मुलाखत - श्रीमती मोनिका कुलकर्णी - संस्थापिका "आजोळ"
Submitted by संयोजक_संयुक्ता on 12 May, 2013 - 01:49
आधुनिक जमान्यात आपापल्या नोकरी-व्यवसायांत व दिनचर्येत व्यस्त असणार्या पालकांसाठी वरदान ठरतात ती सुसज्ज व सुविधापूर्ण पाळणाघरे! आपले मूल आपल्या अनुपस्थितीत तेवढ्याच काळजीने व मायेने वाढविले जाणे, त्याला घरात वाटणारी सुरक्षितता व आश्वासन पाळणाघरातही वाटणे आणि तेथील वातावरण हे त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक विकासासाठी पूरक असणे ही आजच्या काळातील पालकांची गरज आहे. जन्मदात्या मात्या-पित्यांच्या गैरहजेरीत मुलांचे मायेने संगोपन करणार्या संस्थांमध्ये व्यावसायिक सफाई व दर्जात्मकता आणून कालानुरूप नवा कल आणणार्या पुणे शहरातील पाळणाघरांमधील एक अग्रगण्य नाव म्हणजे ''आजोळ''.