
The cost of our success is the exhaustion of natural resources, leading to energy crises, climate change, pollution, and the destruction of our habitat. If you exhaust natural resources, there will be nothing left for your children. If we continue in the same direction, humankind is headed for some frightful ordeals, if not extinction.
- Christian de Duve
दोस्तहो,
रूदरफर्डला अणूचं मॉडेल समजलं त्यातून आधुनिक विज्ञानाची घोडदौड सुरू झाली. त्याला अणूचं मॉडेल सापडलं ते ही जुगाड टेक्नॉलॉजीने. थिअरी विदाऊट प्रॅक्टीकल इज ब्लाईंड यावर त्याचा विश्वास होता. प्रॅक्टीकल शिवाय थिअरी मांडणार्यांबद्दल त्याचं मत फारसं चांगलं नव्हतं. मात्र पुढे पुढे थिअरी विदाऊट प्रॅक्टीकल हे जिनीअस असण्याचं लक्षण झालं. आईनस्टाईन तर त्याची लॅब म्हणजे त्याचे पेन किंवा ब्रेन आहे असे म्हणायचा. इथे आपल्याला या वादात पडायचं नाही. याचा संदर्भ पुढे येईल.
या वैज्ञानिक क्रांतीला विज्ञान म्हणायचे कि अप्लाईड सायन्स म्हणायचे हे ठामपणे सांगता येणार नाही.
विज्ञानाचे नियम माणसाला माहिती असावेत. पण त्याच्या किती आहारी जायचे, त्याचे दुष्परिणाम काय होणार हे सुद्धा त्याच वेळी त्याला शिकता यायला हवे होते. तसे ते झालेले नाही. प्रॅक्टीकल मुळे त्याचे दुष्परिणाम समजले असते. आईनस्टाईनच्या डोळ्यादेखतच अणूचा वापर विध्वंसक कामासाठी होताना त्याने पाहिला आणि तो ही त्याला थांबवू शकला नाही.
एखादी लस किंवा औषध बाजारात आणायचे असेल तर त्यासाठी केव्हढी मोठी प्रक्रिया आहे. ती लस माणसाला टोचायच्या आधी तिचे दुष्परिणाम काय आहेत हे पहावे लागते. ते तपसणारी एक स्वायत्त संस्था आहे. त्यावर जागतिक संस्था आहे. याशिवाय या किचकट चाळणीतून गेल्यावरही पुढे काही संकट आलेच तर ते औषध मागे घ्यायला लागू शकते अशी व्यवस्था निश्चितच अस्तित्वात आहे ( असे होते कि नाही हा मुद्दा बाजूला ठेवू). औषधाचा शोध लावण्यापूर्वी माणसावर दुष्परिणाम होणार नाही ही जबाबदारी आपण घेतो. ती हमी आपण देतो. पण इतर शोधांचे काय ? त्याचा मानवी जीवनावर किंवा पृथ्वीवर, अंतरिक्षावर काय परिणाम होईल हे तपासण्याची व्यवस्था आहे का ?
आणखी एक उदाहरण पाहूयात.
American Society of Heating, Refrigerating, and Air Conditioning Engineers या संस्थेच्या हँडबुक मधे कंफर्टची व्याख्या केलेली आहे. २००१ च्या आवृत्तीनुसार कंफर्ट म्हणजे वाहेरच्या तापमानापेक्षा पाच ते दहा अंशाने कमी तापमान ठेवणे. (आतले तापमान आणि बाहेरचे तापमान यात यापेक्षा फरक असल्यास थर्मल शॉक बसून उपभोक्ता मृत्यूमुखी देखील पडू शकतो) . वास्तविक एसीच्या संदर्भात कंफर्ट म्हणजे बाहेरच्या तापमानापासून सुसह्य वाटेल इतका तापमान बदल. त्यापेक्षा थंड करणे या मानवी स्वभावामागे सुखासीनता, हव्यास कारणीभूत आहेत. गरज आणि आरामाचा हव्यास यातली निवड करता यायला हवी.
अॅश्रेच्या हॅण्डबुकवरून माणूस जेव्हां स्वतःसाठी शोध लावतो तेव्हां इशारेही देतो हे दिसते. . माणूस हा असा स्वार्थी प्राणी आहे.
पण त्याच रेफ्रिजरेशन मुळे तापमान बदलाला सुरूवात झाली. पर्यावरण, प्राणीजीवन यावर काय परिणाम होतील यावर मनुष्य उदासीन असतो. इतकेच काय स्वतःच्या स्वार्थासाठी प्राण्यांना लस टोचली जाते. रेडीएशनच्या प्रयोगांसाठी मुक्या जिवांचा वापर होतो.
माणूस असा बेदरकार आहे.
अर्थात अॅश्रे ने सुधारणा करत पर्यावरण स्नेही वायूंचा वापर अनिवार्य केला आहे त्याचे स्वागत. त्यामध्ये विवेकवाद्यांचे योगदान आहे.
औद्योगिक क्रांतीनंतर जे जे शोध लागत गेले त्यांना अशा चाळण्या / चाचण्या अस्तित्वातच नव्हत्या. कारण एका बाजूला ध्येयाने झपाटलेली वैज्ञानिक कम्युनिटी, त्यांना प्रोत्साहन देणारी उत्पादक मंडळी आणि दुसर्या बाजूला या पासून अनभिज्ञ जनता. या असमतोलामुळे वैज्ञानिक शोध लागले त्यापेक्षा ते झपाट्याने वापरात आले. तंत्रज्ञान विकसित होते गेले आणि मग काही काळाने या विज्ञानाशी जुळवून घेतलेल्या सामान्य जनतेला त्याचे भान आले. त्यातूनच मग दुष्परिणामाची तपासणी कराविशी वाटू लागली.
माणसाच्या कंफर्ट साठी वातानुकूल यंत्रणे आणि शीतकपाटं विकसित झाली. त्यासाठी पूर्वी फ्रिऑन गॅसेस वापरले गेले. ते पर्यावरणस्नेही नाहीत हे समजायला पाच दशकं जावी लागली. या काळात पर्यावरणाचे व्हायचे ते नुकसान झाले. त्यानंतर आर सिरीज गॅसेसचा वापर सुरू झाला. मग तिसर्या जगातून ओरड सुरू झाली कि आता तिसर्या जगाने उत्पादन सुरू केल्याबरोबर मुद्दामून हे निर्बंध आणले गेले आहेत, जेणे करून पाश्चात्य देशांचीच उत्पादने सक्तीची व्हावीत. यात तथ्य असेलही. पण पर्यावरणाच्या लढाईला असा आर्थिक असमतोलाचाही कोन प्राप्त झाला.
जगातला अणूकचरा तिसर्या देशात आणून टाकून द्यायला सुरूवात झाली. आफ्रिकन देशातल्या त्या त्या भागात माणूसच नाही तर प्राण्यांवर आणि वनस्पती, झाडांवरही विकृत परिणाम दिसू लागल्यावर ते बंद झाले.
सगळी यादी देणे हा इथे उद्देश नाही. विज्ञानाला विरोध हा सूर इथे नाही.
तर कोणतेही शोध लागले तर त्याच्या वापराआधी जो विरोध होतो त्याचे समाधान झाले पाहीजे. त्या उलट काही हुषार वादविवादपटूंची नेमणूक केली जाते. ते अशा आक्षेपांची नोंद घेतात. मग या आक्षेपांना गप्प करणारी उत्तरे तयार केली जातात. हे टूलकीट त्या त्या वापरकर्त्याच्या एजन्सीला दिले जाते. त्यांना प्रशिक्षण दिले जाते. अशा सेवा घेणार्या कंपन्या एकत्रित रित्याही नरेटिव्ह सेट करायच्या मागे लागतात. आता तर व्यापारी संघटना आहेत, उत्पादक संघटना आहेत. नव्या उत्पादनाच्या भावी आक्षेपांना मोडीत काढणार्या पीआर एजन्सीजचे हे सुगीचे दिवस असतात.
घरात मोबाईल आला कि जुन्या जमान्याच्या वैभवाच्या खुणा मिरवणारं ओसरीत बाजेवर पडीक असणारं एखादं म्हातारं ओरडतं " आरं, कशाला ते डबडं आणलंय ? त्याच्या वाचून अडलं व्हतं का काय ?"
त्याला पोरं उत्तर देतात " ओ आबा, गप बसा, आताच्या जमान्यात हे लै गरजेचं हाय"
" आरं पर त्यानं नुस्कान काय व्हणार ते कोन बगनार ?
" आबा, तुमीच सांगा कि काय नुक्सान हाय ते "
" आता मला समजलं असतं तर बसतं व्हय सांगितलं ?"
" मंग नाय माहीत तर कशाला नुस्तंच आडवं लावता ?"
"बरं बाबा राह्यलं "
प्रॉब्लेम हा इथे आहे.
म्हातार्याला जे म्हणायचं असतं त्याचा आत्मा पोरांना समजूनच घ्यायचा नसतो. आपल्याकडे मोबाईल नसणे हे आपण आउट ऑफ डेट झाल्याच्या पीअर प्रेशरखाली मोबाईल घेतला जातो. त्यात फोन सोबतच इंटरनेट, टिव्ही, ओटीटी या सर्व सुविधा मिळू लागतात. हे सर्व आपल्याला परवडतं का ? याचा उपयोग आहे का याचा विचार मागे पडतो.
सिंहगड रस्त्याच्या दुतर्फी असलेली हिरवीगार झाडे तोडण्यासाठी मनपाने हुकूम काढला कि त्याला विरोध सुरू होतो. मग या विरोधकांना जनतेचा सपोर्ट मिळू नये यासाठी त्यांचे खलनायकीकरण, गुन्हेगारीकरण, दानवीकरण केले जाते. या मंडळींना विकृत, लहरी ठरवले जाते. त्यांना विकास विरोधी ठरवले जाते. "मग काय धोतर नेसून फिरायचे का ? " "तुम्ही वल्कले नेसून फिरता का ?" किंवा झाडांना इजा पोहोचवायची नसेल तर मग "तुम्हाला बर्थडे सूटमधेच फिरावे लागत असेल ना ? कारण पानांची वस्त्रे हा सुद्धा गुन्हाच आहे" अशी तयार वाक्ये फेकली जातात.
सामान्य माणसे मुद्दे मांडत असतात. ते वादविवादपटू नसतात. व्यावसायिक ट्रोल्सना ते उत्तरं देऊ शकत नाहीत हे या एजन्सीजने हेरलेले असते. याचा परिणाम म्हणून विरोधाच्या बाजू लंगड्या, दुबळ्या आणि क्षीण पडतात. शिवाय विध्वंसाच्या बाजूने भांडवल असते. भांडवल प्रसार माध्यमांनाही नियंत्रित करते. हा एक सुसंघटीत माफिया आहे. हा विकास खरोखर माणसाच्या भल्यासाठी आहे का ?
माणसाला जगण्यासाठी काय लागते ?
उपग्रहांचे शोध लागले तर हवेच आहेत. अंतरीक्षाचा शोध अनादि काळापासून माणूस घेत आला आहे. त्याबद्दल ना नाही. इथे विवेकाची नितांत आवश्यकता आहे. पण अवकाशात होणारा कचरा पुढे विश्वाच्या नाशाला कारणीभूत होईल का याची उत्तरे कधी शोधणार ? दुष्परिणामांचा शोध लावणे हे जिनीअस असणे नाही का ? त्यासाठी बुद्धी लागत नाही का ? माणसाला फॅन्सी वाटतील, लक्झरी वाटतील अशा शोधांचे जनकत्व आपल्याकडे असावे हा इगो आहे का ? या शोधांचे दुष्परिणाम समोर आणणे हे दळभद्रीपणाचे लक्षण आहे का ?
