त्रिनिदादच्या कूकूचे पुढे काय झाले ? ( coo coo from Trinidad )
Submitted by दिनेश. on 11 May, 2015 - 05:52
भारताच्या अगदी पुर्वेकडील राज्यांबद्दल मला माहीत नाही, पण बाकीच्या बहुतेक राज्यात भेंडी आवडीने खाल्ली जाते.
भेंडीची भाजी करणे हे थोडेसे कौशल्याचे काम आहे. जरा दुर्लक्ष झाले, चुकून झाकण ठेवले, पाण्याचा हात लागला कि भेंडीला तारा सुटायला लागतात. ती भाजी कितीही परतली तरी मनासारखी होत नाही. अर्थात याला उपायही सोपाच आहे. कुठलाही आंबट पदार्थ वापरला ( चिंच, कोकम, दही, टोमॅटो, ताक, लिंबू वगैरे ) तर तारा सुटत नाहीत. भर तेलात भेंड्या तळून घेतल्या तरी तारा सुटत नाहीत. न कापता मीठाच्या पाण्यात उकडल्या तरी तारा सुटत नाहीत.
विषय: