अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिर्ची, तुम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. जरा सांभाळून. .......

10 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत त्यानंतर सविस्तर प्रतिसाद देता येईल.

जिते तो मोदी हारे तो बेदी
सगळ्या चैनल्सवर भाजपातर्फे चालू आहे
बघायला फारच मज्जा येत आहे

हायला, सगळ्या पोल्सनी आप ला स्पष्ट बहुमत दिलेलं असतानाही भाजपाचे लोक "आम्ही जिंकणार, पोल्सवर विश्वास ठेवू नका" असं का आणि कशावरून सांगत आहेत बरं ??? EVM सोबत छेडछाड ?? :चिंताग्रस्त बाहुली:

निवडणुकी नंतर सगळ्या ईव्हीएम मशीन्स केजरीवालांच्या घरीच पोहोचवायल पाहीजे होत्या अन्यथा हा मोठा धोका होईल हे निवडणुक आयोगाच्या लक्षात कसे काय लक्षात आले नाही व्बा ?

काही झाल तरी दिल्लीच्या विरोधी पक्ष नेते पदावर मात्र कॉग्रेसच दावा करणार आहे.

काही झाल तरी दिल्लीच्या विरोधी पक्ष नेते पदावर मात्र कॉग्रेसच दावा करणार आहे >>> अहो तोआअधिकार बेंदीचा आहे....त्या तयार नाहीत तर जेटलींना बसवा Happy

Wink Wink Wink

आप आता दिल्लीत येईल हे जवळ जवळ नक्की झालय, आणि तो एक वेल डिझर्व्ड विजय असेल.

ईथपर्यंत ही निवडणुकीची लढाई होती आणि त्यामुळे भाजपानेही आपविरुद्ध निकराने लढत दिली. आपला हा विजय सहजा सहजी मिळाला नसल्याने त्यांना ह्या विजयाच महत्व कळाव अशी अपेक्षा आहे.

ह्या विजयामुळे आप आता दिल्लीत विकासाच्या कामाकडे लक्ष देईल आणि देशात जरी नाही झाला तरी दिल्लीत मात्र भ्रष्ट्राचार मुक्त सर्वसमावेशक विकास होईलच. धरणे, बंद करुन काम होणार नाही तर, विकास कामे सर्व समावेशकच व्हायला हवीत, सर्व समाजाला धरुन अन्यथा आंध्र प्रदेशाचे पुर्व मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडु यांच्या
एका ईंनिंग्स सारख होईल. परत चांस मिळणार नाही.

भाजपने केंद्र सरकारवर लक्ष केंद्रित करुन विकासाची कामे पुढे न्यावीत ह्या कामाला ५ वर्षेतर पुरणार नाहीतच पण पुढच्या ५ वर्षाचा कौल मागण्यासाठी काहीतरी करुन दाखवलेल असल पाहीजे.

समाजाला धरुन अन्यथा आंध्र प्रदेशाचे पुर्व मुख्यमंत्री नरेंद्रबाबू नायडु यांच्या>>>

कोण हे नरेंद्रबाबु नायडु?

Wink Wink Wink

Wink

इव्हीएम टेंपरींगबद्दल जे काही बोलायचं ते अधिकारी संस्थेनं बोललेलंच आहे, निर्णयही दिलेले आहेत. माझ्या मते तेव्हां अण्णा, केजरीवाल एकत्र होते (२०१२) पण त्यांच्या दृष्टीने हा इश्यू महत्वाचा नव्हता. आता बोललं तर त्याला अर्थ राहणार नाही. पण मिर्ची यांची भीती दिल्लीत तरी निराधार ठरेल असं नक्की वाटतं.

भाजपला जर वर्षानुवर्षे पकड बसवायची असेल तर देशातले काँग्रेससहीत इतर पक्ष अडगळीत जाऊन त्या जागी मनाजोगता विरोधी पक्ष म्हणून आप यायला संघाची पसंती आहे. मतदानाच्या आधीच प्रचाराबद्दल नाराजी व्यक्त करून संघाने आपचा विजय सूचित करणे हे चुकून घडलेले नसावे.

आपचं घोडं गंगेत, आयमिन यमुनेत नहाणार तर...

सुरुवाती पासुनच मला अके, "खाली मुंडी पाताळ धुंडी" या प्रकारातला वाटत आला आहे. त्याने समर्थकांवर काय जादु केली आहे कोण जाणे, पण यावेळेस त्यांचा अपेक्शाभंग होउ नये अशी आशा बाळगुया.

मिर्ची बद्दल काय बोलणार? निकाल काहिहि येवो, "खुब लढी मर्दानी..." एव्हढंच म्हणावसं वाटतंय... Happy

भाजपा फारच डिफेंसिव झाली
काँग्रेस हारली यातच आनंद मानत आहे
आज टिव्हीवर भाजप नेत्यांचे वक्तव्य ऐकून फारच हसू येत आहे
मज्जा येत आहे 10 तारखेपर्यंत असेच चालू राहणार

अरे हो, खरंच!
पण ते अंधारातचे मुख्यमंत्री होते ना, वर कुणीतरी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री लिहिलं त्यामुळे लक्षात आलं नाही.

बहुमतांचा बहुवर्षांचा माज उतरला !!

० ते २ जागा मिळाव्यात अस पोल सांगतोय, म्हणुन आता निष्ठा बदलल्यात !!

Rofl

:G:

https://twitter.com/alok_bhatt

Alok Bhatt ‏@alok_bhatt

Iam down but we are not out.....Delhi, we have the mandate to rule India until 2019....we are here to stay and we will see u cry....

Alok Bhatt @alok_bhatt · 12h 12 hours ago

We are running govts in some of tbe biggest states and are the ruling party at the centre.....Delhi is just a glorified municipality...Chill

आज सुबह के अख़बारों में
कमाल हो गया।
केजरी-केजरी कहते थे जिसे
वो श्री अरविन्द केजरीवाल हो गया।
Lol

<<भाजपला जर वर्षानुवर्षे पकड बसवायची असेल तर देशातले काँग्रेससहीत इतर पक्ष अडगळीत जाऊन त्या जागी मनाजोगता विरोधी पक्ष म्हणून आप यायला संघाची पसंती आहे.>>

संघाची पसंती असली तरी (संघ सांप्रदायिक तणाव वाढवत राहिला तर) आप ची पसंती नसणार. परवाच एका मुलाखतीमध्ये (बहुतेक रवीशकुमारसोबतच्या) अकेनी सांगितलं.
रवीश - "आरएसएस कैसा संघटन है?"
अके - "सांप्रदायिक"
रवीश -"सत्ता में आयेंगे तो आप आरएसएस से लडेंगे?"
अके - "आरएसएस से क्यों लडेंगे? सांप्रदायिकता से लडेंगे ."
मला वाटतं, मुद्दा पुरेसा स्पष्ट आहे.

<<सुरुवाती पासुनच मला अके, "खाली मुंडी पाताळ धुंडी" या प्रकारातला वाटत आला आहे. त्याने समर्थकांवर काय जादु केली आहे कोण जाणे, पण यावेळेस त्यांचा अपेक्शाभंग होउ नये अशी आशा बाळगुया.>> Lol

गावाकडच्या सासवांच्या तोंडून सुनांबद्दल बोलताना ऐकली आहे ही म्हण Proud
केजरीवाल कसा का असेना, आपल्याला काय करायचंय? आपण मुद्दे बघायचे. मुद्दे बाजूला राहत आहेत असं वाटलं की केजरीवालांनाही विरोध करायचा.
त्यांचे हावभाव, बोलण्याची-हसण्याची लकब, त्यांचा खोकला, त्यांचा मफलर, त्यांची जीवनशैली....आय सिंपली डोण्ट केअर फॉर धिस !

विरोधकांनी केलेल्या सगळ्या टीकेमधून एक खणखणीत सत्य शिल्लक राहतं --- केजरीवाल प्रामाणिक आहेत आणि निडर आहेत. वाट्टेल त्या परिस्थितीवर मात करण्याची क्षमता आहे. लोकसभा निकालानंतर जेव्हा सगळे आपचं नाव ऐकताच टर उडवत होते, हसत होते, तेव्हा कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवून दिल्लीत ३०,००० नवीन कार्यकर्ते उभे करण्याइतकं संघटनकौशल्य आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची टीम. साधू-साध्वींपेक्षा एक्स-बँकर, एक्स-अ‍ॅपल-सीईओ, सीए, आयआयटीयन्स, डॉक्टर्स, निडर पत्रकार ह्यांचीच मी निवड करीन. माबुदोस.
मला हिंदू धर्म नष्ट होण्याची भिती वाटत नाही, संस्कृती रसातळाला चाललीये असंही वाटत नाही. त्यामुळे ज्यांना ह्या गोष्टींसाठी रान उठवणारे आवडतात त्यांना आवडू दे.

<<मिर्ची बद्दल काय बोलणार? निकाल काहिहि येवो, "खुब लढी मर्दानी..." एव्हढंच म्हणावसं वाटतंय...>>

ओ राजभौ, मी मायबोलीवर कीबोर्ड बडवल्याने दिल्लीच्या निवडणूकांवर टीचभरतरी परिणाम झाला असेल का??? Proud
हे आपलं उगीच, स्वान्तसुखाय.

<<देल्ही इज जस्ट अ ग्लोरिफाईड मुनिसिपालिटी>>

अगदी अगदी. म्हणूनच सगळे अतिरथी-महारथी उतरवले होते दिल्लीत Wink

<<केजरी-केजरी कहते थे जिसे
वो श्री अरविन्द केजरीवाल हो गया।>> Lol

रच्याकने, इंग्रजीतून लिहिलेलं वाक्य कोट करताना काय करायचं? नुसतंच << >> असं दिसतं Uhoh

Pages