एका व्हायरल क्लिप मधल्या दाव्यांनुसार पृथ्वीवरचे ६५% जीवन गेल्या दोनशे वर्षात नष्ट झालेले आहे. अर्थात या क्लिपचा उद्देश चांगला असला तरी काही तथ्या़ंकडे दुर्लक्ष झाले आहे. जसे कि अरल समुद्र हा तापमान बदलामुळे आटला. खरे तर तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या १९६७ सालच्या अजस्त्र आणि महत्वाकांक्षी जलसंधारण योजनांमुळे जी महाकाय धरणांची मालिका या अरल समुद्राच्या फीडर नद्यांवर उभारली गेली त्यामुळे पाण्याचा पुरवठा बंद झाल्याने अरल समुद्र नाहीसा झाला. तपशीलात चूक असली तरी या टीमने गेल्या काही वर्षात पृथ्वीची जी असंख्य छायाचित्रे घेतली आहेत त्यामुळे विकासाचा विध्वंस समोर आलेला आहे. अर्थात त्या वेळी या शंका उपस्थित झाल्याने नवा व्हिडीओ प्राप्त झाला.
https://www.youtube.com/watch?v=UHkEbemburs
हे थांबवणे आपल्या हातात आहे का असा विचार येतो.
असा विचार मांडणारे सगळे मूर्ख, अर्धवट, विकृत म्हणून हल्ला करायला येताना थोडे थांबले पाहीजे. माणूस बुद्धीजीवी आहे हे कबूल. पण त्याचा अरोगन्स नियंत्रित असायला हवा. त्याला विवेकाची जोड हवी. जाणून घेणे, शोध लावणे इथपर्यत आम्ही इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत हा अरोगन्स कुरवाळायला ना नाही.
पण विद्वत्तेला विवेकाची जोड असावी हे सुद्धा माणसाच्या बुद्धीवंत असण्याचेच लक्षण आहे. विद्वत्ता आणि शहाणपणा १८० अंशाच्या कोनातून एकमेकांच्या विरोधात जाऊ शकत नाही. तसे ते गेले कि हिरोशिमा, नागासाकी घडते. अर्थात कोणतेही युद्धखोर शस्त्रे हे विवेक नसल्याचेच लक्षण आहे.
म्हणूनच जीवन जगण्याची कला सांगणारे तत्त्वज्ञान (ज्याला जे झेपेल ते) ते सुद्धा शिकायला हवे. समाजाला मिळून मिसळून रहायला लावणारे तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान आत्मसात केले पाहीजे. ते ही शिकवायला हवे. शाळेपासून त्याची सुरूवात हवी. दहावीच्या विद्यार्थ्याचा निकाल लागला कि विज्ञान आणि गणितात किती गुण पाहिले जाते. जणू काही इतर ज्ञानशाखा आता रद्द झालेल्या आहेत असा समज झालेला आहे. वैज्ञानिक दृष्टी आणि विज्ञानाचा अहंकार यातला फरक समजेनासा झालेला आहे.
पृथ्वी वाचवण्यासाठी शौचाला फ्लश ऐवजी बादली वापरा, स्नानाला शॉवर ऐवजी मगाचा वापर करा अशा फुटकळ मललमपट्टीपेक्षा आणि बाह्य इलाजापेक्षा आतला इलाज महत्वाचा आहे. आपल्या वैज्ञानिक युगात विज्ञानासोबत जगताना आपल्या चुकीच्या धारणांचा सामना करायला हवा. त्या धारणा चुकीच्या आहेत याची कबुली आधी स्वतःला दिली पाहीजे. मग निसर्गाची क्षमा मागायला हवी.
चंगळवाद, हव्यास, लालसा या गोष्टींवर मात करता येण्यासाठी किमान गरजा ठाऊक असायला हव्यात. एक अपारंपारिक उर्जास्त्रोतांना वाहून घेतलेले जर्मन शास्त्रज्ञ शेफलर होते. त्यांनी सूर्यापासून, पवन उर्जेपासून आणि अन्य आपारंपारिक स्त्रोतांवर चालणारी अनेक संयंत्रे विकसित केली आहेत. पण हे शोध हस्तांतरित करताना ते त्यांच्या विद्यार्थ्यांना विवेकाची कास धरायचा आग्रह धरतात.
