भारत म्हणजे गल्लाभरू संधी (slumdog To Daughter of India)
तिथल्या' लोकांना आमच्यावर सिनेमा बनवावा वाटतो …ते येतात मुंबई सारख्या शहरात कितीतरी चांगल्या गोष्टी असतांना नेमके धारावी सारख्या जगप्रसिद्ध स्लम मानल्या जाणाऱ्या परिसरात शिरतात आणि तिथली जेवढी घाण मिळेल, जेवढं वाईट मिळेल सर्व शूट करत फिरतात. मग त्यावर सिनेमा बनतो जगभरातली लोकं नाक तोंड मुरडत भुवया चढवत तो सिनेमा बघतात आम्ही मुसमुसत बघतो…. सिनेमा करोडोचा गल्ला जमवतो आणि आम्ही आमच्यावर फिरंग्यांनी सिनेमा बनवला आणि त्याला अवार्ड मिळाला म्हणून 'जय हो' म्हणत त्यांना डोक्यावर घेऊन नाचतो.