बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या सगळ्यावरून हा चॅनल चा पेड ड्रामाच असण्याचीच शक्यता जास्त वाटत आहे, कारण नाहीतर सारखे ते आमची मने शुद्ध आहेत माझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास आहे या बोलण्याला काही अर्थच नाही . पण मग ममां आणि हर्षदा ने इन्सल्ट करणे हेही स्टेज्ड? इन डॅट केस रेरा बेटर चार्ज देम मोर मनी दॅन द विनर.
चॅनल पुरस्कृत नसेल तर रे रा दोघीही फुल गंडलेले आहेत असे म्हणेन. २४ तास एकत्र राहून जवळीक होऊ शकते, प्रेमात पडू शकणे ही नैसर्गिक आहे, पण मग ते प्युअर मने आहेत , मैत्री आणी रॅपो च आहे वगैरे शुद्ध भंपकपणा. असे म्हणणे असल्यास ते स्वत:ला च फसवत आहेत.
<<
चॅनल काही एक्स्ट्रॉ मनी देणार नाही Proud
आरती सोलंकीचे एलिमिनेशन नंतर इंटरव्ह्युज येत आहेत, तिने सांगितलय कि सई पुष्करचं फ्लर्टींग बघून राजेशला आयडीआ मिळाली, राजेश रेशमला म्हणे इससे बडा कुछ करते है, कारण बिग बॉसमधे अशा जोड्या नेहेमी चर्चेत राहतात म्हणून !
अगोने लिहिलय ते परफेक्ट आहे, संस्कृति रक्षक विरोध करतील हे सांगायला नको, पण इथे कुठलाच ऑडीयन्स काही त्यांच्यावर खुष नाही, तेही राजेश पाहिल्याच आठवड्यत म्हणे कि हे प्रेक्षकांना आवडतं म्हणून तर प्रेक्षक अजुन उचकलेत, अगदी पहिल्याच आठवड्यापासून.
त्यातून राजेश भयंकर डिसरिस्पेक्टफुल , हिंसक वगैरे वागतो , इमेज व्हिलन म्हणूनच बिल्ड अप होणार कारण हे फिक्शन नसून रिअ‍ॅलिटी शो आहे, त्यात कॅप्शन दिसत तसं असतं !
मुळात जगातल्या कुठल्याही ऑडीयन्सने मॅरिड माणुस अफेअर करतो त्याला चिटरच नाव दिलं असतं, यात फक्त संस्कृति रक्षकच आहेत असं काही नाही.
मला रेशम हे सगळं राजेश इतकी डेस्परेट्ली करतेय असं नाही वाटलं, सुरवातीला रा च्या सो कॉल्ड फेक लव्ह स्ट्रॅटजीला हो म्हणून बसली आणि मग मागे वळु शकली नाही. परवा ह.खा ला उत्तरं देताना एक स्त्री म्हणून मला अतिशय आवडली तिची क्लिअर मतं ‘ माय लाइफ माय चॉइस‘ अ‍ॅटीट्युड आवडला पण गेले २ दिवस पुन्हा काहीतरी येड्यासारखं सारवासारवजे बोलली करून सगळा रिस्क्पेक्ट गेला तिच्याबद्दलचा.
एका बेडवर एका ब्लँकेटमधे झोपत असलो तरी वि आर जस्ट फ्रेंड्स ? त्यातून रा जे बोलतो ते ऐकलय ऑडीयन्सने, खरच मैत्रेयीने लिहिलीय ती माझीही रिअ‍ॅक्शन, what the ....
म.मां ची शाळा बाकी कनफ्युज्ड हे मान्य, चॅनल/एडीटींग टिम अ‍ॅक्चुअली जास्त कनफ्युज्ड झाले आहेत , आधी स्पाइस अप करून दाखवताग , मग लोकांची एवढी अतिप्रचंड निगेटीव्हिटी बघून म्हणून अचानक आळा घातला, हे अचानक बहुदा एकत्र एक बेडमुळे झालं !
त्या हिंसक खेळांविषयी म.मा बोलले ते मात्र एक बर झालं !
बाकी खरच राजेश गेला असेल तर घरातली नवीन दादागिरी ह.खा ची ?
राजेश परवडला तिच्यपेक्षा असं होणार कि काय अशी शंका येतेय Proud

आजच्या एपिसोड झलक मधे मेघाला मिळालेले ढिगभर् काटेरी सेक्युलन्ट्स पाहिले, मेघाने एक डॉयलॉग मारायला हवा अनारकली स्टाइल, काटोंको मुरझानेका डर नही रहता Biggrin

रा गेला तरी ये हा जास्त फरक पडेल असं नाही वाटत कारण तिला favour करायला हखाला आणलंय... फार विचित्र वागते रे..she always behaves like immature person...

मेघा , सई , रुतुजा आधीच आवडत होत्या पण अता आउ पण मला खूप आवडायला लागल्या आहेत. सई चे भीड भाड न ठेवता रे रा ला सडेतोड बोलणे खूप आवडले. सई रॉक्स !!!!

हखा कुणालाच नकोशी होणार बघा आता. स्मिता सैपुमेऋआऊ कॅंपमध्ये आल्यासारखीच आहे. जुई-सुशांतला परतीचे वेध लागलेले आहेत. भुषण सेफ खेळायला बघेल. आस्ताद पुष्करबरोबर राहिल. हखा करून करून काय करेल आता?
की रेहजुआभु असा नवा ग्रुप बनेल?? काही सांगता येत नाही.
एक नक्की, मेसैऋपुआऊ हा ग्रुप प्रचंड म्हणजे प्रचंड लोकप्रिय झाला आहे सध्या आणि हे त्यांना कळलंय पण. त्यामुळे ते फार कॉन्फिडन्टली खेळणार यापुढे.

खरेच वाईट वाटले. जे घरात चालत नाही त्याला वेळीच आवर घालता आला असता. त्या हखाला तरी लवकर पाठवायला पाहिजे होते. तिने येता-जाता रेराला सुचविले असते कि जरा नीट बसा, सारखे एकमेकांना चिकटायला जाऊ नका, सार्ख्या पप्या घेऊ नका, सारखे लव यू-लव यू बरे दिसत नाही.
कॅप्टनपण त्यांच्या गटातला असायचा त्यामुळे कधी कॅप्टन नेही सांगायचा प्रयत्न केला नाही कि स्वतःवर नियंत्रण ठेवा, शारिरीक जवळीक नको. घरातल्या बाकिच्या सदस्यांना अवघडल्या सारखे होते. तसे वागू नका. असो. आता रेह आणि मेसै मधे जुंपणार.

बघितलं बिग बॉस. शेवटी राजेशला प्रेक्षक त्याच्याबाबतीत positive असतील ही आशा होते, कित्ती विश्वास स्वतः वर. हा मला आवडायचा पण एकंदरीत इथला प्रवास बघून मनातून उतरला, फक्त रे रा स्टोरीच नाही सर्वच. त्याने फार स्वतःच्या करियरवर निगेटिव्ह परिणाम करून घेतला असं मला वाटलं.

त्याला एकट्याला संधी मिळाली होती परत bb घरात जायची त्याचं सोनं न करता, माती केली त्याने. त्याच्यासाठी मोठी कमेंट लिहून आले bb पेजवर. आता वाचेल मोस्टली सर्व कमेंट्स.

मी तर म्हणेन बर झालं गेला तो . या पुढे पब्लिक चा शिव्यांचा फोकस तरी बदलेल . या आधी कुठल्याही व्हिडीओ च्या खाली ( अगदी कुठल्याही ) सतत रे- रा ला लोक शिव्या घालत होते . त्यांच्या ग्रुप ला पण . आता त्यांच्या ग्रुप ची पण मानसिक मेन्टॅलिटी बदलेल किव्वा बदलालायला पाहिजे . काही जणांना पुष्कर आवडेल .( आवडण्यासारखाच आहे तो ) आणि त्याच्याशी हातमिळवणी करून त्याला स्वतःकडे वळवून घेऊन काहीतरी वेगळ्या गोष्टी घडवून आणाव्यात असं वाटत कारण मेघा आणि सईला खूप कॉन्फिडन्स आहे स्वतःबद्दल त्यांना तशी पुष्करची गरज नाहीये . आणि रेशम वरचा फोकस दुसरीकडे गेला पाहिजे असं वाटत. बस झालं रेशम - राजेश हा एकच विषय . एकटी रेशम असली म्हणून लोकांच काही बिघडू नये . तरी सुद्धा आता रेशमला पण काढा म्हणून लोक सतत हाकाटी करायला लागले तर मात्र कठीण आहे . निदान राजेशला घरी जाऊन रेशम शिवाय ( तिला भेटल्याशिवाय ) स्वतःच्या घरी जाऊन स्वतःच्या घरच्या लोकांना देण्यासाठी वेळ तरी मिळूदे . त्यामुळे इतक्यात रेशम ला घराबाहेर काढू नये असं वाटत Happy

स्मिताला बोलता येत नाही नीट पण कॅकट्स राजेशला देऊन छान भावना व्यक्त केल्या तिने कारण तिला सांगायचं होतं बहुतेक, ती बोलत पण होती अर्थात तो सीन मी बघितला नव्हता पण ते बोलणे राहिले.

