१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
एकूण काय गंतव्य स्थान
एकूण काय गंतव्य स्थान निश्चित>>नाही रे..गन्तव्य निश्चित, स्थान बदलणार
Bharateeya vivahasansthecha
Bharateeya vivahasansthecha itihaas is copyrightfree.
ओक्के
ओक्के
अहो ती लिंक नेट्वर फुकट्च
अहो ती लिंक नेट्वर फुकट्च उपलब्ध आहे.
limbutimbu च्या विवाहाच्या निमित्ताने....धाग्यावर एकाने आधिच दिलेली आहे.तुम्ही काहीही फेकतो हा आयडी.
म्हणालात म्हणुन तो पुरावा दिला.
हो हो प्रकाशकाना
हो हो प्रकाशकाना कळवाच.
नुस्ती बडबड करण्यापेक्षा कृती करुन दाखवा
फुक्कट आहे !! अरेरे !
फुक्कट आहे !!
अरेरे ! कोकण्याचे पैसे वाया गेले !
फुक्कट आहे !! अरेरे !
फुक्कट आहे !!
अरेरे ! कोकण्याचे पैसे वाया गेले !
limbutimbu च्या विवाहाच्या
limbutimbu च्या विवाहाच्या निमित्ताने....धाग्यावर एकाने आधिच दिलेली आहे.तुम्ही काहीही फेकतो हा आयडी. म्हणालात म्हणुन तो पुरावा दिला.>>>
जरा नीट वाचा हो काय लिहीलंय ते.
तुम्ही म्हणालात की तो ग्रंथ संस्कृतवरुन मराठीत भाषांतर केलेला आहे. या वाक्याला मी म्हणालो फेकतो म्हणून.
ते पुस्तक मराठीतच आहे. भाषांतरित वगैरे नाही.
फुकट नंतर झाले असावे, मी पण
फुकट नंतर झाले असावे, मी पण विकत घेऊनच वाचलेय
आणि हार्ड कॉपी विकतच घ्यावी
आणि हार्ड कॉपी विकतच घ्यावी लागते. कागद आणि छपाईचे पैसे पडतातच
श्रध्दा मामी, एक चक्कर टाका
श्रध्दा
मामी, एक चक्कर टाका की इकडे. तुमच्या "त्या" धाग्यात इन्क्लुड होण्याचं पोटेंशियल आहे ह्या धाग्यात.
जौ दे कोकणस्थ मला वाद घालायचा
जौ दे कोकणस्थ मला वाद घालायचा नाही.
धन्यवाद
धन्यवाद
"वाद हि क्रोधाची जननी आहे, तर
"वाद हि क्रोधाची जननी आहे, तर चर्चा हे समंजसपणाचे अपत्य!"
- संत ऋन्मेष महाराज
अपत्याची गर्लफ्रेंड कोण आहे?
अपत्याची गर्लफ्रेंड कोण आहे?
>>>> "वाद हि क्रोधाची जननी
>>>> "वाद हि क्रोधाची जननी आहे, तर चर्चा हे समंजसपणाचे अपत्य!" <<<<
>>>> अपत्याची गर्लफ्रेंड कोण आहे? <<<<
कुचेष्टा, निंदाळकी या अपत्याच्या गर्लफ्रेन्ड तर कौतुक, शुभेच्छा हे बॉयफ्रेन्डस.
ज्यांच्याबरोबर (अर्थात वरील गर्लफ्रेन्ड वा बॉयफ्रेन्ड बरोबर) अपत्य वावरते, त्याप्रमाणे चर्चा (अपत्य) घडत जाते.
"म.म., हभप, शास्त्रीबुवा लिंबुटिंबु"
(No subject)
कैच्या कै करून ठेवलंय लोकांनी
कैच्या कै करून ठेवलंय लोकांनी या धाग्याचं!
ग'फ्रेंड हे दुखाचे कारण आहे
ग'फ्रेंड हे दुखाचे कारण आहे तर तिचे पत्नीरूप हे मोक्ष!
आणि हे न जाणनारा प्रत्येक पुरुष सुखाच्या शोधात ग'फ्रेंड बदलत राहतो ..
म्हणूनच मी ठरवले आहे की माझ्या यंदाच्या ग'फ्रेंडशीच लग्न करणार!
यंदाच्या
यंदाच्या
श्रद्धा काकू माफ करा हं. चूक
श्रद्धा काकू
माफ करा हं. चूक झाली माझ्याकडून. मला कणाद ऋषींबद्दलच लिहायचं होतं. नादात चुकून कण्व झालं. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आपले आभार.
म्हणूनच मी ठरवले आहे की
म्हणूनच मी ठरवले आहे की माझ्या यंदाच्या ग'फ्रेंडशीच लग्न करणार!>>> यंदाच्या ग'फ्रेंडनेही हेच ठरवले आहे का?
म्हणूनच मी ठरवले आहे की
म्हणूनच मी ठरवले आहे की माझ्या यंदाच्या ग'फ्रेंडशीच लग्न करणार!>>>
एक आ आणि फु सल्ला, कशाला करताय, बॅचलरच रहा... सध्याच्या पिढीतली २-४ कुटुंबे आणि पुढच्या अनेक (न होणर्या) पिढ्यातली अनेक कुटुंबे सुखी होतील
तुम्हाला कण्व कणादातला फरक
तुम्हाला कण्व कणादातला फरक कळत नाही.
सयाजीराव नक्की कोण ते ठाऊक नाही.
कुचाळक्या फक्त करता येतात.
अभ्यास करत जा हो.
यंदाच्या
यंदाच्या
इब्लिस इतका तुसडेपणा मी कधीही
इब्लिस
इतका तुसडेपणा मी कधीही अनुभवला नाही. नावात फरक झाला म्हणून काय झालं ? त्याबद्दल मी दोन्ही वेळी क्षमा मागितली आहे. तुमच्याकडे क्षमा वगैरे नाही का ?
सयाजी शिंदे हे नाव कुणीतरी लिहीलं आहे. कदाचित त्यामुळे चूक झाली असेल. सयाजीराव गायकवाड हे नाव कदाचित चौथीला वगैरे वाचलं असेल. कुस्त्या खेळण्याव्यतिरिक्त स्वातंत्र्य युद्धात त्यांचं इतर काही कर्तूत्व असेल तर लक्षात रहायला हवं होतं हे मान्य.
पण त्यामुळं इथे जे अभ्यासपूर्ण पुरावे आणि ढीगभर लिंका दिल्या आहेत त्याला काही बाधा पोहोचते का ? तुम्ही भाकडकथा म्हणून गेलात ते आत्ताच उगवला आहात. त्या तुमच्या भाकडकथांना उत्तर दिल्यावर गायबच झाला होतात.
तुम्हाला फक्त भिंग घेऊन इतरांच्या चुका काढण्याची सवय आहे असं दिसतं. चांगल्या सवयी बाणवाव्यात असं मी म्हणेन.
(No subject)
ऋन्मेष महाराज, प्रेतात बसलेले
ऋन्मेष महाराज, प्रेतात बसलेले वेताळाला लग्नाची पत्रिका द्यायला विसरु नकोस रे बाबा.
वीणातै, राग मानू नका, पण धागा
वीणातै, राग मानू नका, पण धागा भरकटवायला तुम्हीच सुरूवात केलीत, श्रद्धा ही आधुवादी नवयुवती असताना तुम्ही तिला काकू केलेत, मग माबोकर पण भरकटले. आधी माहिती नाही तर थोडा संयम ठेवून बोलायचे ना...
बरं विषय तसा चावून चोथा झालेला, माबोचे ऐतिहासिक धागे तरी आधी वाचायचेत, तेही नाही..
आता थोडे धीराने घ्या. माबोकर खूप खूप प्रेमळ आणि विनोदी आहेत (इब्लिस तर फार्रच), अनेकजण आपापल्या क्षेत्रात माहीर आहेत (इब्लिस...आहेत पण सांगत नाहीत), तर जरा रुळलात की सगळे ठीक होईल. त्यासाठी एका विषयाची आहुती काहीच जास्त नाही.. बाकीचे सर्व धागे वाचत रहा. हा माझा आपला प्रेमळ सल्ला, रागावू नका बरे.
यंदाच्या ग'फ्रेंडनेही हेच
यंदाच्या ग'फ्रेंडनेही हेच ठरवले आहे का?
>>>
तिने तसे ठरवूनच मला होकार दिला होता. किंबहुना तो होकार थेट लग्नासाठीचा म्हणूनच होता. तोपर्यंत झुलवत होती.
याची विषयाची सांगड घालायची झाल्यास,
आजही आधुनिक नारी प्रेमप्रकरणात लग्नाचा आणि आयुष्याला स्थैर्य कसे येईल याचा विचार करतात,
तर टोणगे पुरुष मात्र उथळतेचे प्रदर्शन मांडत, लग्न होईल तेव्हा होईल म्हणत, फक्त आणि फक्त प्रेमप्रकरणावरच कॉन्सट्रेट करतात.
Pages