जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण एका सिरियलमध्ये व्हिलनचा रोल तिला अजिबात जमला नव्हता>> माझे मन तुझे झाले मध्येपण होती, शेखरची मैत्रीण दाखवलेली. बरा केलेला रोल तिने.

सध्या काय दळण चालूये या सिरीयलमध्ये? बाबाजी उठसूठ देसाई वाडीत का येतात त्या अर्चूच्या इन मीन एका खोलीवर कब्जा करायला? (अर्थात ते जोडपं खालीच असतं म्हणा) आता फाच आणि बाबाजी समोरासमोर भिडणार बहुदा! बाबाजीच्या जीवाला नवा घोर!

त्यावरच खूप टीका झाली होती, dreamgirl. तोच तोचपणा, तेच चक्कर येऊन पडणं, तेच तेच डोळ्यातले भाव (तिथेच ती नंतर व्हिलन झाली). असो.

ही खरंच शेवटची पोस्ट.

कुठल्याही कॅरॅक्टरमधे पण गुणी अभिनेत्री आहे योग्य संधी मिळावी.>>>> +1000

<<<<<पण भाऊ कदम, कुशाल बद्रिके,सागर कारंडे या सगळ्यांना बरोबरीने साथ देते कुठेही कमी पडत नाही हे महत्वाचं.>>>>> +10000

अन्जू , तेच तर ना. तिला योग्य संधी मिळायला हवी. पोटेंशियल आहे तिच्यात

परवा एक सीन पाहिला -
बाबाजी म्हणत होते - "रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर? आधी अँजिओग्राफी, मग अँजिओप्लास्टी, मग जय हो!" Biggrin

जाम आवडलं हे वाक्य! उदय टिकेकर 'जय हो' चा वापर फार छान करतो!

आधी अँजिओग्राफी, मग अँजिओप्लास्टी, मग जय हो!">> हो खूप हसलेले ते वाक्य आणि त्यांचे भेदरलेल्या सशासारखे एक्स्प्रेशन्स बघून!

आधी अँजिओग्राफी, मग अँजिओप्लास्टी, मग जय हो!">> हो खूप हसलेले ते वाक्य आणि त्यांचे भेदरलेल्या सशासारखे एक्स्प्रेशन्स बघून!+१

हो ते जय हो चे टाईमिंग आणि बाबाजींचे तेव्हाचे एक्स्प्रेशन भारी होतं Proud

आज देसाईवाडी १०० वर्षे सेलिब्रेशन सुरु झालं, आता २,३ दिवस बहुतेक ते पुरणार ..
मग त्यात शेवटी आदित्य नगरकरची धडाकेबाज रीएंट्री होणार,
बाबाजीची मग जय हो दातखिळ बसणार Lol

ही सिरीयल नाही संपत. नवीन सिरीयल संध्याकाळी ७.३० ला आहे. कन्यादान असते का तेव्हा? ती संपतेय. आत्ता प्रोमो दाखवले नवीन सिरीयल 'नांदा सौख्य भरे' चा. त्यात चिन्मय उदगीरकर आहे.

आयटी गर्ल, मस्त आणि खरं लिहिलंय.

नंतर सर्व पाणी सिरीयलमध्ये. अर्थात मी काही दिवस बघितली. त्या मेघनामुळे मी नाही बघू शकले. एखादा महिना बघितली असेल, नसेल.

बर झाल ती कन्यादान संपते आहे ते, त्या नव्या हिरवीणीच बोलण सहन करण्यापलिकडच आहे... काही जोरच नाही राव! एकसुरी, एकाच लयीत संवाद टाकत असते...

इतक्यात? जानेवारीत सुरु झाली होती ना हि मालिका? कदाचित कमी टीआरपी सहा महिन्यात मालिकेचा गाशा गुंडाळला! इतक्या लवकर संपणारी झी मराठीवरची हि पहिलीच मालिका असेल!
पण मग या मालिकेत आता आणखी किती पाणी घालणार आहेत? उरल आहे काय यात आता? हि मालिका सुध्दा करा ना बंद.

असं कसं? आता आदित्य नगरकर येणार. मग बाबाजी बळंबळं मेदे वर संशय घेणार. आन च्या मनात चलबिचल. नॉर्मल सिरिअल्सच्या ट्रॅकप्रमाणे जायचं असेल तर आदे आणि मेदे मधे आन फूट पाडायला बघणार. काही घटना अश्या घडणार की मेदे बद्दल आपल्याला पण संशय वाटायला लागणार. मग सरतेशेवटी आपला जीव जाईतो ताणल्यावर मेदे आन ला प्रेमाची थोरवी सांगणार, आदे चे गुण गाणार. आन चे डोळे उघडणार. मेदे अंजलीला कन्विन्स करणार की आन तिच्यासाठी योग्य पार्टनर आहे. मग देवा मधे अजून एक लग्नसोहळा! भरपूर भाग होतील हे सगळं दाखवायचं असेल तर. Happy

त्या अन्जलीच्या चेहेर्‍यावर माशीला पण बसायची ईच्छा होणार नाही, घसरुन पडेल ती. जेव्हा बघाव तेव्हा एकच भाव असतो चेहेर्‍यावर, मख्ख!

ए, पण त्या शंभरीनिमित्त जे पिढ्यांचं नाटक दाखवलं होतं त्यात सर्वांचीच कामं मस्त झाली होती. अर्चना आणि सतिशने हुबेहुब नाना आणि माई वठवले.

काल मेदे आदेला सांगताना म्हणाली -अँकी म्हणजे आदित्य नगरकर, मला वाटलं म्हणेल - माझा आदू......

त्यावर आदेचा रिप्लाय - आपला आदित्य , खरतरं त्यानेही तुझा आदू म्हणायला हवं होतं Wink

रच्याकने - टाइम लाइनचा जरा गोंधळ झालायं ना, आन आजारी होता मग निघून गेला, नंतर तो त्या अनिलचा मित्र झाला , मग त्या अनिलचा अपघात झाला.

वट पोर्णिमेला आदेच्या मनाने कौल दिला, त्यानंतर आनची एंट्री होती बरोबर ? त्या उण्यापुर्‍या वर्षात एवढं घडलं आणि त्या जानीचं अजून पोट काही दिसतं नाहीये, का तिच्या अनुभवी सासवांना काही अंदाज येत नाहीये Wink

प्राजक्ता.. काल तिच्या सख्ख्या सासुला थोडासा अंदाज आला, म्हणत होती की चेहर्‍यावर तेज दिसतय म्हणुन.. नंतर स्वतःच म्हणाली की मला आजी होण्याचे डोहाळे लागलेत, तुमच तुमच्या मनाप्रमाणे होउ दे वै वै.. अवांतराबद्दल सॉरी...

वट पोर्णिमेला आदेच्या मनाने कौल दिला, त्यानंतर आनची एंट्री होती बरोबर ? >>>> वटपौर्णिमेला मेदेच्या मनाने कौल दिला आदेच्या बाजुने.. त्याच्याआधी आन येउन, आदेला भेटुन, आजारी होउन दवाखान्यात पडुन, तिथुन अचानक गायब होउन झालय.

नाही मुग्धा हे वटपौर्णिमे नंतर झाले. कारण मी मालीका त्या नंतरच बघायला लागले आणि आन चे हॉस्पीटल प्रकरण मी पाहिले आहे.

हो हो, अनुभवी असल्याने नर्मदेला जरास्स्स्सा अंदाज आला असावा Wink

इन फॅक्ट, मेदेचा वाढदिवसही त्यांनी लग्नानंतर दाखवला होता आणि तो पण जोरात साजरा झाला होता, ह्या वेळी फुकट त्या कॉलेजप्रेमीचं प्रकरण घुसडलं.

आदित्य नगरकर, मला वाटलं म्हणेल - माझा आदू...
>>
+१

आन हॉस्पिटलात होता तेंव्हा देसायांनी त्याला पाहिलेलं की नाही?

आन या आधी एकदा देसाईवाडी मधे येऊन गेला होता. बहुदा कोजागिरी पौर्णिमेला. मेघनाची आणि त्याची चुकामुक झाली.

देसायांना आन आणि आनला देवा लक्षात नाही ??? कशी काय बुवा? Uhoh

अग नाही नताशा.. आन आदेच्या समोर मेदेने आदेवरच्या प्रेमाची कबुली देण्याच्या आधी आला.. कारण आदे आणि आनची ओळख झाल्यावर एकदा आदे, मेदे बाहेर गेलेले असताना हा त्यांच्या समोर येतो. आदे आनला ही माझी बायको म्हणुन मेदेची ओळख करुन देतो. घरी आल्यावर मेदे सांगते की हाच आदु.. तेव्हा आदे शॉक्ड दाखवला आहे.. कारण त्याला कुठेतरी अस वाटल होत की मेदे त्याला सोडुन जाणार नाही, पण आन समोर आल्यावर तो इन्सिक्योर होतो..

रीया देसायांनी आनला नव्हत पाहीलेल.. माई त्याला बघायला हॉस्पीटलात जाणार त्या दिवशीच तो गायब होतो.. पण आनला दे.वा लक्षात नाही म्हणजे हैटे

Okz

तसंच असणारेय

म्हणजे लेखकापेक्षा आपण जास्त जोडले गेलेलो आहोत की काय मालिकेशी? Proud

आन कधी आला होता देवातं ? एकदा मेदेला स्वप्न पडलं होतं की आन आला आहे म्हणून ती दार उघडते पण तो नसतो.

Pages