कैरीचं आंबट गोड पन्हं
चैत्र वैशाख महिन्यात होणारी उन्हाची काहिली आणि थंडगार पन्हं यांचं अगदी जवळच नातं आहे. पूर्वी शेजारी पाजारी सगळ्यांकडे चैत्र गौरीच हळदीकुंकू केलं जायचं आणि वेगवेगळ्या चवीच पन्हं खुप वेळा प्यायला मिळायचं. हल्ली हे हळदी कुंकू फार ठिकाणी होतं नसलं तरी गुढी पाडवा, रामनवमी किंवा एखादा खास रविवार अश्या निमित्ताने अजून ही घरोघरी चैत्रात पन्हं आवर्जून केलं जातं.
शाल्मली: थँक्यू! तुम्ही एवढ आलात भेटायला. अगदी अचानक ग! आम्ही दोघंही घरात नव्हतो. मी नीलच्या शाळेतल्या फंक्शनला गेले होते, आणि शेखर जर्मनीत. शेजाऱ्यांचा फोन आला, मग लगेच शाळेतून तशीच गेले ना हॉस्पिटलमध्ये. पण डॉक्टर म्हणाले काही नाही करता येणार. खूपच मोठा अटॅक! आणि कल्पनाच नाही ग. आई होती तशी; दोघंही होते. पण काय ग, गाडी चालवता येत नाही ना दोघांना. तसे बाबा चालवायचे, मुंबईत काय, इंग्लंडमध्ये काय. पण इथे त्यांना जरा भिती वाटायची. म्हणायचे, 'तुम्ही एकतर उलट्या बाजूनी चालवता गाड्या, आणि वरती एवढ्या वेगानी.' आई ना? सावरतेय थोडी; नाही म्हटलं तरी एवढ्या वर्षांचा संसार ना.
दुसऱ्या दिवशी साडेचारच्या ठोक्याला हॉटेलच्या रिसेप्शनिस्टचा फोन, 'मिस्टार अँड मीसेश गूहो टू शी यू'. 'पाठव त्यांना वर', मोठं ऐटीत सांगितलं मी. बेल वाजल्यावर दार उघडलं. वयाच्या मानाने वजन भलतंच आटोक्यात, किंबहुना कमीच झालेलं असावं असं वाटलं; थकल्यासारखीही दिसत होती. पण चेहऱ्यावरचा मिश्किल भाव आणि चैतन्य मात्र तेच होतं. तेच खट्याळ डोळे, तशाच दोन्ही गालांवरच्या खळ्या! पूर्वीं केसांचं पोनीटेल असे, आता चांगला अस्सल बंगाली बौदी सारखा केसांचा चापूनचोपून घातलेला खोपा होता. अजूनही एवढे भरगच्च केस बघून माझा हात नकळत माझ्या डोक्याकडे जाणार होता - झाकून घ्यायला. 'ओरी बाब्बा!
माबोवर लिहिलेले माझे बोटीवरचे आणि इतर सर्व अनुभव अर्थातच मराठीत आहेत. प्रतिसादामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक खूपच केलंत. मात्र हल्ली बहुतांश मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. 'वाचता येत नाही' असं म्हणणं तितकसं बरोबर नाही. ते टाळतात.
बरोबर तीस वर्षांनी पुन्हा कलकत्याला आलो होतो - आठ दिवसांच्या बिझनेस ट्रीपसाठी. आयुष्यात पहिल्यांदा आलो होतो तेव्हा वाटलंही नव्हतं ह्या शहरात कधी पाऊल पडेल. आठवडाभर राहिल्यावर वाटलं होतं पुन्हा कद्धी इथे पाऊल टाकणार नाही... आणि दोनच वर्षात परत आलो, पुढची दोन वर्ष राहिलो, प्रेमात पडलो - कलकत्त्याच्या, बंगाली भाषेच्या, संस्कृतीच्या... तेव्हा सोडतांना वाटलं होतं, आता मात्र शंभर टक्के खात्रीने परत काही येत नाही मी! म्हणतात ना, पुरुषस्य भाग्यं!
निवळशंख....
Life is simple, just add water हे वाक्य वाचलं आणि आत काहीतरी हललं.
गेल्या वर्षभरात "उदंड पाहिले पाणी" हा योग आला.आधी नर्मदामाई, मग गंगामाता,त्रिवेणी संगमावर गंगा, यमुना, सरस्वती आणि मधल्या काळात चमचमता अरबी समुद्र..आणि परत आता नर्मदामैय्या!
सगळ्यांच्या अविरल प्रवाहामुळे डोळे आणि मन सुखावलं, तृप्त झालं खरं तरी परत दर्शनाची ओढ ठेवून!
कथापौर्णिमा - लेखिका पूनम छत्रे
पूनम छत्रे यांचा ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रकाशित झालेला कथापौर्णिमा हा कथासंग्रह वाचायला मिळाला. हा कथासंग्रह वाचल्यानंतर त्याबद्दल थोडेसे लिहावे असे वाटले.
असेल माझा हरी.. (१)
https://www.maayboli.com/node/84928
असेल माझा हरी.. (२)
आता ह्या वेळची गोष्ट जरा वेगळी होती...
आता वसुधाला जावच लागणार होतं अमेरिकेला..
प्रियाला नुकताच सहावा महिना सुरू झाला होता. नातवंड येणार ह्याचा आनंद तर होताच. पण तिथे राहून तिचं.. पुढे बाळाचं सगळं करणं आपल्याला कसं जमेल ह्याची वसुधाला शंका वाटत होती. तेही त्यांच्या पद्धतीने..!
असेल माझा हरी..(१)
“खरं सांगायचं…, तर मला जरा टेंशनच आलंय.. सगळं कसं जमणार…., मला एकटीला.. माहीत नाही..” वसुधा जरा घाबरतच बोलली. तिचा हा खालच्या आवाजात, घाबरत बोलण्याचा टोन. मुलाशी त्याला आवडणार नाही, असं बोलण्याकरता राखीव असायचा.
“त्यात कसलं आलंय टेंशन..? तिथे बसायचं, इथे उतरायचं.. मी असणारच आहे इथे घ्यायला.. तुला काय प्रॉब्लेम आहे..?” श्रेयसच्या बोलण्यातला हा कडक टोन खास आई करताच असायचा.
मला कल्पना आहे की दोन भागांमध्ये बरच अंतर पडत आहे. माझा कथेचा विषय आणि नेमकं काय अन् कसं लिहायचं आहे, ते नक्की आहे पण कथा पुढं घेऊन जाण्यासाठी कथा शब्दांकित करताना मनासारखे समाधानकारक लेखन सुचत नाहीय त्यामुळे दोन भागात अंतर पडत आहे. मी लवकरात लवकर भाग टाकण्याचा प्रयत्न करेन पण मी हे दरवेळी भाग लेट झाल्यावर कारणं दिल्यासारखे होत त्यामुळे एक छोटीशी पोस्ट....
भाग उशिरा येण्याबद्दल मनापासून सॉरी...
लवकर भाग टाकण्याचा प्रयत्न नक्की करेन....
Thanks