त्यांचे संशोधक विद्यार्थी घरात फ्रीज वापरत नाहीत, एसी वापरत नाहीत. या गोष्टींच्या आहारी जात नाहीत. त्यांचे एक विद्यार्थी वलसाडला आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या घरात तर वीजही नाही. रात्री सोलर कंदीलाचा वापर होतो. टिव्ही नाही. टिव्हीवरच्या डिबेटस हे वैचारीक प्रदूषण आहे असे ते म्हणतात. त्यांच्या सहवासात येताना हेच विचार विस्कळीत स्वरूपात होते. गेल्या वीस वर्षांपासून मी ही टिव्ही कमी म्हणजे जवळपास बंद केला आहे. काहीही नुकसान होत नाही.
मास उत्पादन जिथे अनिवार्य आहे तिथे ते घ्यावे. पण त्याचा अॅण्टीडोटही शोधून काढावा असे ते म्हणतात. ते जन्माने हिंदू, कर्माने वैज्ञानिक , तत्वाने जैन, बौद्ध आणि ओशो यांचे मिश्रण आहे. ते झेन सुद्धा आहेत. जे चांगले वाटते ते आत्मसात करावे. स्वतःवर नियंत्रण मिळवले कि गरजा कमी होतात. उपभोक्त्याच्या गरजा कमी झाल्या कि उत्पादन कमी होते. उत्पादन कमी झाले कि पृथ्वीचा नाश थोडा मंदगतीने होतो हे त्यांचे तत्त्वज्ञान आहे. त्यासाठी धर्माचे बंधन नाही. हा मूलतत्ववाद आहे असे वाटत नाही. ते ही त्यांच्या विद्यार्थ्यांना हा विचार देतातच.
विज्ञान या पद्धतीने जबाबदारीसहीत आणखी पुढे गेले तर काय हरकत आहे ?
आपणासी जे जे ठावे ते ते दुसऱ्यासी सांगावे
शहाणे करून सोडावे सकळ जन...
अशा पद्धतीने ही लोकहितवादी चळवळ पुढे गेली पाहीजे. जितकी जास्त वर्षे लागतील तितका झालेला विध्वंस पुन्हा भरून काढता येणार नाही. पण अशी चळवळ न चालवता नुसतेच उसासे सोडून हा विध्वसं थांबणार नाही.
Saving our planet, lifting people out of poverty, advancing economic growth… these are one and the same fight. We must connect the dots between climate change, water scarcity, energy shortages, global health, food security and women’s empowerment. Solutions to one problem must be solutions for all. – Ban Ki-moon
******************************************
लेख त्रोटक शब्दात असल्याने अधिकचे संदर्भ. प्रतिसादात देखील दिलेले आहेत. देत राहणार आहे.
भारतात येत असलेले विध्वंसाचे संकट आणि उपाय
https://www.youtube.com/watch?v=5At6eVbXNck
व्यक्ती म्हणून काय करता येऊ शकते ?
https://www.youtube.com/watch?v=CeWkPMqupDI
छान , माहितीपूर्ण लेख..!
छान , माहितीपूर्ण लेख..!
लेखातून तुमची कळकळ जाणवली.
दहावीच्या विद्यार्थ्याचा निकाल लागला कि विज्ञान आणि गणितात किती गुण पाहिले जाते. जणू काही इतर ज्ञानशाखा आता रद्द झालेल्या आहेत असा समज झालेला आहे>> हे अगदी पटलं. दहावीला चांगले गुण असूनही मी वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला तेव्हा बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं होतं.
विचार करण्यासारखा लेख. ते
विचार करण्यासारखा लेख. ते वरचं चित्र फारच आवडलं.
पण यातुन काही कृती घडून, मोठ्याप्रमाणावर सदसदविवेक जागृत होऊन चक्रे उलट फिरण्यावर विश्वास नाही. कालची लालसा, आजची गरज आणि उद्याचा हक्क बनतो. विनाश होईल तरी हे चक्र उलटे फिरणे शक्य नाही.
यातुन बाहेर पडायला आणखी नवं विज्ञान/ तंत्रज्ञानच मदत करू शकेल.
