आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवाकर , तुमचा गैरसमज आहे.
हे खरोखरचे कौतुक आहे.
तुम्हीसुद्धा या आधुनिक त्रीमूर्तीकडून काही मौलिक धडे घ्या.
तुमच्या पोटापाण्याची व्यवस्था होऊन जाईल.

...

अश्या घवघवीत स्वरूपात ही दक्षिणा आपल्याकडून मिळावी यातच आपले कोमल अंतःकरण किती थोर आहे हे ही दिसून येते

.......

यात त्यांचा दोष नाही.. पैसा , सत्ता , राज्य हे विषय आले की मित्र , भौ , काका , मामा , गुरु ... सर्वांना ठार मार असे त्यांचे पुस्तक त्यांना शिकवते.

Proud

...

यात त्यांचा दोष नाही.. पैसा , सत्ता , राज्य हे विषय आले की मित्र , भौ , काका , मामा , गुरु ... सर्वांना ठार मार असे त्यांचे पुस्तक त्यांना शिकवते.>>>>

काय जबरदस्त शिकवण आहे Proud

हा सणसणीत हाणला आहे का?

अरे बापरे! मग घाबरायला हवे.

मला वाटले माबोलेखनसन्यासाची जळजळीत घोषणा टिकवता आली नाही म्हणून आपण कोणाकोणावर आंतरजालीय उपकार फुकटात केले त्याची यादी देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जेव्हा सगळे नीट असते तेव्हा माणसे एकमेकांच्या ज्ञानाचा उपयोग घेतात. विचारलेल्या शंका हे केवळ सगळेच ऑनलाईन आहेत म्हणून आणि तात्कालीन संबंध चांगले आहेत म्हणून विचारलेल्या असतात. पुढे त्याचा असा उल्लेख होईल ह्याची यत्किंचितही कल्पना असती तर एक क्षुल्लक प्रश्नही विचारला नसता. ह्या प्रतिसादावरून एक डॉक्टर म्हणून आपण किती महान आहात हे दिसतच आहे. मी तुम्हाला ब्लड प्रेशरबदल काही शंका विचारल्या, इब्लिस ह्यांना अ‍ॅसिडिटीबद्दल काही शंका विचारल्या आणि दोघांनीही त्यांचे निरसन केलेत ह्याबद्दल मनापासून आभार मानतो व आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा फुकटात फायदा उकळण्याच्या माझ्या क्षुद्र मनोवृत्तीबद्दल त्रिवार जाहीर माफी मागतो.

मी आपल्या दोघांची कन्सल्टेशन फी द्यायला खरोखरच तयार आहे पण ती तुम्ही घ्याल असे मला तरी वाटत नाही. तरीही, घेऊ इच्छीत असाल तर अवश्य खात्याचे तपशील कळवावेत. तुम्ही त्यावेळी संबंध ठीक असल्यामुळे केलेल्या मित्रत्वाच्या सहाय्याची किंमत पैशात करण्याइतका मूर्ख व क्षुद्र मी नव्हे, पण गेल्या काही दिवसांत हे 'कृतघ्नांनी फुकटात सल्ले घेतले' असे विधान चार, पाच वेळा तुमच्यासकट विविध आय डीं कडून ऐकण्यात आले म्हणून तसे विचारत आहे.

आपल्या सर्वांच्या वैद्यकीय कारकीर्दीस मनापासून शुभेच्छा! डॉ. कैलास गायकवाडांसारखे डॉक्टरही ह्याच संकेतस्थळावर आहेत ह्यावर विशास कसा ठेवायचा हा प्रश्न आता पडला आहे.

-'बेफिकीर'!

बाकी साती,

मी काही कामानिमित्त बाहेर जात आहे, दोन अडीच तासांनीच ऑनलाईन असू शकेन. तोवर तुमची आंतरजालीय चिल्लीपिल्ली जे काय करतील ते बघून तुम्ही टाळ्या पिटत राहा.

धन्यवाद!

