याकडे ठोस कार्यक्रम आहे ना एक नेता. सगळेच नुसते कळप करून गोंधळ माजवायचा प्रयत्न करत आहेत. जाट, दलित, मुस्लिम, आणि ईतर घटक ज्यांना गेली ६ दशके काँ च्या सत्तेत वोट बँक म्हणून वापरले गेले व मुद्दामून मागास ठेवले गेले. त्यांना पुन्हा हे काँ कडबोळे नविन गाजरे दाखवत आहेत. शेतकरी, छोटे व्यापारी, बिल्डर, सत्तेचे दलाल, सर्वांना मोदी हाच कसा त्यांचा एकमेव शत्रू आहे एव्हडाच प्रचार करण्यात सर्व पक्ष गुंतलेले आहेत. खुद्द एन डी ए मध्ये असलेले त्यांचे सहकारी पक्ष देखिल आता निव्वळ कुठल्याही पक्षा बरोबर सत्तेची समिकरणे जुळवण्या साठी आटापिटा करत आहेत.

या सर्व नकारात्मक प्रचाराचा व दिशाभूल करण्याचा काहितरी परिणाम होणार हे अपेक्षितच आहे. दुर्दैवाने आपल्या देशातील बहुसंख्यांना देखिल सरकारच्या कामाची, संपूर्ण माहिती नसते. ज्या काही थोड्या फार जणांना माहिती असते किंवा जाणून घ्यायचे प्रयत्न केले असतात त्यातील काही 'आदर्शवादी' असतात. काही स्वार्थी. तर तरूण वर्गातील जे आता मतदार असतील त्यांनी आधीच्या सरकराचा सवाळा गोंधळ व भोंगळ कारभार बघितलेला नसतो. ज्यांना बरीच माहिती असते ते वाद विवाद व ऑनलाईन चर्चा, वॅप यात मग्न असतात. देशभक्त कमी पण मोदी भक्त का गांधी परिवार भक्त असे वाद विवाद सर्वत्र दिसतात.

भाजपा व एन डी ए यांचे सर्वच निर्णय वा वागणूक दर वेळी योग्यच आहे असेही नाही. तेही चुकले असतील. पण ज्या प्रकारे गेल्या ५ वर्षात सुधारणा, सुविधा, प्रगती चा आलेख ऊंचावलेला आहे ते पाहता चुका सुधारून चांगले काम करून दाखवण्याची ईच्छाशक्ती, क्षमता, व नेतृत्व या सरकार मध्ये नक्की आहे हे स्पष्ट आहे. मोदी 'पडले' तर त्यांचे वैयक्तीक नुकसान शून्य आहे भारातातील एखाद्या राजकीय नेत्याच्या बाबतीत हे लिहायला मिळते हे ही नसे थोडके. भाजपा पक्षाचे नुकसान थोडे फार नक्कीच होणार. पण फार मोठे नुकसान देशाचे होईल हे नक्की. गेल्या सरकारच्या रखडलेल्या व दीरंगई झालेल्या कीत्त्येक कामांना या सरकारने मार्गी लावले. नुसते नितीन गडकरींच्या कामाची यादी द्यायची (Road Transport & Highways, Shipping and Water Resources, River Development) तरी एक वेगळा बाफ ऊघडावा लागेल ईतकी कामे पूर्ण केली आहेत. अगदी तसेच परराष्ट्रीय, सैन्य, रेलवे, ई. ईतर मोठ्या विभागांचे चित्र आहे. डिजीटल भारत व मोबाईल प्रणाली माध्यमातून दैनंदीन व अनेक निम सरकारी कामांच्या बाबतीत सर्वसामान्य माणसाच्या हातात आलेल्या अधिकार व स्वयत्ताता निश्चीतच सुखावह आहे.

नविन कुठलेही कडबोळे आले तर पदे, पोर्ट्फोलिओ, आणि त्यातून पैसा कमावायचे धंदे यासाठीच अंतर्गत कलह माजेल. नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर, सुशमा स्वराज, सुरेश प्रभू, निरमला सितारामन यांसारख्या अनेक लोकांनी अक्षरशः दिवस रात्र मेहेनत करून मा. मोदी यांच्या नेत्रूत्वाखाली केलेल काम, ऊभारलेला विकास व सुरक्षेचा भक्कम पाया आणि योजना या सर्वांना नव्या कडबोळ्या सरकार मध्ये खीळ बसण्याची किंवा कामांची दिशा पुन्हा बदलण्याची शक्यता जास्ती आहे. पारदर्शकता, जबाब्दारी, ऊत्तरदायीत्व हे सर्व गांधी परिवाराच्या पायाशी वाहणार्‍या संधीसाधू लोकांकडून नेमकी काय अपेक्षा असणार आहे हे वेगळे लिहायला नको. आणि पुन्हा सर्व ये रे माझ्या मागल्या.

'सबका साथ सबका विकास' मधला विकास तर निश्चीत दिसतो आहे. पण या सरकारला मिळालेला सबका साथ असाच पुढेही मिळेल का याचे ऊत्तर नजीकच्या काळातच मिळेल. एक जबाबदार नागरीक, मतदार, व व्यक्ती म्हणून आपली कर्तव्ये व सहभाग काय हे आपल्याला माहितच आहे.

सर्वांना व आपल्या देशाला अनेक शुभेच्छा!
ता.क: मोदी सरकारचे अतीशय चपखल विश्लेषण:
https://m.youtube.com/watch?fbclid=IwAR0k32bsY4Xdbt2EcKldp4e3mw2FRZaA1Xy...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

उत्कृष्ट लेख आणि संकलन योग !
मोदींना पर्याय नाही, कारण लालू, मायावती, अखिलेश, शरद पवार, गांधी-वद्रा कुटुंब हे महाठगबंधन सत्तेत आले तर देशाला रसातळाला नेतील हे स्पष्ट आहे अशी मांडणी अनेक ठिकाणी वाचतो. ते खरे असले तरी या लेखात आहे तशी सकारात्मक मांडणी जास्त आवडली.
धन्यवाद !

मुलायम म्हणतात मोदी परत पंतप्रधान बनावेत. आता बोला..!
<<

राष्ट्रीय जोकर राहुल गांधी व त्याच्या नेत्या/समर्थकांचे सध्या जे काय उद्योग सुरु आहेत ते पाहून मुलायम सिंग यांना, महाठग बंधनात सामिल सर्वच पक्षांना एकत्र मिळून देखील बहुमत मिळणार नाही याची खात्री पटली असावी म्हणनूच त्यांनी वरिल विधान झाले होते.

कुठल्या बाबतीत 'घोर' निराशा झाली ज्यामूळे दैनंदीन आयुष्य व विकासाचे मार्ग अडले>> मगिल ७० वर्शात यापैकी काय झाले होते यावर प्रकाश पाडाल का?? २०१४ नंतर भरपेट जेवायला, अंगावर ल्यायला आणि शिक्षण-नोकरी झालं का?? घोड्यावरुन प्रवास केलात की उंटावरुन??
Submitted by विठ्ठल on 13 February, 2019 - 12:12

हेच विचारायला आलो होतो... Happy

आणि क्लेम च्या वेळी किती खेट्या मारून, शेवटी पदरी निराशा पडलेल्यांचं प्रमाण किती, याच्या फायद्यासाठी एजंटांना, कंपनीच्या अधिकाऱ्यांना किती पैसे चारावे लागतात याची आकडेवारी?>>>>>

कोणी सांगितले हे सगळे? व्यक्तिगत अनुभव आहे? की आधीच्या सरकारी अनुभवांवरून बोलताय?

प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना ही बँक अकाउंट बेज्ड योजना आहे. ज्याचा विमा काढला गेला त्याचा मृत्यू झाल्यास बँकेत जाऊन एक अर्ज करायचा व सोबत मृत्यूचा दाखला जोडायचा. पैसे थेट खात्यात येतात. माझ्या घरी काम करणाऱ्या बाईचा नवरा गेल्यावर तिच्यासाठी फॉर्मची चौकशी करायला मी बँकेत गेले असता बँक कर्मचाऱ्याने स्वतः पॉलिसीचा प्रिंट वगैरे काढून, स्वतःच फॉर्म भरून तिची सही करवून जमा करून घेतला. 15 दिवस का महिनाभरात 2 लाख खात्यात जमा झाले. एकही खेटा घालावा लागला नाही.

हे सगळ्या बँकांना सक्तीचे केलेले असूनही गावी याचा तितकासा प्रचार झालेला नाही, बँकानिही दुर्लक्ष केलेले आहे.

