छावा!
Submitted by छन्दिफन्दि on 17 February, 2025 - 09:04
बुऱ्हाणपूरच्या हल्ल्यापासून चित्रपटाची सुरुवात होते. अतिशय वेगवान असा हा चित्रपट अनेक घटनांना, मुद्द्यांना स्पर्श करत अखेर छत्रपती संभाजी महाराजांच्या पाशवी हत्येने समाप्त होतो.
क्रौर्याची परिसीमा गाठकलेला औरंगजेब त्यांना मुसलमान बनण्याची ऑफर देतो, तेव्हा अंगाखांद्यावर केलेल्या नखशिखान्त जखमा, त्या जखमांवर मीठ चोळल्यामुळे होणाऱ्या असह्य वेदना, उपटलेली नखं या अवस्थेतही संभाजी राजे त्याला जे उत्तर देतात त्याने औरंगजेब सटपटतो. संभाजी राजांचे धैर्य, पराक्रम आणि शौर्य अचंबित करून टाकते आणि चित्रपट शेवटपर्यंत तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो.
विषय:
शब्दखुणा: