१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
काय उथळपणा चालवलाय स्वतःला
काय उथळपणा चालवलाय स्वतःला आधुनिक म्हणवणार्यांनी
बेफि, नमस्कार आहे.
बेफि, नमस्कार आहे.
अरे कुठं नेऊन ठेवलाय मूळ विषय
अरे कुठं नेऊन ठेवलाय मूळ विषय माझा
असं वीणाताई म्हणतायत (मनातल्या मनात ;))
मी केव्हांच सोडून दिलाय.. आता
मी केव्हांच सोडून दिलाय.. आता फक्त उजव्या बाजूला जे जुने धागे दिसताहेत ते काढून वाचतेय. तरी सुद्धा चालूच आहे म्हटल्यावर काय बोलणार ?
इथे कुणी मॉडरेटर्स वगैरे नाहीत का ?
पहिलाच धागा ५०० jatoy ... लोक
पहिलाच धागा ५०० jatoy ... लोक जळून खाक ...
हा धागा कुठेतरी लिंक करून
हा धागा कुठेतरी लिंक करून ठेवा, शक्य झाल्यास पहिल्या पानावर डाव्या-उजव्या कोपर्यात..
जेव्हा जेव्हा माबोवर कोणी आधुनिक वा उथळ विचार मांडतील तेव्हा तेव्हा त्यांना ते या धाग्यात मांडायला सांगावेत..
बाकी मी देखील हा धागा आता सोडला!
<,ह्यांचं काहीतरी नवीनच
<,ह्यांचं काहीतरी नवीनच असतं!>> काय ते ?
इथे लोक धागा चालावा म्हणून
इथे लोक धागा चालावा म्हणून परत परत प्रतिसाद ओढून आणतायत, काय काय युक्त्या योजतायत! अन् वीणातैना धागाच नकोय, अगदी पहिला अन् जाम पळणारा असला तरी...
काय ते ? >>> उत्तर कोणी देणे
काय ते ?
>>>
उत्तर कोणी देणे अपेक्षित आहे ?
धागा नकोय ? दहा पेक्षा
धागा नकोय ?
दहा पेक्षा जास्त प्रतिसाद आहेत का विषयाला धरून. धागा कोण पळवतंय ? अशा पद्धतीने एक हजार पोष्टी होणे ही काय आनंदाची गोष्ट आहे का ?
तुमच्या नावातच सुरू आहे
तुमच्या नावातच सुरू आहे म्हणल्यावर धागा सुरूच राहणार ना
वीना सुरूंचा धागा वाचुन त्या
वीना सुरूंचा धागा वाचुन त्या खुप पारंपारीक अस्तिल असे वाटले होते.लांब केसांची वेणी गजरा,कुंकू काठा-पदराची साडी बांगड्या वगैरे...
पण वीना सुरु तुम्ही खुप सुंदर आहात तुमचा फोटू बघितल्या वर तर ताई म्ह्णायची हिंमतच होत नाहिय.
सुरेख, तुमच्याकडून फार
सुरेख, तुमच्याकडून फार चांगल्या अपेक्षा नाहीतच, मात्र आंतरजालीय अल्पपरिचयातच एखाद्या महिलेच्या दिसण्यावरुन टिप्पण्या करु नये ही विनंती. त्याला असभ्यपणा म्हणतात.
आंतरजालीय अल्पपरिचयातच
आंतरजालीय अल्पपरिचयातच एखाद्या महिलेच्या दिसण्यावरुन टिप्पण्या करु नये ही विनंती. त्याला असभ्यपणा म्हणतात.>>>> + १
पण वीणा खरेच सुंदर आहेत हे
पण वीणा खरेच सुंदर आहेत हे मात्र वादातीत...
मला तर धन्यवाद ची अपेक्षा
मला तर धन्यवाद ची अपेक्षा होती.
सु.
सु.
झक्कास
झक्कास
सुमेधाच्या उन्दरावर काढलेल्या
सुमेधाच्या उन्दरावर काढलेल्या धाग्यानन्तर हिट जाणारा हा दुसरा धागा आहे. वीणा खालचे दोन धागे बघा, धमाल करमणूक आहेत.:फिदी:
http://www.maayboli.com/node/44495
http://www.maayboli.com/node/44433
http://www.maayboli.com/node/43117
५०० झाले आहेत
५०० झाले आहेत
हुर्रेर्रे 500 अरे मयेकरांनि
हुर्रेर्रे 500
अरे मयेकरांनि दिलेली लि़ंक पहा. यावेळी (तरी) he is bang on target.
अरे ये काये रे बाबौ! ओ वीणा
अरे ये काये रे बाबौ! ओ वीणा तुम्ही कुणाला पकडले? छ्या! मला बी वाटले की लय छान हायती, पण हिथ समद येगळच खटल निगाल. धन्यवाद मयेकर! चान्गल काजळ घातलत डोळ्यात.
मयेकर नेहमीच चांगले काजळ
मयेकर नेहमीच चांगले काजळ डोळ्यात घालतात पण काहींना कधीकधी फार चुरचुरते
भरत मयेकर रॉक्स!!!!!!!!!!
भरत मयेकर रॉक्स!!!!!!!!!!
मयेकरांची लिंक क्लिक करायला न
मयेकरांची लिंक क्लिक करायला न जमलेल्यांसाठी :
हा सूर्य,
अन कॅनडात खून झालेल्या स्त्रीचा फोटो दाखवणार्या बातमीतला (मयेकरांची लिंक) हा :
आहे की नाही गम्मत?
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र बाई गेल्या ?
भयानक मोठी गंमत आहे. काहीतरी
भयानक मोठी गंमत आहे. काहीतरी खटकतंय असं वाटत होतंच. म्हणून फेसबुकवर अॅड कर सांगितलं. त्याला टाळाटाळ झाल्यावर संशय बळावला. लिंकमहर्षी मयेकर महाराज की जय!
अरेरे...एकानी पल्टी मारली
अरेरे...एकानी पल्टी मारली की..
मयेकर कुठून कुठून शोधून
मयेकर कुठून कुठून शोधून काढता.... __/\__
वीणा सुरू सर्वांच्या गुरू
वीणा सुरू सर्वांच्या गुरू निघाल्या:G
Pages