सनव, तुम्ही कुठली वृत्तपत्रे वाचता यावर तुम्हाला कुठल्या बातम्या वाचायला मिळणार हे अवलंबून आहे. भारताबाहेर राहणारे बरेचसे भारतीय मीडियात येणाऱ्या बातम्या वाचून अंदाज बांधतात. भारतात अराजक माजलेय असे त्यांना वाटत असेल तर नवल नाही Happy Happy

फुकटयांना नावे ठेवताना भक्तांना गॅस सबसीडी घेताना लाज वाटत नाही >>

इथल्या किती अभक्तांनी सबसिडी सोडली ते सांगा. त्यांनी इतर गरीब अभक्तांसाठी एवढा त्याग करायला हवाच.

या सरकारची एक गोष्ट मला आवडली ती ही की बहुतेक योजना कोणाच्याही नावावर नाहीयेत. दीनदयाळ किंवा अटल योजना वगैरे फार थोड्या योजनांना व्यक्तींची नावे दिलेली आहेत. अर्थात त्या व्यक्ती तितक्याच मोठ्या होत्या. नाहीतर या आधी सगळ्या योजना इंदिरा नाहीतर राजीव. काँग्रेस पक्षात कुणी दुसरे नेते नव्हतेच.

मोदींना पर्याय नाही, कारण लालू, मायावती, अखिलेश, शरद पवार, गांधी-वद्रा कुटुंब हे महाठगबंधन सत्तेत आले तर देशाला रसातळाला नेतील हे स्पष्ट आहे अशी मांडणी अनेक ठिकाणी वाचतो.>>>>>

सहमत. पवार नेहमीसारखे यु टर्न मारून आखाड्यात उतरले. हा माणूस स्वतः काय बोलतो हेही लक्षात ठेवत नाही काय?

प्रियांकाबद्दल काहीही माहिती नाही त्यामुळे मी बोलू इच्छित नाही पण राहुलचा एकूण आविर्भाव असा असतो की आता सहा महिने देशात घालवायचेच तर करूया जरा गम्मत, देऊया दोन भाषणे.. कंटाळा आला की जायचे वेकेशनवर.

>>भारताबाहेर राहणारे बरेचसे भारतीय मीडियात येणाऱ्या बातम्या वाचून अंदाज बांधतात. भारतात अराजक माजलेय असे त्यांना वाटत असेल
ऊलट आहे! भारता बाहेर राहून जास्त संतुलीत बातम्या व माहिती मिळते.

कुठल्या बाबतीत 'घोर' निराशा झाली ज्यामूळे दैनंदीन आयुष्य व विकासाचे मार्ग अडले

>> “१९.१.२०१४ रोजी, परवानगी नाकारलेली असतानाही हिंदू राष्ट्र सेनेने जाहीर सभा घेतली आणि या अर्जदाराने त्यामध्ये भाषण दिले. त्या भाषणात त्याने मुस्लिमांच्या विरोधात हिंदूंमध्ये द्वेषाची भावना निर्माण केली. त्याची भाषा केवळ हिंसकच नव्हती तर अर्जदाराने घटनाबाह्य भाषण केले होते. सदर भाषण लिखित स्वरूपात आरोपपत्राचा भाग आहे. लोकांना धार्मिक आधारावर मुस्लिमांविरुद्ध युद्ध छेडण्याचे आवाहन करण्यात आले होते. समाजातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात होता,” असे २०१६ मध्ये न्यायमूर्ती जाधव यांनी नमूद केले होते.

२ जून २०१४ रोजी झालेल्या शेखच्या हत्येमागचा सूत्रधार म्हणून एका लहान गटाचा नेता असलेल्या देसाईचे नाव पुढे आले. शेखचा भाऊ, मुबीन हा प्रकरणी तक्रारदार आणि महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याच्या सांगण्यानुसार तो आणि मोहसीन तसेच इतर काही मित्र हडपसर येथील एका मशिदीमध्ये नमाज पढण्यासाठी गेले असताना मशिदीच्या बाहेर माणसांचा एक मोठा जमाव जमा झाला. या लोकांनी देसाईच्या आदेशावरून हल्ला केला असे आरोपपत्रामध्ये नमूद केले आहे.

