भारत सरकारने राष्ट्रीय कृषी योजना राबविल्यामुळे कृषी विकास दर हळूहळू वाढत आहे. मात्र शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी उपाय कमी पडत आहेत. तसेच पुरेशी गोदामे नसल्याने करोडो टन धान्य सडत आहे. भारतात पूर्वी शेतीवर ८० टक्के जनता अवलंबून होती. आता ५५ टक्के लोक शेती व संलग्न व्यवसायात आहेत. जोडपीमधील शेतीचा वाटा ३० टक्क्यांवरुन १५-१६ टक्क्यांवर आला आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खावा, तशी परिस्थिती आहे. जगात भारत हा केळी, द्राक्ष, आंबे उत्पादनात पहिला, तर गहू, तांदूळ, साखर, पिकविणारा दुसरा देश आहे. मात्र हेक्टरी उत्पादकतेत आपण प्रगत देशांच्या तुलनेत कुठेच नाही.
भा म्हणजे "तेज" आणि रत म्हणजे "रमलेला" असा तेजात रमलेला देश म्हणजे माझा भारत देश
या देशा बद्दल काहि scientist काहि नोबेल विजेता काहि प्रतिष्टित लोकांनी काढलेले उदगार भारत वासियानसाठि..........
भारत की प्रशंशा में कहे गए कथन
Quote 1:We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made.In Hindi :हम भारतीयों के कृतज्ञ हैं , जिन्होंने हमें गिनना सिखाया , जिसके बिना कोई सार्थक वैज्ञानिक खोज नहीं की जा सकती थी .
........Albert Einstein ऐल्बर्ट आइन्स्टीन
माण्साच्या शाळेतल्या प्रतिज्ञा खोट्या असतात, माण्साने 'सारे भारतीय माझे बांधव आहेत' असं नुसतंच म्हणावे पण मानू नये.
माण्साने हिंदू व्हावं, मुसलमान व्हावं, बौद्ध व्हावं, ख्रिश्चनही व्हावं पण भारतीय होऊ नये.
हिंदूंनी मुसलमानांचा द्वेष करावा आणि मुसलमानांनी हिंदूंचा द्वेष करावा.
बौद्धांनी ख्रिश्चनांचा आणि ख्रिश्चनांनी बौद्धांचा, उरलेल्या धर्मवाद्यांनीही एकमेकाचा मत्सर करावा.
माण्साने आपली जात गोंजारावी, दुसऱ्याच्या जातीचा दुस्वास करावा.
भाषीय, प्रांतीय अस्मितेची बांडगुळे आपल्या मस्तकात वाढवावीत,
मि आजच प्रथम एक अभंग share करत आहे
निसर्गाने दिलेली एक सुंदर अशि वास्तु किंवा सौंदर्य.
जणु समुद्राला हि हेवा वाटावा अस आपल जिवन.
त्याला काहि नविन माझे मित्र- मैत्रिनि व्यसन अंगि कारुन स्वत:ला आगेत झोकुन देत आहेत.
आपल शरिर म्हणजे काय exchange offer वाटली काय....
म्हणुन एका अभंगातुन तुम्हाला नविन सुंदर अश्या जगात घेउन जात आहे. जणु रायगडाच्या पाय्थ्याला जसा झुरु झुरु वाहणारा वारा, थंडित शरिराला गरम उब देनारी, मायच्या साडिची गोधडिच. असच वाटेल हि शरिराला मुक्ति देनारा अभंग.......
निसर्गाचि देन अभंग "शरिर"
हात करि कृत्य, पाय करि वाटचाल
ज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ!
हात जाइ पुढे पुढे
भारतीय जवानाची कैफियत
आज तेज बहादुर यादव या बीएसएफ जवानाचा व्हिडीयो पाहिला आणि काटा आला अंगावर. आपले जवान कुठल्याही परिस्थितीत पडेल ते काम करत, कमालीच्या विषम हवामानात आपले कर्तव्य बजावत असतात. पण ती यंत्रे नाहीत तर माणसे आहेत याचा जणू वरिष्ठांना विसर पडला असावा आणि अगदीच असह्य झाल्यानंतर त्याने ही कैफियत सगळ्या जगासामोर मांडली असावी.
भारतात जवळपास सर्वच ठीकाणी भटक्या जनावरांचा प्रश्न जटील होत चालला आहे.कुत्रे,गाय हे प्राणी विशेष करुन आढळतात.अनेकदा भटक्या कुत्र्यांना रेबिज होऊन ते पिसाळातात,लहान मुलांवर हल्ला करुन त्यांना जखमी केल्याच्या बातम्या आपण वाचतच असतो.पण प्राणी त्यांच्या नैसर्गीक प्रेरणेने वागत असतात.त्यामुळे प्राण्यांना दोष देऊन उपयोग नाही.
थोडीशी गैरसोय ( http://www.maayboli.com/node/60794) या धाग्याने 2000 पोस्ट चा टप्पा पार केला आहे
कृपया आता तिकडे प्रतिसाद देऊ नयेत.
,
चलनबंदी होऊन आज 40 दिवस होऊन गेले तरी गैरसोय कमी होण्याची नाव नाही,
पुणे मुंबई शहरात स्थिती थोडीशी सुधारली आहे, (पण थोडीशीच, मला स्वत:ला गेल्या 40 दिवसात फक्त एकदा तीन 500 च्या नोटा पाहायला मिळाला आहेत, मात्र तेव्हाच थोडया प्रयत्नांत 2000 चे सुट्टे मिळून जातात असा अनुभव आहे)
ग्रामीण, निमशहरी भागात अजूनही परिस्थिती पूर्व पदावर आली नाही आहे.
राज्य या रघुनाथाचे कळीकाळाशी नातुडे
बहुबृष्टी अनावृष्टी या जगी ना कधी घडे
एका प्रसिद्ध कवींनी रामराज्याचे हे असे वर्णन केलेले आहे.
त्यावेळेप्रमाणे अर्थात राज्यावर येणारी परकीय आक्रमण सोडल्यास इतर संकटे ही ओला दुष्काळ - सुका दुष्काळ हीच असावीत.
त्यावेळीही सामन्य लोक यावेळी माझे शेत पिकणार नाही, माझे खाण्यापिण्याचे वांधे होतील असा विचार करत असतील.
मात्र अर्थशास्त्रज्ञ, सेवादाते, व्यापारी आणि राज्यकर्ते एका वर्षाच्या पावसाचे चार महिने हे असे गेलेत याचा पुढिल वर्षावर, उद्योगधंद्यावर, परकीय व्यापारावर आणि एकंदरच राज्याच्या आर्थिकस्थितीवर काय परिणाम होईल याचा विचार करत असणार.
मध्यंतरी जिओच्या जाहीरातीत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिसल्याने वाद उद्भवला होता. मी मोदी भक्त नाही की द्वेषी नाही, (हे हल्ली आवर्जून सांगावेच लागते) पण मलाही ते खटकले होते. मात्र त्यानंतर पुढे क्लीअर झाले होते की मोदींचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यात आला होता. पुढे कायद्यानुसार काय ती कारवाई होईलच असे समजून मी तो विषय डोक्यातून तेव्हाच काढून टाकला होता. किंबहुना मोदींच्या जागी जिओच्या जाहीरातीत शाहरूख खान आल्याने आनंदच झाला होता.