मुलांचे भाव विश्व इतके निरागस असते ना, अगदी पारदर्शक.. आपण कल्पनाही नाही करू शकत त्याबद्दल. आपल्याला कल्पना नसते, जाणीव नसते, पण त्यांचे आपल्या बोलण्याकडे, वर्तणुकीकडे खूप बारकाईने लक्ष असते. त्यावर त्यांच्या चिमुकल्या मेंदूत काही विचारमंथन पण चालू असते.