किमान गरजा या बदलत असतात. आजी-आजोबांच्या किमान गरजा, आई - वडिलांच्या नाहीत, आपल्या नाहीत आणि आपल्या गरजा आपल्या मुलांच्या नाहीत. आनंदी रहाणे असं सहज बदलता येत नाही, जग बदलतंय तसं एकतर तुम्ही प्रवाहपतित व्हायचं, कितपत व्हायचं, कसं व्हायचं... परत यात आनंदी राहुनच सगळं केलं तर काही अर्थ. मारुन मुटकुन काही करणे शाश्वत कसं असेल? थोडक्यात बदल घडणे सोपं वाटत नाही.
उदयजी, खूपच सुंदर प्रतिसाद.
उदयजी, खूपच सुंदर प्रतिसाद.
धाग्याची गाडी रूळावर आणून ठेवल्याबद्दल शतशः धन्यवाद.
माहितीचा, ज्ञानाचा ( किंवा अवजाराचा) वापर कसा करायचा हे सर्वस्वी मानवाच्या नितीमत्तेवर, ethics values वर अवलंबून आहे , गैरवापर होत असेल तर विज्ञानाला / तंत्रज्ञानाला दोष देता येणार नाही. ) तसाच त्याचा वापर विद्वंसासाठी पण झालेला आहे. भविष्यात होणारच नाही हे सांगता येत नाही. >> सहमत.
विज्ञान तुमच्या समोर निसर्गा बद्द्लचे ज्ञान उलगडून सांगेल.... त्या ज्ञानाचा/ माहितीचा ( त्यामुळे मिळालेल्या तंत्रज्ञानाचा) वापर कसा करायचा हे मानवाने ठरवायचे आहे, सर्वस्वी मानवाच्या हातात आहे. >> मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक !!
मुळात ऊर्जेचा तुटवडा कधीच
मुळात ऊर्जेचा तुटवडा कधीच पडणार नाही, हा कन्सेप्ट मला अजून नीटसा कळला नाहीय. >>> महत्वाचा मुद्दा आणला आहे निपा तुम्ही. हा स्वतंत्र धाग्याचा विषय होईल एव्हढे पोटेन्शियल त्यात आहे. सौर उर्जा ही मोफत आहे असा एक समज आहे. पण त्यासाठी लागणारे फोटो डिओड, ही उर्जा साठवून ठेवण्यासाठी लागणार्या बॅटर्या आणि त्यासाठी लागणारी खनिजं यांचे साठे मर्यादीत आहेत. हे साठे संपले कि सौर उर्जा इलेक्ट्रिसिटी मधे कन्व्हर्ट करण्यासाठी अन्य शोध लागतील. पण पुन्हा त्यासाठी मुलभूत खनिजांचा वापर अनिवार्य होणार. हे चक्र आहे. त्यासाठी मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक हे सूत्र आहे. मनाचा ब्रेक लावता यावा यासाठी विज्ञान - तंत्रज्ञान या बरोबर तत्त्वज्ञानाचा अभ्यासही अनिवार्य करावा लागणार आहे.
रूपाली विशे पाटील - शतशः आभार प्रतिसादासाठी.
अमितव, बरोबर. खूपच बोलके चित्र आहे. प्रतिसादाबद्दल बोलेन. अजून वेगवेगळी मतं येताहेत का हे पाहून या पोस्टवर बोलूयात.
झाडे लावा याच्याशी १००% सहमत
झाडे लावा याच्याशी १००% सहमत आहे, इतर लेखाशी सहमत नसलो तरीही.
+१
अमितव, यांचा प्रतिसाद लेख
अमितव, यांचा प्रतिसाद लेख समजून उमजून दिलेला असल्याने आनंद वाटला. त्यांचा व्यवहार्य दृष्टीकोण नाकारणे शक्य नाही.
मात्र लेखाचा सूर हाच आहे कि या लालसेवर मात करण्यासाठी कोणतेच तंत्रज्ञान कामी येत नाही. त्यासाठी तत्वज्ञानाची बैठक आवश्यक आहे.
विज्ञान तंत्रज्ञान हे माहिती असायलाच हवे, पण त्याचा चंगळवादासाठी होणारा अविष्कार गरज आहे का याची जाणिव कुठल्याही तत्त्वज्ञानातून व्हावी. कुणासाठी तो नास्तिकवाद असेल, चार्वाकवाद असेल, कुणासाठी अध्यात्म असेल, कुणासाठी सदसदविवेकबुद्धी असेल, मार्क्सवाद असेल.
