झमाना बदल गया है
Submitted by बेफ़िकीर on 2 February, 2015 - 11:09
वृद्धापकाळ हे जणू दुसरे बालपण आहे, असे म्हणणार्या व्यक्तीच्या त्या मताला माझा तरी आक्षेप आहे.
बालपणी बालकाला काहीच समजत नसते. भले किंवा बुरे! त्याच्या शरीरात फक्त वाढत जाणारी उर्जा असते आणि त्याला त्याच्या पालकांकडून आपापल्या विचारांप्रमाणे घडवले जाते.
वृद्ध व्यक्ती मात्र अवघे आयुष्य कोळून प्यायलेली असते. तिच्यावर नवीन विचारांची पुटे म्हणा किंवा थर म्हणा, चढवता येत नाहीत. तिचे फक्त शरीर विकलांग असते, तेही असते/नसते, थोडे असते/थोडे नसते स्वरूपात! किंबहुना, त्या व्यक्तीचे विचार आमुलाग्र बदलवावे लागणार असतात आणि ते जवळपास अशक्य असते.
विषय:
शब्दखुणा: