जीवनाचे धडे
Submitted by मिलिंद जोशी on 1 September, 2019 - 08:52
काल बऱ्याच दिवसांनी माझ्या वर्गमित्राचा फोन आला होता. भरपूर गप्पा झाल्या. अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तशा अनेक खपल्याही निघाल्या.
“काय म्हणताहेत तुझी मुलंबाळं?” मी नेहमीचा प्रश्न विचारला आणि तो एकाएकी गंभीर झाला.
“यार... बरं झालं तू लग्न केलं नाहीस...” त्याने म्हटले आणि मी चाट पडलो. खरंय ना... जो माणूस ‘मिल्या... तूही उरकून टाक आता... किती दिवस संट्या राहणार?’ असं म्हणायचा त्याच्याकडून असे वाक्य अपेक्षितच नव्हते.
“कारे? काय झालं?” मी थोडं गंभीर होत विचारलं.
विषय:
शब्दखुणा: