बोली ही कुठल्याही संभाषणात संवादात आपण वास्तव जगात वापरतो.आपण त्याला वैखरी वाणी असेही म्हणतो. ही बोली वापरताना आपण नकळत अजून एक संवादाच माध्यम वापरत असतो ते म्हणजे देहबोली. ही देहबोली आपल्या बोलीत मिसळून गेलेली असते. या देहबोली व बोली यांच्या समुच्चयातून आपल्या भावना प्रकट होत असतात. आपल्या बोलीतून व्यक्त होणारे भावना, विचार यांचे आपल्याला अभिप्रेत असलेले प्रकटीकरण झाल्यानंतर समोरच्याला झालेले त्याचे आकलन यात ताळमेळ नसेल तर गैरसमज तयार होतात. हा ताळमेळ तपासायचा कसा? आपण तो प्रतिसादातून तपासायचा प्रयत्न करतो. म्हणजे पुन्हा आकलन हा मुद्दा अपरिहार्य.
आज १५ अॉगस्ट! स्वातंत्र्यदिन. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
दरवर्षी प्रमाणे 'मिले सूर मेरा तुम्हारा' दाखवण्यात आले.भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सगळे भारतीय म्हणून एक आहोत असा संदेश देणारं हे गाणं.
भाषेशी खेळू नका
************
भाषेशी खेळू नका कुणी
माझ्या मुशीला जाळू नका कुणी
चार टुकार डोक्यांची
हुशारी पाजळू नका कुणी
कैलासाची लेणे माझे
त्यावरी सिमेंट फासू नका कुणी
इंग्रजळल्या कार्ट्यांसाठी
आईस बाटवू नका कुणी
भाषा तुका ज्ञानेशाची
चांदण्याची वस्त्र ल्याली
चिखलात मूर्खपणाने रे
तिला लोळवू नका कुणी
एकेक अक्षराचा असे
उंच उंच बुरूज इथे
हलवून पाया तिचा
उगा बुजवू नका कुणी
आकड्यांची जोडाक्षरे
फार काही अवघड नाही
पेलण्यास भाषाप्रेम
काय तुमच्यात धाडस नाही
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांना क्रमांकातील जोडाक्षरे जमत नाहीत म्हणुन हे सोपे केले आहे असे त्यांचे म्हणने आहे.
हा निर्णय घेताना भाषातज्ञांना, पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेतले होते का? त्यांचे मत विचारले होते का?
काही सर्वेक्षण केले होते का? त्याचा सँपल साईझ किती?
या प्रयोगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार त्याची जबाबदारी कुणाची?
गेल्या चार वर्षांत बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि त्यासह एकंदर जगही बदलतंय, आपण कुठे आहोत, मायबोलीवर शाळेचे लेख टाकून आता १० वर्ष झाली असं काहीसं झालं.
मायबोलीवर, विशेषतः माझ्या समर स्कुलच्या प्रश्नांची आणि एकंदर "आता पुढे काय" या संदर्भात इथे भरपूर माहिती मिळाली! एका मावशीने युएसहुन इमेल संपर्क करून खूप मदत केली, इतके छान वाटले होते तेव्हा. नंतर काही आराखडे बदलले, जे ठरवले करायचे ते नकोसे झाले, पण मी आजही त्यांची ऋणी आहे.
आज मी इथे आलेय, जे मी ह्या वर्षात शिकले, समजले, ते तुम्हाला द्यायला!
“सर, मी शिक्षिका होऊ? कुठला विषय शिकवू?”
“जरूर. काहीही शिकव; मीही येऊन बसेन वर्गात. पण इतक्यात नको.”
बारावीनंतर काय करायचं याबद्दल गणिताच्या मॅकिन्टॉश सरांशी गप्पा चालल्या होत्या. आपापल्या निवडीबद्दल प्रत्येकाला सरांकडून खात्रीचे चार शब्द ऐकायचे होते. शिक्षिका व्हायला सांगून “इतक्यात नको” असं का म्हणाले असतील सर?
“एव्ही. एवढंच नाव सांगत्ये मी सगळ्यांना, कारण इंग्लंडमध्ये कोणालाच उच्चार नाही जमत माझ्या नावाचा.” कॉलेजच्या पहिल्या आठवड्यात एक मुलगी मला म्हणाली.
“तरी मला खरं नाव सांग; मी म्हणून बघते.” दृष्टद्युम्न म्हणता येतं एवढ्या एका क्वॉलिफिकेशनवर मी विडा उचलला.
मराठीत भाषेत अन्य भाषांमधून होणारी आवक आपल्याला नवी नाही.महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधे बोलल्या जाणार्या भाषांपासून ते फारसी,इंग्लिश,पोर्तुगीज,अरबी अशा बर्याच भाषांमधून ही आवक झालेली आहे.
काही शब्द तर मूळचे मराठी नाहीत हे सहजपणे लक्षातही येणार नाही इतके ते मराठी भाषेत बेमालूमपणे मिसळले आहेत,स्वीकारले गेले आहेत.
ही आवक अजूनही सुरुच आहे.
पण ही आवक किती होऊ द्यायची यालाही काही मर्यादा असाव्यात,त्यामागे निश्चित असे धोरण असावे असे वाटू लागले आहे.
खालील वाक्ये पहा.
"हार्डडिस्क केबलनं लॅपटॉपला अॅटेच केली की विदीन टेन सेकंद लॅपटॉप आपोआप बंदच होतो."
"विमान कंपन्यांचा ताबाच घेते आता मी." लालबुंद चेहर्याने मी जाहीर केलं.
"कशाला?" तितक्याच शांतपणे नवरोजींनी विचारलं.
"त्यांना सुधारायला." धुसफुसत मी उत्तर दिलं. मुलगा विनोद झाल्यासारखा खो खो हसला.
"बाबाचा ताबा तुझ्याकडेच आहे की. तो कुठे सुधारला?"