रीतीरीवाज

Submitted by admin on 12 January, 2009 - 23:47

धार्मिक रीतीरीवांजाबद्दलचं हितगुज

या अगोदरचं हितगुज इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक शंका आहे.
घरातील वृद्ध व्यक्तीचा(आजी/आजोबा) मृत्यू झाल्यास घरातील तरूण व्यक्तीचा(नात/नातू) विवाह एक वर्षाच्या आत किंवा तीन वर्षांनीच करता येतो.....याबद्दल कुणी मार्गदर्शन करेल का?
कारण अ‍ॅरेंज मॅरेजमधे जर समजा एक वर्षाच्या आत लग्न ठरले नाही व पुढील वर्षात ठरले तर नियमाप्रमाणे तीन वर्षे थांबण कसं काय जमेल?
प्लीईईईईईईईईईईईज कुणी सांगेल का?

थांबायची आवश्यकता नाही. मेलेल्या लोकांचा आणि जिवंत लोकांच्या लग्नाचा काहिही संबंध नाही. लोकलाजेस्तव आणि शोकग्रस्त असल्यामुळे अनेकदा लगेच विवाह केल्या जात नाही. सक्ती मात्र कोणतिही नसते. त्यामुळे निर्धास्त व्हा.

मानुशि, शास्त्रकारान्नि काहिएक कारणाने काहि मर्यादा घालुन दिल्यात, ती कारणे जाणुन घेण्याचि गरज नाहि. त्यान्नि अभ्यास केला, तेव्हा आपण करण्याचि गरज काय ? तोच अभ्यास परत करुन आधि शिव्या घालत आणि शेवटि "वैज्ञानिक सन्शोधनाने" कोणास ते सत्य आहे वा असत्य असे सिध्द करण्यात वेळ-काल अथवा आपले सम्पुर्ण आयुश्य घालवायचे असल्यास वाया घालोत बापडे. पण हे करायचे नसल्यास तसे न करता आपल्या रुढि, परम्परा यान्चे भक्तिभावपुर्वक अनुकरण केल्याने कोणास काय फायदे झालेत याचि उदाहरणे मिटल्या डोळ्यान्नाहि दिसतिल इतक्या प्रमाणात आसपास आहेत. त्यान्कडे "जाणिवपुर्वक" दुर्लक्ष करुन, त्यान्चा "अनुल्लेख" करुन स्वताहा विचार करुन वागणारे व स्वताहाला पुरोगामि बुप्रावादि म्हणवणारे अशा परम्परा पाळणार्यान्ना मात्र अन्धानुकरण म्हणतात हे मोठे अचम्बित करणारे आहे. स्वताहा विचार करुन त्यानुसार वर्तन करुन रुढि तोडणार्यान्चे ग्रह कसे फिरतात, का फिरतात हा एका वेगळ्या बाफचा विशय नाहि, कारण त्यात लिहिण्यासारखे फारसे नाहिच. ते असो. तेव्हा स्वताहा फार विचार न करता शास्त्रात जे सान्गितले आहे ते आपले भक्तिभावपुर्वक पाळावे व आपल्या धर्माच्या रुढि-परम्परा यान्चे आमरण आचरण करत रहावे असा माझा सल्ला हे.

ती कारणे जाणुन घेण्याचि गरज नाहि. >> का बरं? ह्या बंधनामागे काय कारण आहे, हे का नाही विचारायचे? घरात मृत्यू झालेला असताना, एक वर्ष कोणते सणही साजरे केले जात नाहीत, पण लग्न केलेले चालते. आणि वर्षानंतर जेव्हा सगळे पूर्वपदाला आलेले असते, तेव्हा मात्र लग्नासारखे शुभकार्य का नाही करायचे? ते तीन वर्ष लांबवण्यात काय शास्त्रार्थ आहे? काही अडचणी असतील, तर थांबणे ठीकही आहे, पण केवळ मृत्यू झालाय म्हणून लग्न करता येणार नाही- ह्यात काय लॉजिक आहे? उद्धटपणा म्हणून नाही, अगदी जेन्यूईन प्रश्न आहे.

आशिषचे पटले. लग्न ठरले असेल, आणि बाकी काही अडचण नसेल, तर जरूर करावे. तसंही लग्न ठरल्यानंतर जास्त काळ थांबू/ थांबवू नये असंही आपल्या परंपरा सांगतातच.

घरातील वृद्ध व्यक्तीचा(आजी/आजोबा) मृत्यू झाल्यास घरातील तरूण व्यक्तीचा(नात/नातू) विवाह एक वर्षाच्या आत किंवा तीन वर्षांनीच करता येतो.....याबद्दल कुणी मार्गदर्शन करेल का?
>>> याला कुठलाही शास्त्राधार नाही. शक्यतो एक वर्षाच्या आत लग्न करतात कारण घरामधे एका नविन माण्साने येण्यामुळे दु:ख विसरायला मदत होते. लग्नासारख्या आनंदी प्रसंगाने सर्वाचेच प्रसन्न होते. मात्र असे लग्न झाले नाही तर तीन वर्षे वगैरे थांबायला लागत नाही. मेलेला माणूस तवर पुढे गेलेला असतो... वर्षश्राद्धानंतर त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळायचे अथवा पुनर्जन्माचे मार्ग सुरू होतात. त्याचा या घरातल्या तरूणाच्या लग्नाशी काहीही संबंध उरलेला नसतो.

शास्त्राने सान्गितले आहे तिथे प्रत्येक वेळेला का, कसे, केव्हा कधि असले अतिचिकित्सक प्रश्न विचारत बसणे ह्यात फार अर्थ आहे असे मला वाटत नाहि. हिन्दु धर्मातिल फार मोठमोठ्या ऋशि-मुनिन्नि हजारो वर्शे अध्ययन/अध्यापन/चिन्तन/मनन/सन्शोधन करुन जे ज्ञानाचे अर्क काढले ते "सर्वसामान्यान्च्या" पचनि पडावे म्हणुन त्याला रुढिन्चे/परम्परान्चे/कर्मकान्डान्चे अवगुन्ठन करुन, त्या अर्कास आपल्या धर्माचा एक भाग करुन किन्वा कधिकधि करण्यास भाग पाडुन याच सर्वसामान्यान्च्या उन्नतिसाठि त्या अर्कास अथवा कर्मकान्डास वैयक्तिक वा सामाजिक दैनन्दिन जिवनाचा एक अविभाज्य भाग बनवुन ते आपल्या गळि उतरवण्याचे शर्थिचे प्रयत्न केले हेत. हे प्रयत्न समजुन घेण्याचि प्रत्येकाचि इच्छा असेलच असे नाहि, कारण सध्याच्या शिक्षणपध्दतीत असे प्राचिन "हिन्दु" धर्मज्ञान अत्यन्त "पध्दतशिरपणे" दडवले/दडपले जाते अथवा त्याबद्दल "जाणुनबुजुन" गैरसमज निर्माण केले जाउन त्याविशयि सतत सन्शयाचे वातावरण कसे राहिल याचि अगदि काळजिपुर्वक खबरदारि घेतलि जाते ज्यामुळे हि इच्छा उद्भवण्याआधिच खुडुन टाकल्या जाते आणि चुकुनमाकुन अशि इच्छा निर्माण झालिच तर तिचि मानगुट "विज्ञानाच्या" खोड्यात अडकवुन घाण्यातिल बैलाप्रमाणे आपल्यास पाहिजे तेच व तेवढेच तेल काढले जाते. या मौलिक ज्ञानकडे "पुर्वग्रहदुशित" नजरेने न बघता कोणा पाश्चिमत्य शास्त्रज्ञान्वर अन्धविश्वास न ठेवता आपल्याच पुर्वजान्वर श्रध्दा व विश्वास ठेवणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. आम्च्या गुर्जीन्चेही असेच मत हे.

>>>आमच्या देव्हा-यात शंकराची पिंडी, पार्वती आणि कृष्णाची मूर्ती आहे. आता सासरे गेल्यानंतर त्यांच्याकडची शंकराची पिंडी, पार्वती आणि बाळकृष्ण आमच्याकडे आणला आहे. एकाच देव्हा-यात अशा डबल मूर्त्या असल्या तर चालते ना? समजा नसेल तर काय करावे लागते?<<< माझ्या शंकांचे निरसन कोणी करेल का?

डबल मुर्ती नको असेल तर पुजा झाल्यावर अक्षता वाहून विसर्जन कर की ! विसर्जन करायच्या नसतील तर कुणाकडे नसल्यास आनंदाने दे त्यांना. असेही लोक असतात की एक देवाचे चित्र भिंतीला लावून त्याची पूजा करतात (ती देखिल देवाला पोहोचतेच) पण आपल्याकडेही मुर्ती असावी असे त्यांना वाटत असेल. आणि देव काय ! झोपडीत किंवा महालात तेवढ्याच आनंदाने नांदतो. तुझ्याकडे राहिला काय अन त्याच्याकडे राहिला काय. मी जेव्हा जेव्हा शेगावला जाते तेव्हा मला तिथे चिटुकल्या चांदिच्या पादुका प्रसाद म्हणून मिळतात. मी एकच जोड पुजेत ठेवलाय, बाकीचे ज्याचा भाव असेल त्याला त्याला देवून टाकले.

मुर्तीच काय, आपल्याकडे जास्त असलेले (आपल्याला नको असलेले) इमिटेशन दागिनेदेखिल कुणाला देवून टाकावेत. बर्‍याच मुली अशा असतील की ज्याची इतरत्र, रस्त्यावर वगैरे बघून फॅशनशी ओळख झालेली असते पण छोटीशी नैसर्गिक हौस देखिल पुरी होऊ शकत नाही, मन मारुन टाकत मोठ्या होतात. फक्त आपणच एक पथ्य पाळायचं की ह्या फॅशनच्या वस्तू देताना त्या मुलीची हौस पुरी होईल एवढेच एकीला द्यायचे. नको तेवढे नटवेपण कुणालाही झेपत नाही, अन गरिबाला तर नाहीच नाही हे सत्य आहे.

शास्त्राने सान्गितले आहे तिथे प्रत्येक वेळेला का, कसे, केव्हा कधि असले अतिचिकित्सक प्रश्न विचारत बसणे ह्यात फार अर्थ आहे असे मला वाटत नाहि>>>

हे प्रयत्न समजुन घेण्याचि प्रत्येकाचि इच्छा असेलच असे नाहि, कारण सध्याच्या शिक्षणपध्दतीत असे प्राचिन "हिन्दु" धर्मज्ञान अत्यन्त "पध्दतशिरपणे" दडवले/दडपले जाते अथवा त्याबद्दल "जाणुनबुजुन" गैरसमज निर्माण केले जाउन त्याविशयि सतत सन्शयाचे वातावरण कसे राहिल याचि अगदि काळजिपुर्वक खबरदारि घेतलि जाते ज्यामुळे हि इच्छा उद्भवण्याआधिच खुडुन टाकल्या जाते >>>

३बू! ही दोन्हि विधाने परस्परविरोधी आहेत अस वाटत नाहि का?

माझ्या मैत्रीणी चे यजमान वारले आहेत व तिला मार्गषीर्शातील गुरुवारची पुजा मान्डावी किन्वा नाही असा प्रश्ण पडला आहे तिने उपास केला आहे परन्तु पुजा करावी का नको असे तिला वाटते. कोणी सान्गु शकेल का ? तिने काय करावे?
धन्यवाद.

जरुर करावी. माणसांना माणूसच काहितरी निमित्ताने दूर सारतो पण देव तसं कधीही करत नाही. उलट तिने "जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे" हे कायम लक्षात ठेवावे.

