तुझ्या आठवांचे ते विरह गीत माझे।
डोळ्यांत अश्रु,ओठांवर स्मित माझे
रणरणत्या ऊन्हात चालती पाऊले माझी ।
सांग सखे दाखवू कोणास हे दुःख माझे ।।
त्या उंच शिखरांच्या पलीकडे।
आहे एकटेच ते झोपडे माझे।।
हसले सर्व आसवांस माझ्या ।
परी कुणा न दिसले घाव माझे।।
जल धारा मेघांतून बरसल्या।
तरी शुष्क का ओठ माझे।।
स्वप्न पहात नाही मी आता।
छाटले कुणी तरी पंख माझे।।
मंगळवार , २६/०३/२०२४ , ०६:१० PM
अजय सरदेसाई (मेघ)
https://meghvalli.blogspot.com/
खेळ गं खेळ भातुकलीचा, फक्त एकदाच...
जे कधी घडलंही नाही ते अनुभवू फक्त एकदाच !
भांडत होतीस जेव्हा लुटूपुटूचं
कळत होतं नं गुपित प्रेम लपवण्याचं ?
का नाही गं मिटलं भांडण तेव्हा कट्टी-बट्टीचं ...
समोर असताना नाही सुटलं मौन प्रीतीचं
दूर जात होतो तुझ्यापासून, की माझाच मला हरवत होतो?
जगून दाखवीन तुझ्याशिवाय असं मलाच भासवत होतो!
बसवलंय जग तुझ्याशिवायही आता
आणि तूही गुरफटलीयेस त्याच्या विश्वात
जिथे कसले आभास नाहीत की लुटुपुटुची भांडणही नाहीत
फक्त आहे संवाद मनांचा, ध्यास तुझ्या श्वासांचा