मोहसीन आणि रियाज यांचा पठाणी शर्ट आणि डोक्यावरची टोपी यामुळे त्यांची धार्मिक ओळख स्पष्ट होत होती. हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या छोट्या रस्त्यांवरून मोहसीन आणि रियाजचा पाठलाग करत हॉकी स्टिकने त्यांना मारले. रियाज पळून जाऊ शकला, मात्र एका हल्लेखोराने सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारल्याने मोहसीनचा बळी गेला.

मोहसीन शेख

मोहसीनचा एकतीस वर्षांचा लहान भाऊ मुबीन हा सोलापूर या त्यांच्या मूळ गावी एका खाजगी फर्ममध्ये नोकरी करतो. तो म्हणाला, आमच्या कुटुंबावर एकामागोमाग एक संकटे कोसळत आहेत. कुटुंबातील तरुण मुलगा असा जमावाच्या द्वेषाला बळी पडल्याच्या धक्क्यातून सावरणे कठीण आहे.

“त्या दिवशी आमच्या कुटुंबातला मुलगाच फक्त गेला नाही तर कुटुंबाचा आनंदाचा ठेवाच आम्ही गमावला. भाई (मोहसीन) आमच्या कुटुंबासाठी आशेचा किरण होता. तो अतिशय हुशार होता आणि त्याच्या कुटुंबावर त्याचे अत्यंत प्रेम होते. आम्ही मोठे होऊन आर्थिक भार उचलायला लागल्यानंतर आमचे पालक, विशेषतः आमचे वडील आता आयुष्य थोडे आरामदायी होईल अशी आशा करत होते,” मुबीन म्हणाला.

शेखचे वडील मोहम्मद सादिक यांचे दीर्घ हृदयविकाराने डिसेंबरमध्ये निधन झाले.

आता जवळजवळ पाच वर्षे झाली आहेत परंतु खटल्यामध्ये फारशी प्रगती नाही. अटक झालेल्या २१ आरोपींपैकी देसाईंसकट १९ जण आता जामिनावर बाहेर आहेत. सादिक यांच्या आग्रहामुळे त्यावेळचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना या केसवर नियुक्त केले होते. परंतु निकम हे कोणतेही स्पष्ट कारण न देता केसमधून बाहेर पडले. २०१७ मध्ये देसाईने सुटकेकरिता दाद मागितल्यानंतर उच्च न्यायालयाने सुनावणीला स्थगिती दिली.

भारत नेट प्रोजेक्ट किंव्हा भारत ब्रॉडबँड नेटवर्क प्रोजेक्ट हे एक उत्तम उदाहरण आहे कि मोदी सरकारने कसे काम केले आणि UPA सरकराने काय केले. भारत नेट ह्या प्रोजेक्ट चे आधीचे नाव नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क असे होते जे २०११ ला प्लॅन केले , २०१२ ला त्या साठी स्पेशल पर्पज व्हेइकल बनवली ज्या मध्ये फेज १ मध्ये साधारण ३ लाख किलोमीटर चे ऑप्टिकल फायबर ची केबल टाकून गांवामध्ये इंटरनेट पोहोचवायचे होते , २०१२ ते २०१४ मध्ये फक्त (फक्त ) ३५० किलोमीटर चे काम केले गेले.. हि होती UPA सरकारची कामगिरी आणि मोदी सरकारच्या काळात फेज १ २०१४-२०१७ ह्या ३ वर्षा मध्ये पूर्ण ३ लाख किलोमीटर चे काम पूर्ण झाले . फेज २ मध्ये ३ लाख ५० हजार किलोमीटर चे काम पूर्ण क्षमतेने सुरु आहे जे २०१९ च्या शेवटी पूर्ण होईल. भारत सरकारने १ लक्ष गावांमध्ये फ्री वायफाय हॉटस्पॉट साठी काम ऑलरेडी सुरु केले आहे , जे इंटरनेट २०१४ च्या आधी २०० रुपये पर गीबी भेटत होते तेच आता १०-२० रुपया मध्ये भेटू लागले आहे ..इंटरनेट चा स्पीड सुद्धा वाढला आहे , एवढाच काय आता आपले आजोबा आणि आज्जी पण वव्हाट्सअप आणि fb वापरत आहेत . डिजिटल इंडिया , कॅशलेस सारखया उपक्रमानं मुळे आज खूप लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे , उबेर , ओला , झोमॅटॊ , swiggy , urbanclap , ऍमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या गोष्टी आता सेमी रूरल एरिया मध्ये सुद्धा पोहचल्या आहेत . शिक्षणाच्या क्षेत्रात अटल टिकरींग लॅब सारख्या उपक्रमांमुळे मोठी क्रांती होणार आहे ..ज्यांना खात्री कार्याची आहे त्यांनी खालील दोन पेज ला जरूर भेट द्यावी..
https://en.wikipedia.org/wiki/Bharat_Broadband_Network
https://aim.gov.in/atal-tinkering-labs.php

साधना on 13 February, 2019 - 21:16>>
योजनांना नावे नसतीलही कदाचित पण कुठेही गललीबोळात, पेट्रोलपंप, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट सगळीकडे तुमचा देव दिसत, हसत, बोलत, मंकी बात करीत असतो त्याचं काय? इतक्या जाहिरातींचा तर तुम्हालाही वीट आला असेल पण बोलायची चोरी.

इथल्या किती अभक्तांनी सबसिडी सोडली ते सांगा. त्यांनी इतर गरीब अभक्तांसाठी एवढा त्याग करायला हवाच.

निदान भक्तांनी इतर गरीब भक्तांसाठी त्याग ( गॅस सबसिडीचा) करून अभक्तांसमोर आदर्श ठेवावा अन्यथा गमजा मारणे बंद करा .

काँग्रेसच्या काळात आमदारांचा पगार 50000 होता, फडणवीस भाजप सरकारने तो दीड लाख केला,

अन ह्यांचे नेते अमुक सवलत सोडा वगैरे बडबडत असतात.

हेच विचारायला आलो होतो... Happy
Submitted by संदीप डांगे on 13 February, 2019 - 21:25 >> भक्त लोकं अशावेळी फक्त मंकी बाथ करतात

काँग्रेसच्या काळात आमदारांचा पगार 50000 होता, फडणवीस भाजप सरकारने तो दीड लाख केला,

अन ह्यांचे नेते अमुक सवलत सोडा वगैरे बडबडत असतात.>>>>>> पण एक गंमत जंमत सांगु का? एरवी सरकारच्या नावाने शिमगा करणारे विरोधक , आमदार - खासदारांचा पगार - पेन्शन वाढली की हसत हसत एकत्र होतात बरं का. त्यावेळी आमचा पगाल का वाल्ला हो, जला कमी कला की, आमचे भत्ते कमी कला की असे कधी सरकारला सांगतात का? नाही ना?

भाजपा सत्तेवर असली की सगळ्यांची मज्जा आणी कॉन्ग्रेस असली तरी सगळ्यांची मज्जाच. हे सगळे राजकीय नेते एकमेकाला सामिल असतात आणी तुमच्या आमच्या सारखे एकमेकांच्या शाब्दिक झिंज्या उपटत बसतात. आता भाजपाने पगार वाढवल्यावर एकट्या त्यांच्याच आमदारांचा वाढला का? विरोधकांचा वाढला नाही का? पगार वाढला की सगळे तेरी भी चूप, मेरी भी चूप करतात.

मागे लालुबिटवा सत्तेत असतांना त्यांनी स्वतःच्या कुटूंबीयांना पण रेल्वेचा तहहयात पास मंजूर करुन घेतला.

कोणालाच क्लीन चीट नाही. सगळे एका माळेचे मणी. यातुन कोणी पं. लालबहादूर वा वल्लभभाई वा वाजपेयी निघतील याची अपेक्षाच नाही.

वाजपेयींचं नाव चांगल्या नेत्यांमध्ये जोडुन द्यायचं ही लेटेष्ट कुज्बुज मोहिम Lol

लेखाबद्दल सहमत, अनेक चांगल्या योजना आणल्यात आणि कामे पण होत आहेत
ह्या सरकार कडून , एकूण सकारात्मक बदल आहे देशात. परत ह्या सरकारला संधी द्यायला हरकत नाही
आधिच्याला ४०-५० वर्ष दिलीच ना

>> हो, शास्त्रीजींचे मरण अनैसर्गीक होते ही जशी कुजबूज आहे ना अगदी तस्सेच बरका .

Yet another shifting of goalpost Proud

Pages