निर्भया बलात्कार प्रकरणी आरोपींना आज दि.२० मार्च २०२० रोजी फाशी झाली. गेली सात वर्ष तळमळणारा निर्भयाचा आत्मा अखेर आज मुक्त झाला. निर्भयावर अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या नराधमांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी मात्र जीव तोडून धडपड केली. तरीही अखेर न्यायाचा विजय झाला.
पण, अशा निर्घृण बलात्कार प्रकरणी नराधमांना मी कवितेत म्हटल्याप्रमाणे शिक्षा व्हायला हवी. जेणेकरून असं दुष्कृत्य करण्याची कुणाचीही हिंमत होऊ नये.
निर्भया
"निर्भया"वर अत्यचार होताना नुसतं बघणं
देवा, कसं शोभतं तुला हे असं वागणं
ईतकी का ही निष्ठूर दिलीस शिक्षा तिज
केलस नरकाहूनी बत्तर तिच पृथ्विवरचं जिणं
असच रहाणार का चालु "निर्भयां"च आक्रंदण
अन डोळयावरती कातड ओढून तूझ झोपणं
बांधली मंदीरे सज्जनांनी पूजले तूज देवघरात
कसं जमलं देवळात त्यांच्याच असं उभं अलिप्त रहाणं
"द्रौपदी"ला वस्त्र पुरवणारा कुठे गेला तो हात
का निव्वळ होतं दंतकथांच मिथ्य पुराण?
"सत्यवाना"ला म्हणे होतेस दिले तू जिवनदान
का नाही फुंकलेस मग कुडीत त्या अबलेच्याही प्राण?
असेल खरा जर कणाकणात नृसिंहाचा तूझा अवतार
दुर्जनांचे पोट फाडूनी त्यांना वठणीवरती आण