सध्याची भारत जोडो यात्रा एका वेगळ्याच वळणावर आणून ठेवलीय ह्या विशिष्ट पक्षाच्या बौद्धिक दिवाळखोर राजकारण्यांन्नी!
मला एक कळत नाही की जर तुम्हाला 'नफरत छोडो - भारत जोडो ' ही टॅगलाईन वापरायची आहे (जी की मला आवडली ...) तर उगाच आपल्याला ज्यास्त जाण नसलेल्या किंवा गती नसलेल्या विषयाला जाणुनबुजून छेडुन व नफरतीचे मोहोळ उठवून आपणच आपल्या मोहिमेचे तीन तेरा वाजवण्याचा व मोहिमेवर जाउन कमाई करण्यापेक्षा राज्यावर कर्जाचा भार वाढवण्यार्या राघोबा सारखा बौद्धिक दिवाळखोर उपद्व्याप कां करतात हे लोकं?
आकाशातील देव ह्यांन्ना सत्बुद्धी देवो!
चित्रः- पेरियार रशियात.
दलितांचा खरा हितचिंतक कोण? आंबेडकर, गांधी की पेरियार? तिन्हीकी यापैकी कुणीही नाही? हा न संपणारा वाद आहे.
जातीचा प्रश्न येतोय म्हणून मी जातीपासून सुरुवात करतो. या तिघांपैकी फक्त एक दलित समाजात जन्माला आला होता आणि बाकीचे दोघे व्यापारी समाजातील होते. तिघांमध्ये एकही ब्राह्मण नव्हता.
भारतातील पहिल्या महिला आमदार .
भारतात आरक्षण ना आंबेडकरांनी आणले होते ना पेरियारानी. ते आधीच आले होते. ब्राह्मणवादाच्या विरोधात मद्रासमध्ये जस्टिस पार्टीची स्थापना झाली आणि त्यांनी सरकार स्थापन केले हे मी आधी नमूद केले आहे. त्यावेळी पेरियार काँग्रेसमध्ये होते, आणि खादीचा प्रचार करत होते. जस्टिस पार्टीनेच आरक्षण विधेयक मंजूर केले. पेरियार यांची त्यात कोणतीही भूमिका नव्हती. तेव्हा पेरियार यांची भूमिका काय होती?
काही वर्षांपूर्वीचा आमच्या ऑफिस मध्ये घडलेला किस्सा.
आम्ही सारखाच अनुभव असणारे चार पाच समवयस्कर आणि आमचा एक मॅनेजर असे आम्ही सगळे एका टीमचा भाग होतो. अचानक आमच्या टीम मध्ये एक नवीन जॉईन झाला.
आम्ही मॅनेजर ला विचारलं ... "हा कोण".
मॅनेजरने सांगितलं ... "नवीन आहे ... सांभाळून घ्या त्याला".
'सांभाळून घ्या? ... म्हणजे आम्ही नक्की काय करायचं' आम्हालाच प्रश्न पडला.
आम्ही एकमेकाकडे बघितलं. आणि कामाला लागलो.
थोडे दिवस झाले. त्याला काहीच जमेना.
आम्ही मॅनेजरला सांगितलं ... "अरे ह्याला काहीच जमत नाही".
काही आठवड्यापूर्वी जेव्हा ओपेक प्लस या पेट्रोल उत्पादकांच्या देशांनी (इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवेत, रशिया आणि इतर) आपण पेट्रोल उत्पादनामध्ये कपात करत आहोत असे जाहीर केले तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांनी सौदी अरेबियाला ठणकावले की याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. अमेरिकेने सौदी अरेबियाला अशा पद्धतीची सरळ सरळ धमकी देणे ही फारच मोठी गंमतशीर गोष्ट आहे.
तस म्हनल त आमच गाव काय लय मोठ्ठ नाय ईनमिन चार गल्लयांच गाव शेती ह्योच एकुलता एक उद्योग चारसा महिन धावाधाव केली की बाकी मंग फुरसतच फुरसतच फुरसत भलेही आमच्या गावामंधी समद्या गोष्टींची कमतरता आसल पर एक गोठ मातुर भरमसाठ हाय नी ती म्हंजी येळ पर व्हत काय की येळ लय मुबलक असल्यान त्यो घालवावा कसा हीच समद्या गावकऱ्यांची पंचाईत व्हती,तस समद्या बाबतीत गाव मागासलेल आस्ल तरीभी राजकारनात मातूर लयच पुढ हाय चार गल्ल्या पर भेदभाव आसा नाय समद्या राजकीय पक्षाले आमच्या इथ थारा हाय काँग्रेस राष्ट्रवादी ची एक गल्ली एक गल्ली शिवसेनेची चार घर भाजपची नी मंग उरलेल्या घरांत दोन चार अपक्ष नी बाकिचे पक्ष येळ आसल्यान
उझबेकिस्तानमधल्या समरकंदमध्ये शांघाय सहकार्य संघटनेची (Shanghai Cooperation Organisation) 22 वी शिखर परिषद 15-16 सप्टेंबर 2022 ला पार पडली. या परिषदेला 14 देशांचे प्रमुख नेते उपस्थित होते. सध्या SCO मध्ये निरीक्षक असलेल्या इराणने समरकंद परिषदेत पूर्ण सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे.
समरकंद शिखर परिषद-2022
SCO सदस्य देशांमध्ये पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय समरकंद-2022 मध्ये घेण्यात आला आहे. त्यासाठी वाराणसी शहराची 2022-23 साठीची SCO ची पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
तैम्ब्रैम, म्हणजेच तमिळ ब्राम्हण. अमेरीकेतील विद्यापीठात शिकनारे अनेक भारतीय त्यांना भेटले असावेत. एका अ-ब्राम्हण तमीळ मित्राशी केलेली चर्चा मी ईथे काल्पनिक स्वरूपात देतो. जेव्हा मी तमीळ जाती व्यवस्था समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो तेव्हा त्याने सगळ्या जाती सांगायला सुरूवात केली.
मी विचारलं- “आणी ब्राह्मण?”
तो बोलला- “तू मनुष्याच्या जाती विचारतोय. तमीळ ब्राम्हण ह्या पृथ्वीच्या वर देवलोकात राहतात, ते आम्हाला किंमत देत नाहीत. सगळे तमीळ एका बाजूला नी तैम्ब्रेम एका बाजूला.”
“परंतू, ऊत्तर भारतात सवर्णांत ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य सगळे येतात”
तस तर जनतेची स्मृती अल्पजीवीच असते अस प्रत्येक पक्षातील नेत्याला वाटत असत आणि म्हणून च ते एखाद्या प्रश्नावर आपण मागे काय मत मांडले आणि आता आपण काय बोलतोय किती विरोधी बोलतोय हे विसरून जातात ्खरतर मायबोलीच्या संचालक मंडळाला मला एक फुकटचा सल्ला द्यावासा वाटतोय आणि तो म्हणजे त्यांनी आठवते कानेत्यांनो या नावाच एक नवच सदर सुरु कराव आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्याच एखाद्या घटनेवर मत परिवर्तन झाल की त्या नेत्याला त्यानेच केलेल्या गतकाळातील वक्तव्याची आठवण करून द्यावी भक्त असोत की गुलाम या सदराला प्चंड प्रतिसाद देतील ।