नमस्कार मायबोलीकर..
येत्या 2 महिन्यात पुणे ते गोवा आणि परत असा प्लॅन आहे. 8 ते 10 दिवसांचा विचार आहे. आम्ही 2 जोड्या स्वतः च्या गाडीने प्रवास करणार आहोत. खालील ठिकाणी/ जवळपास होमस्ते, हॉटेल आणि रेस्तरांत सुचवा.
पहिला मुक्काम: हरिहरेश्वर/श्रीवरधन/ बागमंडला भाग
दुसरा: बागकर हाऊस MTDC मुरुड हर्णे जवळ ठरतंय, उपलब्ध नसल्यास इतर option असावेत.
तिसरा: गणेशगुळे
चौथा: धामापूर/ मालवण तारकर्ली
पाचवा: गोव्यात कुठेही चालेल (दोन दिवसासाठी)
सहावा: कोल्हापूर
सातवा: महाबळेश्वर
माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळावरील लेखांक ८२ मधील लेखनाचा संपादित सारांश
स्टॉकहोममधल्या आमच्या भटकंतीचा तो दुसरा दिवस होता. स्टॉकहोम, स्वीडनची राजधानी. सर्वच युरोपियन राजधान्यांच्या शहरांमध्ये इतकं काही बघण्यासारखं असतं की एक वारी कमीच पडते. त्यात कला, स्थापत्यशास्त्र, इतिहास, म्युझियम्स सगळ्यांतच रस असेल तर आणखीच धांदल उडू शकते. तुम्हाला केवळ भोज्यांना शिवायचं आहे, की निवांत आरामात फिरत एक-एक गोष्टी पहायच्या आहेत यावरही बरंच अवलंबून असतं. ज्याचा त्याचा आपापला पर्यटकी choice. आम्हाला निवांत फिरायचं होतं. अमुक इतक्या गोष्टी बघायच्याच आहेत असा आमचा आग्रह नव्हता. एखादं म्युझियम आवडलं तर तिथेच ३-४ तास घालवण्याची आमची तयारी होती.
अधिक श्रावण मास संपायला ८-९ दिवस शिल्लक राहिले असताना वडिलांनी निज श्रावणी सोमवारी पशुपतिनाथाचे दर्शन घेण्याची इच्छा आपल्या 'रावण' बाळाकडे व्यक्त केली. त्रेतायुगातील 'श्रावण बाळाला' आपल्या माता-पित्यांची तीर्थयात्रेची इछा पूर्ण करण्यासाठी कावड खांद्यावर घ्यावी लागली होती, पण कलियुगातील ह्या रावण बाळाला प्रवासासाठीचे अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध असल्याने तेवढे कष्ट घेण्याची गरज नसल्याने त्याने त्वरित होकार भरला आणि त्यादृष्टीने तयारी सुरु केली.
लक्षद्वीपमधे बघण्यासारखे काय काय आहे?
तिथे जाण्याचे, रहाण्याचे व खाण्याचे पर्याय कोणते आहेत?
स्थानिक खाद्यपदार्थ मिळण्याचे उत्तम ठिकाण कोणते?
स्वतःचे अनुभव लिहिल्यास उत्तम.
सफर पूर्वोत्तर राज्यांची - आसाम , मेघालय
लिखाणाचा पहिलाच प्रयत्न असल्यानं थोडं सांभाळून घ्या.
या वर्षी राजस्थान ची सहल करावी असा मानस होता. पण आमचे चिरंजीव यांचं आसाम ला पोस्टिंग झालं अन मग ठरवलं या वर्षी पूर्वोत्तर राज्य.
नोव्हेंबर महिन्यात नियोजन करायचे ठरले पण दसरा आन दिवाळी यामुळे विमान प्रवासाचे चढे दर त्यामुळे डिसेंबर महिन्यात जाण्याचे पक्के केले.
जाताना पुणे ते दिल्ली व दिल्ली वरून गोहाटी या साठी स्वस्त म्हणून एअर इंडिया एक्सप्रेस या कंपनी ची तिकीट बुक केली. तसेच येताना गोहाटी ते पुणे इंडिगो ची तिकीट बुक केली.
काळ बदलला तसे पर्यटनाचे स्वरूपही बदलले.