रेशमचं काय होतंय, तिने मागे पुष्करला दोष दिला की नॉमिनेशन साठी पण राजेश स्वतः च्या गुणामुळे जाणार होताच लवकर, तीही जाईल कारण जनमत फार विरोधात आहे. नॉमिनेट नाही झाली तर गोष्ट वेगळी.

राजेशने सर्वच बाबतीत family ला गृहीत धरलं असेल कदाचित, मला family साठी वाईट वाटतंय पण अर्थात पर्सनल बाबतीत आपण बोलू शकत नाही वाईट वाटलं तरी. त्याची चूक ही की प्रेक्षकांना गृहीत धरलं त्याने. बिग बॉस ने त्याला नॉमिनेशन पासून वाचवायचे प्रयत्न केले पण रेशमने जुईचं ऐकलं नाही, यावेळी रेशम जबाबदार होती.

जाऊदे, भाग्यविधाता सिरीयल मुळे मला आवडायला लागलेला राजेश बिग बॉस मुळे माझ्या मनातून पार उतरला हे अगदी खरं.

रेशमचं काय होतंय, तिने मागे पुष्करला दोष दिला की नॉमिनेशन साठी पण राजेश स्वतः च्या गुणामुळे जाणार होताच लवकर, >> झालं गेलं होऊन गेलं तो आता भूतकाळ झाला
तीही जाईल कारण जनमत फार विरोधात आहे.>> जाईल कि नाही माहित नाही कारण बाहेर काढणं हा बिग बॉस चा निर्णय असतो पण इतक्यात काढू नये . राजेशला जरा स्वताच्या घरी जाऊन सेटल व्हायला वेळ मिळू दे . इतक्यातच रेशमाच्या परत संपर्कात येऊ नये या करता बिग बॉस ने तिला काढू नये

सुजा तुझ्या म्हणण्याचा अर्थ मगाशीच आला लक्षात माझ्या, तो family साठी बरोबर आहे त्याच्या पण नॉमिनेट झाली तर कदाचित जाऊ शकते असं मला म्हणायचं आहे, ऑफकोर्स bb वर अवलंबून आहे सर्व हे अगदी बरोबर तुझं.

पण जी केस झालीय तिच्यात काही दम असेल आणि सेटलमेंट नाही झाली तर त्या कारणासाठीपण रेशमला बाहेर पडावे लागेल.

पण जी केस झालीय तिच्यात काही दम असेल आणि सेटलमेंट नाही झाली तर त्या कारणासाठीपण रेशमला बाहेर पडावे लागेल. >> नाही केस नाही दाखल झाली . कम्प्लेंट केली आहे . केस दाखल करण आणि कम्प्लेंट करण यात खूप मोठ्ठा फरक आहे . केस दाखल करायच्या आधी कम्प्लेंट करावी लागते जी केलेली आहे आणि मग केस . ती पण धीमे धीमे सहा महिन्याने दाखल होते कारण कोर्टाची किचकट प्रक्रिया . केस दाखल करण्याइतपण कम्प्लेंट करणार्याचा उत्साह राहिला तर तो केस दाखल करतो त्यानंतर ती बरेच वर्ष चालते केस दाखल करणाऱ्यावर गुन्हा शाबीत करण्याची जबाबदारी येते . तसेच राजेश आणि रेशम हे कलर्स चॅनल ने " बिग बॉस " च्या घरात काम करण्यासाठी आमंत्रित केलेले कलाकार असल्याने आणि केस त्या कार्यक्रमामधील आक्षेपार्ह दृशांबद्दल असल्याने कलर्स चॅनल ची पण जबाबदारी असेल . एका सिंगल माणसाचा चॅनल च्या लीगल डिपार्टमेंट पुढे निभाव लागण कठीण . त्याकरता त्याच्या जवळ पैसा पाहिजे /वेळ पाहिजे आणि पेशन्स पण पाहिजेत .

माजेश भंगारपुरे, बेशर्म चीपनीस, जुई रडकरी, आकांत शेलार हे सगळेच महापकाऊ आहेत. आता त्यांचा दादा गेल्यामुळे आणि ममांच्या खडसवण्यामुळे तरी जरा स्वतःच्या चुका सुधारल्या तर ठीक नाहीतर एकामागोमाग एक हे बाहेर पडतील.

काल पिंजर्‍यातून एकएक जण बाहेर आले तसतसे कोण डेंजरझोन मध्ये आहे हे स्पष्ट होत गेलं. जेव्हा रेशमच्या लक्षात आलं की केवळ त्यांच्या टीममधलेच ती, राजेश आणि जुई डेंजरझोनमध्ये आहेत तेव्हा तिचा चेहरा बघण्यासारखा होता. मग त्यातल्या त्यातही तिला जुई जाईल अशी खात्री होती. किती तो ओवर कॉन्फिडन्स!

प्रेक्षकाच्या प्रश्नाला उत्तर देताना रेशम म्हणे "मी जिंकेन असा कॉन्फिडन्स मी घरूनच घेऊन आलीये." मग बाकीच्यांनी काय येता येता कोपर्‍यावरच्या वाण्याकडून सव्वाशे-सव्वाशे ग्रॅम कॉन्फिडन्सच्या पुड्या आणल्या होत्या की काय? राजेश आणि रेशमच्या ओवर कॉन्फिडन्सला सई आणि मेघानं दिलेली उत्तरं भारी होती. सई तर "बिंधास बोलणार" मोडमध्ये होती.

भूषण माझ्या मनातून पारच उतरलाय. स्मिता अगदीच बिचारी आणि येडी वाटते. काही धड स्टँड घेताच येत नाही तिला.

शनिवारी ममांनी मेघासई टीममधील सगळ्यांचंच आणि विशेषतः ऋतुजाचं कौतुक केलं तेव्हा जुईचा चेहरा कसला पडला होता.

ती जुई तर ममांना सतत अडवून मधेच बोलत असते. निदान त्यांचा या बिग बॉसमध्ये रोल काय आहे, आपला काय आहे याचा तरी साधा विचार कर म्हणावं.

आणि किती कंटाळवाणं, एकसुरी आणि रडकं तोंड करून बोलत असते. सईवर सतत कमेंट करते म्हणे ती खुन्नस देते. स्वतःचा चेहरा बघ म्हणावं जरा. सईवर ती जळते हे अगदी स्पष्ट दिसतं.

ती जुई तर ममांना सतत अडवून मधेच बोलत असते. निदान त्यांचा या बिग बॉसमध्ये रोल काय आहे, आपला काय आहे याचा तरी साधा विचार कर म्हणावं. >> हे खरं. जरा बोलू दे की त्यांना बाई. बहुधा मांजरेकरांसोबत बोललो तर आपलं म्हणणं एडीट आउट होणार नाही, असा विचार ती करत असेल. Proud

काल पिंजर्‍यातून एकएक जण बाहेर आले तसतसे कोण डेंजरझोन मध्ये आहे हे स्पष्ट होत गेलं. जेव्हा रेशमच्या लक्षात आलं की केवळ त्यांच्या टीममधलेच ती, राजेश आणि जुई डेंजरझोनमध्ये आहेत तेव्हा तिचा चेहरा बघण्यासारखा होता. >>>> अगदी अगदी, खास करून जेव्हा ऋतुजला सेफ घोषीत केलं तेव्हा तर त्यांचा चेहरा पाहण्यासारखा होता, बाकी दाजीला स्पेशल पॉवर नाय दिली सेव्ह करायची किंवा नॉमीनेट करायची.

माझ्या काही मनातून वगैरे नाही उतरला राजेश . त्याला चॅनल ने खेळ खेळण्याकरता आमंत्रण दिलेला आहे . चॅनलच्या त्या खेळासंबंधीच्या नियमांच्या चौकटीत राहून जिकंण्याकरता किव्वा टिकून राहण्याकरता त्याने काही स्ट्रॅटेजी आखल्या. त्या चुकीच्या ठरल्या एवढच . त्याचा अंदाज चुकला . त्याचा होरा चुकला एवढच . मांजरेकरांनी सांगितलेली गोष्टीं नुसार येसू ख्रिस्ताने जमावाला सांगितलं होत " तुमच्या पैकी कोण मनुष्य आयुष्यात कधीच चुकलेला नाहीये त्याने दगड मारावेत त्या एक माणसाला ". त्यानंतर कोणीच दगड मारले नाहीत . तसच आहे हे . प्रत्येक मनुष्य आयुष्यात चुकतंच असतो . काठावर उभ राहून इतरांना चुकीबद्दल शिव्या घालायला लोकांना फार आवडतात. पण तो स्वतः आयुष्यात कधीच चुकलेला नसतो ?

माझ्या काही मनातून वगैरे नाही उतरला राजेश . त्याला चॅनल ने खेळ खेळण्याकरता आमंत्रण दिलेला आहे . चॅनलच्या त्या खेळासंबंधीच्या नियमांच्या चौकटीत राहून जिकंण्याकरता किव्वा टिकून राहण्याकरता त्याने काही स्ट्रॅटेजी आखल्या.
+१

मलाही राजेश गेला त्याचे वाईट वाटले. अर्थात त्यांचे चाळे जरी आवडत नसले तरी तो तसा बरा होता. मेधा आणि सई अगदीच डोक्यात जातात.

सहज म्हणून सई लोकूरला तिचे चित्रपटस्रुष्टीत किती योगदान आहे ते बघायला म्हणून गूगलले. तर तिच्या एका मराठी चित्रपटाची क्लिप मिळाली. https://www.youtube.com/watch?v=MDeHjteC2OM
हा प्लॅटफॉर्म म्हणून चित्रपट आहे आणि तिचा हिरो आस्ताद आहे. तिच्या आईनेच बनवला हा चित्रपट. स्टोरी चांगली वाटते पण सईला हिरॉईन म्हणून बघवत नाही. चांगल्या विषयाची वाट लावली असे वाटते. कधी हा चित्रपट आला आणि गेला तेच माहित नव्हते.

बरोबर सुजा. तुम्ही तत्त्वज्ञान या विभागात एक नवा धागा का उघडत नाही? >> नाही उघडायचा मला . काही प्रॉब्लेम ? Angry
@ मामी , आणि तुम्ही ज्या प्रकारे त्या माणसांना "माजेश भंगारपुरे, बेशर्म चीपनीस, जुई रडकरी, आकांत शेलार' म्हणून संबोधून अपमानित करताय ना ते हि नाही आवडला मला . काही प्रॉब्लेम ? तुम्हाला कोणी दिला त्यांचा असा अपमान करण्याचा अधिकार ? चॅनल वरचा गेम खेळताहेत ते . तुम्हाला मारहाण नाही केल्येय ना तुमचं वैयक्तिक काही नुकसान केलाय Angry

बरोबर सुजा. तुम्ही तत्त्वज्ञान या विभागात एक नवा धागा का उघडत नाही?>>>> अगदि अगदि...
अन सुशांत म्हणतो तसं पण एक बेड शेअर करणं हि कॉमन गोष्ट आहे आपल्याकरता अन तेच समर्थन इथेहि काहि आयडी देतात.. असं सगळ्यांच घरातुन होत असतं का? माझ्यातरी बघण्यात ऐकण्यात हि गोष्ट अजुन आली नाहि.. संस्कृतीरक्षक असं बर्‍याचदा वर वाचनात आलं म्हणुन हे लिहिलं.

राजेशचा राग रेशम प्रकरणामुळेच येतो असं नाहिये.. उलट असाच खुप फालतु गर्विष्ठ वाटला..
इतराना झोपडपट्टी म्हणताना तो स्वतःच वाटत होता..
१) दुटप्पी वागणं.. :- पलिकडच्या टिम ने नुसतं खुट्ट केलं तरी चिप आणि काय काय.. यानी काहीही केलं तरी आम्ही पुरोगामी.. मन स्वच्छ ई.
२) सतत सिनिअर असल्याचा माज.. माझं च राज्य चालणार अशाच विचारात असायचा.. खरतर
मराठी मधे सिनिअर कॅटेगरी मधे फार कमी लोक येतात .. आधी बॉलिवुड्च्या मानाने छोटी ईंडस्ट्रि आहे.. ग्लॅमर
कमी आहे.. त्यातही राजेश सिनिअर वाटतच नाही.. ओव्हर ऑल कॉन्ट्रिब्युशन कमी आहे..

३) रेशम बरोबर जे सगळं त्याचं चुकलं त्याचं फुकटचं समर्थन .. खरतर हखा ४-५ दिवसापुर्वी आली होती ..
ज्याना वाटत की त्याला सिक्रेट रुम मधे असताना हिंट द्यायला हवी होती की रेरा प्रकरण लोकाना आवडत नाहिये.. .
तर हखा ने ही सांगितलच ना पण दोघही .. हटले नाहित.. त्यामुळे त्याला आधी सांगितलं असतं तरी त्याने तेच केलं असतं..
एकुणच निगेटिव्ह.. अ‍ॅरोगंट आहे तो..

Pages