क्रिकेट विश्वकप २०१९ - भारत वि. ईंग्लंड - अंतिम सामना ??
Submitted by हायझेनबर्ग on 5 July, 2019 - 11:08
विश्वकप आता 'करो या मरो' फेरीत येऊ ठेपला आहे. अपेक्षेप्रमाणे बाद फेरीचे चारही संघ निश्चित झाले आहेत.
अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला पुन्हा एकदा ईंग्लंडशी लॉर्ड्स मैदानावर होण्याची बरीच शक्यता आहे.
साखळी फेरीतल्या आपल्या संघाच्या सगळ्या डिपार्टमेंटमधल्या कामगिरीवरून आणि खासकरून ईंग्लंड विरूद्धच्या पराभवावरून धडा घ्यायचा झाल्यास आगामी सामन्यासाठी भारतासमोर नक्कीच बरीच आव्हाने ऊभी आहेत. त्यातल्या काहींचा ऊहापोह मी ईथे करू ईच्छितो.
विषय: