मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

* औंनी सगळ्यांना पिवळ्या वेष्टनात गुंडाळून लॅपटॉप दिलेत (खेळण्यातले असतील असंच मला वाटलं. कारण नंदिनीने दोन बोटात ते प्रेझेंट उचलल्याचं मी चोरून पाहिलं होतं.
<<<<<<<<<<<< ते अतिशय लाइट अस्तिल (TV वर नाही का करीनाच्या पूर्वी Laptop च्या जाहिराती यायच्या):डोमा:

डायलॉग किती बावळ ट असावा या ला काही प्रमाण?

लॅपटॉप मिळालाय म्हणल्यावर नंदिनी लगेच म्हणे की मी त्यावर देवाचे सगळे फोटो डालो करिन आणि आरत्या पण.. अरे आवरा
<<<<<<<त्यावर त्या प्यांटवाल्यांनी काय पोपट केला "नारळ फोड त्यावर" असेच काहीसे. Lol Lol Lol

हा दाभोळकर स्वताला काय समजतो? आणि सुभाच्या हापिसात बसून त्याच्या स्टाफविषयी वाट्टेल ते बोल तोय. आणि सुभा चक्क ऐकून घेतोय Uhoh

हा दाभोळकर स्वताला काय समजतो? आणि सुभाच्या हापिसात बसून त्याच्या स्टाफविषयी वाट्टेल ते बोल तोय. आणि सुभा चक्क ऐकून घेतोय अ ओ, आता काय करायचं

>>>
+१

मी म्हणाले पण की याच्या जागी माझा मॅनेजर असता तर नक्की म्हणाला असता की तो कॅपेबल आहेच म्हणूनच किमान इथे आमच्या ऑफिसात टिकून आहे.
असो!
आता नेहमीचा मंदपणा सूरू झाला कथानकात

रजनी नसल्यामुळे सिरियल मिळमिळीत झालीये. काल जुईबरोबर जायच्या ऐवजी जय रजनीबरोबर जायला हवा होता. खरंतर, त्यांचं अफेअरच दाखवायला पाहिजे. आणि सुभा-अदितीचं. मग अदिती जयला काडीमोड देऊन सुभाशी लग्न करते. जयची बॊस बनते. जय अखेर नोकरी सोडून स्वत:ची ट्रॅव्हल कंपनी सुरू करतो. प्रेझेन्टेशन्स देण्यात वाकबगार असल्याने त्याची कंपनी देव टूर्सपेक्षा उत्तम चालते. अदिती सुभाला लेक्चरं देत बसते. जय आणि रजनी लग्न करणार असतात पण जुई खलनायिका बनते... असं काहीतरी काहीच्या काही चटपटीत दाखवलं तरच ही सिरियल चालेल.
नाहीतर तेच ते पडके चेहरे. पहिल्याच भागात आण्णा तडफदार वगैरे दाखवले होते. जयला एक पैसाही दिला नाही त्यांनी आणि आता माना डोलावत बरे त्यांच्या घरमालकांकडे निवांत चहा पीतात ते! टोटल गंडलेलं पात्र आहे ते.

पुनम.. अगं हळु हळु.. किती धावशील .. दमले गं वाचताना Proud ..दिगदर्शक १५ वर्षे घेईल या साठी.. त्यापेक्षा बंद करा!

रीया +१

पूनम--
पहिल्याच भागात आण्णा तडफदार वगैरे दाखवले होते. जयला एक पैसाही दिला नाही त्यांनी आणि आता माना डोलावत बरे त्यांच्या घरमालकांकडे निवांत चहा पीतात ते! टोटल गंडलेलं पात्र आहे ते.>>>>+१११

ते कार्टून करक्टर आहे ना ड्रूपी....तसा काहिसा भाव असतो अण्णांच्या चेहर्‍या वर..

ते कार्टून करक्टर आहे ना ड्रूपी....तसा काहिसा भाव असतो अण्णांच्या चेहर्‍या वर..<<<,,अचुक...+१००

रजनी नसल्यामुळे सिरियल मिळमिळीत झालीये. काल जुईबरोबर जायच्या ऐवजी जय रजनीबरोबर जायला हवा होता.>>> एकदम बरोबर

पूनम, सिरीयसली असं झालं तर काय मज्जा येईल. आणि मग जय सुभाची कंपनी टेकोव्हर करेल. मग सुभा जॉबलेस होऊन जयच्या कंपनीत नोकरी मागेल. मग जयची अट असेल की आमच्या कंपनीत फक्त घटस्फोटीतच चालतात. मग सुभा व आदितीचा काडीमोड.शीर्षक अबाधित. Proud

जर जयने प्रेझेंटेशन दिले तर श्रेय त्याला द्यायला हवे होते. क्लायंट समोर काय पाचकळपणा चालला होता. हेच का त्याचे प्रोफेशनलीझम?

या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यापैकी एखादातरी एखादा दिवस तरी ऑफिस वगैरे ठिकाणी जाउन आला असावा असे काही मला वाटत नाही

ती जुई कही बावळट नाहीये हां...
एक नम्बर आगाव आहे ती...खाली मुन्डी अन पाताळ धुन्डी...
त्यापेक्षा रजनी बरी सगळच समोरा समोर मेषी

रजनि आलि कि म्युझीक मस्त लागत... ले ले ले...
कोणा लेले ने केल अस्णार Happy

पूनम आणि आशूडींना मालिकेचे लेखन करायला द्यायला पाहिजे.... बघणेबल तरी होईल मालिका.
बाकी पोष्टी एकदम धम्माल Lol

Pages