भारता चे महान सुपुत्र दिवंगत प्रधानमंत्री राजीवजी गांधी यांच्या नावाने 'खेळरत्न' हा पुरस्कार् देण्यात येतो. सध्याच्या मोदी सरकारने राजीवजींच्या नावे देण्यात येणाऱ्या ह्या पुरस्काराचे नाव बदलून ध्यानचंद ह्या खेळाडूच्या नावाने हा पुरस्कार् देण्याचा निर्णय घेतला.
पीएम ह्यांनी लोकांची मागणी म्हणून हे नाव बदलल्याचे
सांगितले.अर्थात कोण लोक, कुठे मागणी झाली, कुठे मोर्चे निघाले याबद्दल अवाक्षरही नाही.अर्थात सत्ताधारी म्हणून त्यांनी त्यांचा अधिकार वापरला. अशीच तात्परता बेरोजगारी, लसीकरण,पेट्रोल डिझेलचे वाढते भाव, अशक्त जिडीपी। ह्याबाबत त्यांनी दाखवल्यास जनता त्यांची। ऋणी राहील.
महाराष्ट्र शासन मध्यंतरी जुने सातबारा , फेरफार online उपलब्ध करून देणार असे वाचले होते . परंतु अजून . काही पुणे, अ.नगर जिल्ह्याची जुनी माहिती दिसत नाही . कोणाला यासंदर्भात काही update असेल तर सांगा ...
मला ही माहिती पणजोबा आणि इतर पूर्वज यांच्या माहितीसाठी हवी आहे . म्हणजे आजोबांना लिहितावाचता येत नव्हते त्यामुळे एक दोत पिढ्यांपर्यंतच तोकडी माहिती त्यांच्याकडे आहे . मी जरा खोलात जाऊन कुतुहल म्हणून हे सगळं करण्याचा प्रयत्न करतोय .
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 25 जून 2021 रोजी विशेष रेल्वेगाडीतून प्रवास केला. राष्ट्रपतींनी रेल्वेगाडीतून प्रवास करण्याची प्रथा अलिकडील काळात अतिशय दुर्मिळ झालेली आहे. यंदाही तब्बल 15 वर्षांनंतर भारताच्या राष्ट्रपतींकडून दौऱ्यासाठी रेल्वेगाडीची निवड केली गेली होती. आपल्या मूळगावी परौख येथे जाण्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्ली ते कानपूर असा 438 किलोमीटरचा प्रवास रेल्वेगाडीने केला. अलिकडील काळात भारताच्या राष्ट्रपतींनी केलेला तो सर्वाधिक लांबचा रेल्वे प्रवास ठरला.
जागतिक पातळीवर सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून
GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन
कार्यरत असते. मागास राष्ट्रांनाही लस
मिळावी हा या संस्थेचा मुख्य व उदात्त हेतू आहे. यासाठी
" गावी " या संस्थेला बिल अँड मिलिंडा गेट्स
फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून
निधी मिळतो. नुकतेच १५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन इथे " गावी" ने आयोजित केलेल्या " वन वर्ल्ड प्रोटेक्टेड" या इव्हेंटमध्ये बऱ्याच देशांनी मुक्तहस्ताने निधीचे वाटप केले.
कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाच्या दुसर्या टप्प्यात 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरीकांसाठी लसीकरण सुरू झाले. त्यात 3 मार्चला माझ्या आई (66 वर्षे) व बाबांनी (71 वर्षे) लस घेतली. लसीकरणावेळी दोघांनाही काहीच त्रास जाणवला नाही, वा मग नित्यक्रमात काहीही अडथळा आला नाही. दुसर्या दिवशी आईला लस दिलेल्या जागी एक-दोन तास हलकेसे दुखत होत, नंतर आपोआपच बंद झालं. त्यामुळे औषध घ्यायची गरज भासली नाही.
माहितीसाठी
1. cowin.gov.in ह्या संकेतस्थळावर आपला मोबाईल क्रमांक वापरून नावनोंदणी करावी लागते. प्रत्येक वेळी लॉग इन करतांना नव्याने OTP येत असल्याने पासवर्डची भानगड नाही.
नमस्कार!
उद्या 'प्रजासत्ताक' दिवस. त्यानिमित्ताने चार वर्षांपूर्वी याच दिवशी लिहिलेला एक लेख इथे शेअर करतेय. किरकोळ बदल सोडले तर परिस्थिति आजही तीच आहे!
व्यवस्थासत्ताक!
पुण्यातील रम्य अश्या प्रभात रोड व भांडारकर रोड भागाचे वैशि ष्ट्य म्हणजे ह्या भागातील जुनी टुमदार घरे, सोसायट्या व शांत गल्ल्या. काही टू वे आहेत तर काही डेड एंड. ह्या भागात वर्दळ व वाहनांची गर्दी वाढल्याचे कारण देत पुणे महापालिकेने ह्या गल्ल्या रुंद करायचा घाट घातला आहे.
कालच बापु बिरु वाटेगावकर यांच्या जीवनप्रवासावर युट्युबवर एका दुरदर्शन वाहिनीने घेतलेला साक्षात्कार पाहिला https://www.youtube.com/watch?v=ticyo5LzOP4
बापु बिरु वाटेगावकर यांनी महिलांचे शिलरक्षण व्हावे यासाठी पहिला खुन पाडला. तो ही स्वातंत्र्यानंतरच्या काळात जेव्हा अत्याचारी राज्यकर्ते सुध्दा तुरुंगात जाऊ शकतात अशी यंत्रणा असुन ती फेल झालेली होती.