ऐतिहासीकः जम्मु व काश्मिर राज्याचा विशेष दर्जा रद्द

Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23

एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.

  • ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
  • जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
  • जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
  • अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
  • बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
  • काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
  • एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
  • काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत


-

-

Group content visibility: 
Use group defaults

पाकिस्तानच्या विरोधात उभे रहतात ते सेवक-दौर्‍यामुळे की ६५ कोटी मध्यमवर्गीय बाजारपेठ खुणावते म्हणुन Wink

४९८ आणि ट्रिपल तलाक - आर्थिक सुरक्षिततेवरून तुलना?
४९८ अ - हुंड्या साठी छळ, आत्महत्येला प्रवृत्त करणं. तिथे राहून आर्थिक सुरक्षितता शोधायची ? पैसे मागणार्‍या आणि जिवावर उठलेल्यांकडून?
धन्य!

इन्स्टंट ट्रिपल तलाक अविअध ठरवणा र्‍या कायद्यात त्या महिलेला मेंटेनन्स मिळवायचा हक्क आहे, असं म्हटलंय. त्याचवेळी तो दखलपात्र गुहा ठरवून नवर्‍याला तुतुंगातही धाडलं जाणार आहे. नवर्‍याने तुरुंगात जाऊन बायकोला मेंटेनन्स अलाउअन्स कसा द्यायचा?

इन्स्टंट तलाक अवैध ठरवताना सर्वोच्च न्यायालयाचा उद्देश होता - लग्न वाचवायला वाव मिळावा. नवरा तुरुंगात केल्याने लग्न वाचणार आहे?

शिक्षेची तरतूद डिटरंट म्हणून ठेवलीय म्हणणार्‍यांसाठी - मुलांवरच्या बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देण्याचा नियम केल्याने बलात्काराच्या घटनांचं प्रमाण कमी झालंय?

न्याय आणि कायद्याच्या तत्त्वांत शिक्षा केलेल्यागुन्ह्यासाठी असते, की गुन्हा होऊ नये म्हणून असते?

कृत्तिका जी आपलं म्हणणं मला नीट कळलं नाही. कृपया या विषयावर नवीन धागा काढून लिहाल काय, म्हणजे सविस्तर चर्चा होऊन चांगले वाईट समजेल. धन्यवाद.

पाकिस्तानच्या विरोधात उभे रहतात ते सेवक-दौर्‍यामुळे की ६५ कोटी मध्यमवर्गीय बाजारपेठ खुणावते म्हणुन

इस्त्रायल ला नेहमी युरोपियन देश पाठिंबा देतात तिथे कोणती बाजारपेठ आहे .
सर्व प्रसंगांना एकच तराजू मध्ये तोलने चुकीचं आहे

फक्त कडक शिक्षा गुन्हे रोखू शकत नाहीत .
उलट जेवढी जास्त कठोर शिक्षा तेवढे गुन्ह्याचे कोर्या वाढते .
गुन्हे कमी होण्यासाठी निरपक्ष पद्धतीने आणि जलद न्याय मिळणे गरजेचं आहे .
माणसाची आर्थिक स्थिती,समाजातील किंमत ह्याचा आधारावर भेदभाव केला जावू नये .
आपल्याकडे नेमके उलट आहे न्यायदान ला खूप वर्ष लागतात .
मग गुन्हेगार ला शिक्षा होवून सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही

पाकिस्तानच्या विरोधात उभे रहतात ते सेवक-दौर्‍यामुळे की ६५ कोटी मध्यमवर्गीय बाजारपेठ खुणावते म्हणुन.
>>>
आता मंदी येणारच आहे. मग बघा सगळे देश कसे पाकिस्तानच्या बाजूला जातात अन मोदी अन भारताला खड्यात घालतात.

३७० कलम गेले - एका भस्मासुराचा अंत झाला. ६२ वर्षे भारतीय जनसंघ किंवा भाजपचे मनोगत. शामा प्रसाद मुखर्जीनेत्यासाठी जीवन अर्पण केले. तो संकल्प साध्य झाला. बरे झाले.
http://rashtravrat.blogspot.com/2019/08/article-370-end-of-bhasmasura.html

Submitted by Rajesh188 on 17 August, 2019 - 10:46. >>>

जेव्हा समाज कायद्यांना जुमानत नाही तेव्हा कायद्याची जरब बसविण्यासाठी कडक कायद्याची जरुरी नक्कीच आहे.
मशिदीवरचे भोंगे काढा व दहीहंडी/ नवरात्र / गणेशोत्सवासारख्या उत्सवात रात्री 10 नंतर गाणी वाजवू नका म्हणून वारंवार न्यायालयाने निर्देश देऊनही त्याची अंमलबजावणी किती आहे? जिथे सामाजिक स्तरावर कायद्याचा मान राखला जात नाही तिथे वैयक्तिक स्तरावर तर आनंदीआनंद आहे.

कृत्तिका जी आपलं म्हणणं मला नीट कळलं नाही. कृपया या विषयावर नवीन धागा काढून लिहाल काय, म्हणजे सविस्तर चर्चा होऊन चांगले वाईट समजेल. धन्यवाद.

Submitted by अमर ९९ on 17 August, 2019 - 10:38 >>>>+10000 वेगळा धागा काढाच

आता मंदी येणारच आहे. मग बघा सगळे देश कसे पाकिस्तानच्या बाजूला जातात अन मोदी अन भारताला खड्यात घालतात.

भारत खड्यात जाणे म्हणजे सर्व भारतीय ना वाईट दिवस येणे .
एवढे का भारतावर जळत आहात इथेच राहून

कृतिका,

मग ४९८ अ मधल्या पीडितेला मेंटेनन्स कोण देत? सरकार की नवरा की सासरे?

इस्त्रायल ला नेहमी युरोपियन देश पाठिंबा देतात तिथे कोणती बाजारपेठ आहे .
सर्व प्रसंगांना एकच तराजू मध्ये तोलने चुकीचं आहे
नवीन Submitted by Rajesh188 on 17 August, 2019 - 10:42
<<

इतके समजण्याची कुवत व बुद्धी,
जर इथल्या तथाकथित बुद्धीजीव व विचारवंत लोकांमधे असती, तर कलम ३७० या आधीच रद्द झाले असते.

राजेश

अहो मोदी चुकीचा कसं ठरवायचं? आता चिवटअण्णा म्हणताय की 65 कोटी मध्यमवर्गीय लोकांमुळे पब्लिक आपल्या साईडला येतंय. मग ह्या गृहितकानुसार मध्यमवर्गीयांच कंबरडे एकदा मोडलं की बाजारपेठ मॉडेल बेकार होईल. मग आपोआपच आपले व्यापारी मित्र दूर होतील.

अन आपले मोदीकाका चुकीचे ठरले की आपण गावजेवण घालू!

बरोबर का नाय?

अरे वा , चितळे साहेब आले, राफेल तिसरा भाग आला का ?
नवीन Submitted by BLACKCAT on 17 August, 2019 - 11:04
<<

राफाल चा तिसरा भाग कशाला? खुद्द राफाल विमानच पुढच्या महिन्यात भारतात येईल.
बाकी राहुल गांधीनी लोकसभा निवडणुकी दरम्यान 'राफाल विमान खरेदीत' भ्रष्टाचार झाल्याचा जो धुरळा उडवून दिला होता त्याचे पुढे काय झाले ?

अरे वा , चितळे साहेब आले, राफेल तिसरा भाग आला का ?
>>
ते राहुल गांधींनी राफेल मुद्दा शेल्फवर का टाकला ओ?

ते राहुल गांधींनी राफेल मुद्दा शेल्फवर का टाकला ओ?

नवीन Submitted by रॉनी on 17 August, 2019 - 11:10 >>> सध्या तरी रागा ने त्या चोरीच्या कागदपत्रांची सुरळी करून ठेवली असावी (कुठे ते विचारू नका), त्यामुळेच एव्हढे दिवस त्याचं तोंड बंद आहे.

चितळे भाऊ, कृपया राफेलवर तिसरा लेख विनोदी लेख या सदरात काढाच आणि त्यात रागा न्यायालयात व निवडणुकीत कसा सपशेल तोंडावर आपटला याचे सविस्तर वर्णन लिहा.

>>>>>बाकी राहुल गांधीनी लोकसभा निवडणुकी दरम्यान 'राफाल विमान खरेदीत' भ्रष्टाचार झाल्याचा जो धुरळा उडवून दिला होता त्याचे पुढे काय झाले<<<<<
तुम्हाला माहीत नाही ?
राहुल गांधींनी देशाला पटवुन दिल की
"राफाल विमान खरेदीत भ्रष्टाचार झाला होता" त्यामुळे जनता राहुलच्या बाजुला झाली व काॅंग्रेस सत्तेत आली!!

राफेल आणता आणता जरा ते काळे पैसे ही भरून घेऊन या , तेवढाच उपयोग

आता , पहले आप , पहले आप , पॉलिसीत कुठे अन काय उडवणार ?

पाकिस्तानच्या विरोधात उभे रहतात ते सेवक-दौर्‍यामुळे की ६५ कोटी मध्यमवर्गीय बाजारपेठ खुणावते म्हणुन.
>>>
आता मंदी येणारच आहे. मग बघा सगळे देश कसे पाकिस्तानच्या बाजूला जातात अन मोदी अन भारताला खड्यात घालतात.

Submitted by रॉनी on 17 August, 2019 - 01:25 >>>>>>>>>>>>>>
नक्की भारतीयच ना तुम्ही? गेला भारत खड्ड्यात तर तुम्ही आम्ही आहोत ना सावरायला का फक्त बोलाची कढी
नि बोलाचा भात. इथे फक्त (बोलघेवडे)भाट च जास्त आहेत.

पुढेमागे रागाने आत्मचरित्र लिहिले तर एकदम खरेपणाने आपल्याला चमचे मंडळींनी कसे पढवलं होत हे सांगेल. मी राफेल बिफेल बाबत गंमत करत होतो हे देखील लिहील वर डोळा मारल्याची स्मायली पण टाकेल

आता मंदी येणारच आहे. मग बघा सगळे देश कसे पाकिस्तानच्या बाजूला जातात अन मोदी अन भारताला खड्यात घालतात.
>> हे उपरोधाने लिहिले आहे हे कळलं पाहिजे.

>>>>>>मुलांवरच्या बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देण्याचा नियम केल्याने बलात्काराच्या घटनांचं प्रमाण कमी झालंय?<<<<<
कमी झालेल नाही !! मग काय करायच म्हणता ? गेल्या ७० वर्षात सगळेच गुन्हे वाढलेले आहेत. मग काय सगळ्याच शिक्षा काढुन टाकायच्या ?

Pages