१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
हे मान्य केले तरी एअरपोर्ट
हे मान्य केले तरी एअरपोर्ट तरी भारतभर असायला हवीत ना ? > काउ तुम्ही फक्त भारत कुठे बघत आहे वैदिक काळी भारत नव्हता सगळे जगच आपले होते. रॉकी की अजुन कुठल्या पर्वतावर त्रिशुळचे चिन्ह आहे. विसरलात का ? तो भाग देखील भारतातच यायचा.
>>याचा अर्थ भारतात विपुल
>>याचा अर्थ भारतात विपुल प्रमाणात तेलसाठे होते आणि ते इंधन म्हणुन वापरले. इतके की शेवटी तेलसाठे संपले आणि आपले पुरान विमाने भंगारात गेली. आणि विद्या लोप पावली.
इंधनासाठी तेलच वापरत असतील कशावरून ? कोळसा किंवा लाकूड नसेल कशावरून ?
त्यात इंधन कोणते वापरत
त्यात इंधन कोणते वापरत होते?
----- हा प्रश्न चुकीचा आहे. आजच्या काळापेक्षा त्या काळातले तन्त्रज्ञान खुप विकसित होते. तेल, इन्धनाची अवशक्ता नव्हती.
पुढच्या विज्ञान परिषदे पुर्वी विमान तन्त्रा बद्दलची सम्पुर्ण माहिती जनतेला मिळेल अशी अपेक्षा ठेवायची...
चार मुले ..... प्रत्येकाला
चार मुले ..... प्रत्येकाला एकेक वेद पाठ करायला द्यायचा
विमान कोणत्याही इंधनाधिवाय
विमान कोणत्याही इंधनाधिवाय हवेत तरंगत असेल तेव्हा.
श्री आदरणीय सम्मानिय
श्री आदरणीय सम्मानिय वैदिकेतज्ञ महेश कुमार साहेब.
कोळसा आणि लाकुड यांच्या घनतेनुसार त्यांचे वजन किती होईल ? इतके वजन घेउन विमान उडेल का? १ किमी साठी आजच्या काळात किती घनतेच्या वजनाचे इंधन म्हणुन लाकुड कोळसा लागेल ?
याचा विचार तेव्हाच्या विद्वानांनी केला नसेल असे वाटते का ?
विमान कोणत्याही इंधनाधिवाय
विमान कोणत्याही इंधनाधिवाय हवेत तरंगत असेल तेव्हा. >>> यावर अतिशय उत्कृष्ट व्यंगचित्र आहे. पण ते भक्तांना परवडणारे नाही
Hg
Hg
महाआखाडा - हे शीर्षक फार पटले
महाआखाडा - हे शीर्षक फार पटले महेश.
चला उत्तरे नाही आहेत असे
चला उत्तरे नाही आहेत असे गृहीत धरावे
दि.दे. सापडले उत्तर सापडले,
दि.दे. सापडले उत्तर सापडले, युरेका युरेका
रामदेवबाबा की जय
रामदेवबाबा की जय
छे रामदेवबाबा हे उत्तर
छे रामदेवबाबा हे उत्तर नाहीये.
रावण हा असूर होता, असूरांना प्रिय पेय काय होते ? तसे तर ते देवांना पण होते, आणि अजुन पर्यंत अनेक मानवांना देखील आहे. मानव सोडून अन्य प्राणी पित नाहीत, आणि मानवाने अतिरिक्त सेवन केल्यास त्याचा प्राणी (पक्षी पशू) होतो. अनेकांना याची देही याची डोळा आपोआपच विमान प्रवास घडतो. असे ते दिव्य इंधन त्या काळात वापरले जात असावे, असा आमचा जावई शोध नव्हे तर्क
(No subject)
रावण हा असूर होता, >>>> रावण
रावण हा असूर होता, >>>> रावण हा ब्राह्मण होता. तुम्ही त्याला असुर का करत आहेत ?
त्याची आई ही राक्षसकुळातली तर
त्याची आई ही राक्षसकुळातली तर वडील ब्राह्मण होते ना? Or other way round?
काही का असेना, पीत तर होता
काही का असेना, पीत तर होता ना?
असे कसे काही का असेना ?
असे कसे काही का असेना ?
http://www.loksatta.com/sampa
http://www.loksatta.com/sampadkiya-news/planes-ancient-surgery-overshado...
हा अग्रलेख वाचनीय आणि मननीय आहे
रावण हा एक राजा होता. त्याचे
रावण हा एक राजा होता. त्याचे वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले तर त्याची आई केकसी ही दैत्य कुळामधली. रावणाचे आजोबा पुलस्त्य ऋषी हे अत्यंत थोर व्यक्ती होते. ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारलेल्या सप्त (सात) ऋषीं मंडळातील ते एक.
अशा तर्हेने, एकाच वेळेस ब्राह्मण, क्षत्रिय आणि राक्षस अशा मिश्र व्यक्तिमत्वाच्या माणसाला काही ठिकाणी "ब्रह्म-राक्षस" असे देखील संबोधलेले आहे.
माणूस अचाट होता यात शंकाच नाही. एकाच वेळेस अनेक विमाने उडवित असणार नक्कीच, मल्ल्या बिल्ल्या काही नाही त्याच्यापुढे.
ते युरेका युरेका चे काय झाले
ते युरेका युरेका चे काय झाले कळु शकेल का ?
दि.दे. झाले की केव्हाच
दि.दे. झाले की केव्हाच सांगून, त्यावर डिविनिता यांनी हसून पण झाले. आणि तरी तुम्हास कळाले नाही.
हाँ, मी आर्किमिडिज प्रमाणे धावू शकणार नाही हा भाग वेगळा
मी खरच उत्तराच्या अपेक्षेत
मी खरच उत्तराच्या अपेक्षेत होतो.
असो
दि.दे. मला काय तुम्हाला काय
दि.दे. मला काय तुम्हाला काय किंवा कोणाला काय खर्या गोष्टी जर खरोखर कळाल्या असत्या तर भारत आत्ता आहे त्यापेक्षा अजुन वेगळा घडला नसता का ? आता खरी उत्तरे माहित नाहीत म्हणुन चर्चाच करायची नाही असे नाही. आणि त्यातुन "महाआखाडा" तर उथळपणाचे मोठे कुरणच
खरे उत्तर म्हणजे इंधनाचे
खरे उत्तर म्हणजे इंधनाचे घनत्वाच्या दृष्टीकोनातुन ठोकताळे बांधुन त्या उत्तराच्या जवळपास जाण्यायोग्य पर्याय उपलब्ध झाला आहे याअर्थाचे उत्तर समजत होतो
दिदे, ह्या धाग्यावर ही
दिदे, ह्या धाग्यावर ही अपेक्षा. फारच आधुनिक दिसता बुवा तुम्ही
अहो मी महेश यांच्या उत्तराची
अहो मी महेश यांच्या उत्तराची अपेक्षा केली एकदम सुब्रमण्यम स्वामीच्या आवेशात "युरेका युरेका" साक्षात्कार झाल्यासारखा प्रतिसाद आला. म्हणुन अपेक्षा वाढल्या होत्या
(No subject)
कोके,
कोके,
http://aajtak.intoday.in/stor
http://aajtak.intoday.in/story/chrysopelea-taprobanica-the-sri-lankan-fl...
वैदिक साप
श्रीलंकेचा असल्या कारणाने रावणाकडुन उडण्याचे मंत्र शिकला असेल
Pages