वय झालं आता.. चालायचंच... Lol
आधी म्हण सम्राटीण होते, आता वेंधळी आज्जी असा किताब मिळणार वाट्टं मला...

.

इथे जरा सुधारणा सुचवाविशी वाट्ते. शन्कराची पिन्डी असते. पिन्ड नाहि. बरयाच थिकाणी पिन्ड हा शब्द वापरला आहे. माणुस स्वर्गवासी झाल्यावर जो नेवेद्य थेवतात त्याला पिन्ड म्हणतात. राहावले नाही म्हणुन लिहिले. कुणालाही दुखावण्याचा हेतु नाही. गेरसमज नसावा.

दक्षिणा, धन्यवाद पण हे मोद्क दुसर्‍या अश्विनी ला देते. के अश्विनि जी माझ्याहुन खूपच मॅच्युअर आहे.

इथे जरा सुधारणा सुचवाविशी वाट्ते. शन्कराची पिन्डी असते.>> पटेश. इथे आन्ध्रात ते पिन्डी म्हण्जे पीठ.
वो शिवजी का पिन्डी है क्या जरा दिखादो म्हणले तर लोक बावचळ्ले.

आन्ध्रात ते पिन्डी म्हण्जे पीठ.
वो शिवजी का पिन्डी है क्या जरा दिखादो म्हणले तर लोक बावचळ्ले.
चालायचंच... हा......... हा ........हा......... हा...........

रोज सडा घालणे, दारासमोर रांगोळी काढणे याचे काहि धार्मीक कारण आहे का? तसेच दाराजवळ श्री किंवा श्रीराम लिहितात ते का? मारूती किंवा गणपती लिहिले तर चालत नाहि का?

हे प्रश्न टाईमपास म्हणुन विचारलेले नाहित त्यामुळे कोणाला ह्यासंबंधी माहिती असल्यास सांगणे.

उद्याच्या ग्रहणाबद्दल कुणी जास्त माहिती देऊ शकेल का? ग्रहण "पाळायचे" म्हणजे नक्की काय करायचे आणि काय नाही करायचे (तीन तासापेक्षा जास्त मोठे ग्रहण आहे)

नंदिनी,

असे म्हटले जाते की ग्रहण लागल्यापासुन ते सुटेपर्यंत काही (घर)काम न करता किंवा टीवी वगैरे बघायला न बसता देवाचे नामस्मरण/जप करत बसायचे. (विशेषतः गरोदर बायकानी हे करावे असे ऐकले आहे.)

या बीबी वरच्या चर्चा पाहिल्यानन्तर त्या चर्चा विज्ञानयुगातील सुशिक्षित स्त्रियांच्या चर्चा वाटत नाहीत असे खेदाने म्हणावेसे वाटते...

असुदे, Happy

तरी अजुन बुप्रा वाद्यांची नजर इथे पडलेली दिसत नाही. त्यांची नजर पडली तर काही खरे नाही बाप या बाफचे Wink

मला वाटतं ग्रहण १५ जानेवारीला आहे. माझ्या मते तरी आपलं काम नेहमीप्रमाणे करत रहावं. ग्रहणाच्या वेळेस बाहेर असालच तर सूर्याकडे न बघण्याची काळजी घ्यावी.

माझे ६०+ वर्षे वयाचे आईबाबा, त्यांचे मित्रमंडळ रामेश्वर ला गेलेत, आयुष्यात एखाद्या वेळेला मिळेल न मिळेल अशी कंकणाकृती सूर्यग्रहण पहाण्याची संधी सोडायची नाही म्हणून! Happy इथे ३ तास जप करत घरात बसायच्या चर्चा ?मज्जाच आहे Lol R U Serious ???
(ज्या कुणी मला ही लिंक दिली त्या व्यक्तीला फटके टाकायला हवेत ! Proud )

Pages