रीतीरीवाज

Submitted by admin on 12 January, 2009 - 23:47

धार्मिक रीतीरीवांजाबद्दलचं हितगुज

या अगोदरचं हितगुज इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संगमरवरी देव्हारा वापरत असाल तर आगावू सूचना: बाजारात कुंकू म्हणून मिळणारा आणि कपाळ्/कापडावरुन सहज धुता न येणारा लाल मरुन डाय अजिबात खरेदी करु नका(तो डाय जी बाई कपाळाला लावणार असेल दुसरीकडे तिलाही नम्रपणे फक्त हळदीचं कुंकू चालतं, बाकीने अ‍ॅलर्जी येते सांगून नाकारा.) या डाय चे संगमरवरावरचे डाग अजिबात निघत नाहीत.ज्या तांदळात ओटी म्हणून हे मिसळलं जातं ते तांदूळही वाया जातात.
चांगल्या देवाच्या दुकानात किंवा मोठ्या मंदिरासमोर महागात मिळणारे हळदीपासून बनलेले वासाचे पिंजर नामक विटकरी कुंकूच घ्या.ते सहज धुता येते.डाग पडत नाहीत.

घरात रोजच्या पूजेसाठी पारद गणपती व लक्ष्मी मूर्ति ठेवावी का? पुण्यात पारद गणपती व लक्ष्मीची मूर्ति मिळेल का?

<<आपल्याकडे पद्धत आहे (जुन्या लोकांना माहित आहे) की पाहुणा गेल्यावरही लगेच झाडु घेऊन केर काढायला घेत नाहीत. ही प्रथा होम/हवना नंतर आवर्जुन पाळली जाते. पुजा/होमहवन झाल्यानंतर उत्तरपुजा करुन देवताविसर्जन केल्यावर, नंतर साफसफाई करताना ती फडक्याने करतात, झाडुने नाही. <<

करेक्ट लिम्बुदा! पाहुणा काय घरातला कोणीही बाहेर गेला/ गावी गेले तरी आमच्याकडे लगेच झाडु हाती घेउन केर काढत नाही.
हरितालिका/ लक्ष्मीपुजन्/सत्यनारायण/नवचन्डी आदिचा पाट मान्डलेला असतो तेव्हा पुजा झाल्यावर कपड्यानेच साफसफाई करतो.

मी काल-परवा असं ऐकलं की जर दोन भावांच्या मुंजी एकत्र करायच्या असतील, तर दोन्ही मुहूर्त थोड्या मिनिटांनी वेगळे असले तरीही, एक मुंज वडील आणी दुसरी काका / आजोबांना लावायला लागते. वडील दोन्ही मुंजी नाही लावू शकत.

मुळात मुंज, त्या विधी ची विश्वासार्हता वगैरे वादाचे मुद्दे बाजूला ठेवू. पण मला गंमत वाटली, की एकच माणुस जर दोन मुंजींचे पौरोहीत्य करू शकतो, एकच आचारी दोन्ही मुंजींचा स्वयंपाक करू शकतो, एकच सेट ऑफ पाव्हणे दोन्ही मुंजी अटेंड करू शकतात, तर एकच वडील स्वतःच्याच दोन मुलांच्या मुंजी का नाही लावू शकत? त्या मागे काही (पटण्यासारखं किंवा न पटण्यासारखं) कारण आहे का?

Namaskar....Me Mybolichi navin sabhasad ahe ani niymit vachak hi ahe.
Mazi ek shanka... Shankarachi pindi devarhyat theu naye as me ekal ahe.... tyaevaji ti tulshichya kundit thevavi ase mhantat ... he barobar ahe ka ?

गौरी कोणी बसवाव्या? आणि त्यामागचा हेतू नक्की काय हे कोणी सांगू शकेल का?.... मी असं ऐकलंय, मुलगी झाली की गौरी बसवतात... काही ठिकाणी एक मुलगी असेल तर एक गौरी अस गणित आहे. माझी आई २ गौरी बसवते आणि घरात मी एकटीच मुलगी आहे. माझी गौरी बसवायची खूप इच्छा आहे. आता मला मुलगा झालाय तर मी गौरी बसवू शकते की नाही?
अजुन एक माझ्या सासरी गौरी बसत नाहीत, हा मुद्दा पण विचारात घ्यावा लागेल का?

Pages