लेखन उपक्रम -२-दुकाळ-दतात्रय साळुंके
Submitted by दत्तात्रय साळुंके on 24 September, 2023 - 13:20
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.
“ये गैबाने बघ की संक-या कवादरनं येत नाय”.
“आवं गाडी जुपत आसलं”.
“म्या म्हणलं हुतं येरवाळी निघायचं. वाटंत भुताचा माळ लागतोया”.
“आला बघा . गाडीत काय तरी भरलया आण पोरंसोरं बसल्याती वर”.
“काय रं उशीर लावला”?
संक-या : “नाय जायचं ऊस तोडणीला. तुका पाटलानं दोन पोती दाणं दिल्याती. वैरण पण दील. म्हणला पाटील अजून जीता हाय”.
“आरं त्यानं दिलं न् त्वा घेतलं. तुला काय लाज हाय का नाय”.
“नाय पाटील म्हणलं ऊसणं देतो. पीकल्यावं परत कर”.
विषय:
शब्दखुणा: