सुभाषित आस्वाद [२] : (अ)न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा:
उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि, न मनोरथै: |
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा: ||
कोठलेही काम [ त्यासाठी आवश्यक असलेल्या परिश्रम म्हणजेच ] उद्योग केल्यानेच होत असते.
(केवळ मनात त्याबद्दल कल्पना रचून म्हणजेच ) स्वप्ने रंगवून नव्हे.
(वनराज एवढा जंगलाचा राजा पण म्हणुन कांही) स्वस्थ बसून राहिलेल्या सिंहाच्या तोंडात हरणे
आपणहुन शिरत नाहीत.
याचे एम कर्णिक यांनी अतिशय समर्पक मराठी-सुभाषित केले आहे.
उद्योगानेच यश मिळते, स्वप्नरंजन ठरे फुका |
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[८ वा आणि अंतिम भाग ]
नेहमी वाचण्या बोलण्यात येणारी संस्कृत वचने ज्यात आहेत अशा सुभाषितांच्या मालिकेचा हा आठवा आणि अंतीम भाग. ज्या रसिकांनी या मालिकेचा रसास्वाद घेतला त्या सर्वांना हार्दिक धन्यवाद! ज्यांनी आवर्जून प्रतिसाद दिला त्या रसिकांमुळेच येथपर्यंत मजल मारली. त्या सर्वांना पुनश्च धन्यवाद! दैनंदिन जीवनातही मार्गदर्शक ठरणारी ही वचने आणि सुभाषिते हा एक सहज मुखोद्गत होईल असा अनमोल ठेवा आहे. तो पुढील पिढीला देण्याची जबाबदारी आपली आहे याची जाणीव करून देऊन मूळ विषयाकडे वळतो.
[*]दुर्जन: प्रियवादीच नैतद विश्वासकारणम |
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते - [५]
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[४]
आपण दिलेल्या शास्त्रज्ञानात शिष्याने असे पारंगत व्हावे कि त्या शास्त्रज्ञानात त्याने आपलाच पराभव
( शिकविण्यात यशस्वी ठरल्यामुळे )करावा अशी इच्छा बाळगणारा तो खरा गुरु. हेच तत्व ’शिष्यात इच्छेत पराजयम’! या वचनात अगदी थोडक्यात सांगितले आहे.
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[३]
[*] याज्ञिधर्मिणि धर्मि पापे पापाः समे समाः।
लोकास्तमनुवर्तन्ते यथा राजा तथा प्रजा॥ -- आर्य चाणक्य
अर्थ - एखाद्या राज्यामधील राजा जर धर्मपालन करणारा असेल तर त्याचे प्रजाजनही धर्माचरण करतात. राजा पापी असेल तर प्रजाजनही पापी निघतात. राजा पक्षपात न करणारा असेल तर प्रजाजनही समता पाळणारे निपजतात. जसा राजा तशी त्याची प्रजा.
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[२]
हितोपदेश, पंचतंत्र, रामायण, महाभारत, भगवद्गीता, कौटिलीय अर्थशास्त्र आदी ग्रंथ ही सुभाषितांची भांडारे आहेत. त्यातूनच ही सुभाषिते आपल्यापर्यंत पोचली आहेत.
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[१]
’भुक्कंड’ नाव ऐकायला / वाचायला सुखद वाटत नाही म्हणून कांहीजण त्या धाग्यापासून दूरच राहिले. ’भुक्कंड’च्या प्रतिसादात कांही रसिक मजकूराला भुक्कड म्हणाले. तसा त्यांना हक्कही आहे. पण त्यांचे मत त्यांच्यापुरते! पण त्यामुळे मला 'अरसिकेषु कवित्व निवेदनं ! शिरसी मा लिख मा लिख मा लिख' या संस्कृत वचनाची आठवण झाली. हे वचन ज्या सुप्रसिद्ध सुभाषितात आहे ते सुभाषित असे-
इतर कर्मफलानी यदृच्छया! विलिख तानी सहे चतुरानन!
अरसिकेषु कवित्व निवेदनं ! शिरसी मा लिख मा लिख मा लिख!