यात त्यांचा दोष नाही.. पैसा , सत्ता , राज्य हे विषय आले की मित्र , भौ , काका , मामा , गुरु ... सर्वांना ठार मार असे त्यांचे पुस्तक त्यांना शिकवते.>>>
काय कौव्वाजी,
निरपराध शालेय मुलांना आणि व्यंग चित्र काढणार्‍यांना मारायचं कोण बरे शिकवतो ? Uhoh

बेफिकीरजी, आपण का बरं माझ्यावर चिडताय?
मी आपले आभार मानूनही आपल्या मनाला का बरे यातना होतायत?
मला माफ करा हो. आपल्यासारख्या भाषाप्रभूंना दुखवायचा माझा उद्देश नव्हता.

माझे आभार मानल्याबद्दल व मला नमस्कार केल्याबद्दल संबंधितांना अनेक आशीर्वाद.

जसे बेलाच्या की कुठल्याशा झाडावर बसलेल्या एका माणसाने बेलपत्रे तोडून खाली टाकली व खाली शंकराची पिंडी असल्याने आपोआप जसा त्याला अभिषेक केला गेला व तो इसम कुठल्याशा संकटातून वाचला, तसेच विविध व असंख्य पोष्टींमधून माझ्या नावाच्या व आडनावाचेही नामस्मरण तिन्ही त्रिकाळ मायबोलीवर असल्याने माझ्या नावाच्या व त्याहून आडनावाचा सतत जप केल्याने अनेकांना जे आपसूक पुण्य व पावित्र्य प्राप्त होत असेल ते पुरेसे आहे.

त्यामुळे यापुढे वेगळा नमस्कार करण्याची आवश्यकता नाही असे माझ्या चाहत्यांना व भक्तांना निवेदन आहे. त्यांनी माझे नाव व आडनावाचा जप केल्यास त्यांना पुरेसे पुण्य व पावित्र्य आपोआप मिळेल.

गणपती बाप्पा तुम्हा सर्वांना चांगली बुद्धी देवो. हॅप्पी नामजप.

पार्‍याचे थर्मामिटर वापरु नका असा मेड असो.ण्ने आदेश काढला होता. तेंव्हापासुन पार्‍याशी फारसा संबंध राहिलेला नाही.

पारा हे घातक मूलद्रव्य असल्याने ते वापरु नका असा आदेश होता.. थर्मामिटरचा चिमुटभर पाराही वापरायला आमची असोसिएशन घाबरते.

आणि प्राचीन लोक मुक्तहस्ताने पारा वापरायचे.

गंमतच

तुरीचे वरण शिजवताना त्यात आठ दहा मेथी दाणे, चमचाभर तेल आणी चिमुटभर हळद टाकावी. मस्त शिजते व फ्लेवरही छान येतो.

जसे बेलाच्या की कुठल्याशा झाडावर बसलेल्या एका माणसाने बेलपत्रे तोडून खाली टाकली व खाली शंकराची पिंडी असल्याने आपोआप जसा त्याला अभिषेक केला गेला व तो इसम कुठल्याशा संकटातून वाचला

>> +१०००

तुरीचे वरण शिजवताना त्यात आठ दहा मेथी दाणे, चमचाभर तेल आणी चिमुटभर हळद टाकावी. मस्त शिजते व फ्लेवरही छान येतो.>>>>>>>:हहगलो: विकु गल्ली चुकले वाट्ट.

डाळी ला किड लागु नये म्हणून काही लोक पार्‍याच्या गोळ्या टाकुन ठेवतात. आमच्या ओळखीच्या एका काकुना वयोमानाने दिसत नव्हते, त्यान्च्या सुनेने हे प्रताप केले ( पारा गोळी) आणी ती गेली गावाला. नेमकी मी तिथे गेले. काकुनी विचारले अग हे डाळीत काय घातलेय? ते पाहिल्यावर मी चार उड्या मारल्या आणी सान्गीतले आधी त्या गोळ्या फेका. परत डाळीत ठेऊ नका. सुनबाईना सान्गा हे.

तात्पर्यः पारा लय डेन्जर असतो रे भो.

Pages