कोणत्याही तंत्रज्ञानासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर अनिवार्य आहे. जलविद्युतसाठी पाणी, अपारंपारिक उर्जेसाठी बॅटरी इत्यादी. हे नैसर्गिक स्त्रोत संपल्यावर विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे पण त्याचा वापर करता येत नाही अशी अवस्था होणार आहे.
पिरॅमिडसच्या संदर्भात एक शोध
पिरॅमिडसच्या संदर्भात एक शोध नुकताच लागला आहे. अनेक वर्षे पिरॅमिडसाठी लागणारे अजस्त्र दगड कुठून आणले , कसे आणले हे गूढ होते. आजूबाजूला कुठेही हे दगड नाहीत. आताच्या शोधानुसार नाईल नदीची उपनदी या भागातून वाहत होती. या जलमार्गाने दगडांची वाहतूक झाली असे समोर आले आहे.
याबाबतीत नॅशनल जिओग्राफिकने २००० सालच्या आसपास एक व्हिडीओ समोर आणला होता. त्यात पिरॅमिडचे बांधकाम कसे झाले हे दाखवले होते. इथे मोठमोठी शहरे होती. साम्राज्य होते. हे साम्राज्य नाहीसे का झाले, वाळवंटात रूपांतर का झाले या प्रश्नाचे उत्तर अन्य एका पुस्तकात दिले होते. त्यातल्या दाव्यानुसार इथे कदाचित अफीम किंवा तत्सम शेती होत गेली ज्यातून या साम्राज्याला अर्थपुरवठा झाला. त्याचा function at() { [native code] }इरेक झाल्याने माती नापीक झाली आणि वाळवंटात रूपांतर झाले. या दाव्यात तथ्य किती आहे हे अधिक संशोधनाने समजेल.
कोल्हापूर आणि अन्य काही ठिकाणी ऊसाची लागवड सातत्याने केल्याने, खतांचा वापर केल्याने क्षारपड होत जमीन नापीक होत चालली आहे. ऊस लावताना अधून मधून वेगळे पीक घेण्याइfunction at() { [native code] }का संयम नसेल तर असे होते. अशा खारपड (क्षारपड) होऊन पांढर्या पडलेल्या जमिनी पाहिल्या आहेत. त्या पुन्हा उपजाऊ होत नाहीत. महाराष्ट्र वाळवंटाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पाण्याचा function at() { [native code] }इरेकी वापर, नैसर्गिक स्त्रोतांची हानी यामुळे हा भूभाग मानवी वस्तीसाठी काही वर्षांनी निकामी होण्याचा धोका आहे.
विज्ञानाचा वापर करून चक्र
विज्ञानाचा वापर करून चक्र उलटे फिरवता येईल. त्यासाठी विध्वंस होईपर्यंत थांबावे का ?
सहारा वाळवंटाचा विस्तार होऊ नये म्हणून ग्रेट ग्रीन वॉल बनवली जात आहे.
https://www.youtube.com/watch?v=bHE2AowASDo
या कामी संयुक्त राष्ट्रांच्या समितीच्या पुढाकाराने इथे काम चालू आहे. साडेसात हजार अर्धचंद्राच्या आकाराचे खड्डे एका दिशेने घेतले जातात. या खड्ड्यांना बांध घातला जातो. पावसाळ्यात या अर्धचंद्राच्या आकाराच्या खड्ड्यात पाणी साचते. त्यात शेती केली जाते ज्यामुळे या भागातल्या अन्नाचा प्रश्न मार्गी लागण्याचा रस्ता सापडला आहे. याच पद्धतीने सहारा वाळवंटाचा विस्तार रोखण्यासाठी वृक्षांची यशस्वी लागवड केली जात आहे. हा प्रयोग मोठ्या स्केलवर केला जाणार आहे.
या बाबतीतल्या लिंका
या बाबतीतल्या लिंका संध्याकाळी शोधून इथे देईन.
उपाशी बोका यांचे प्रतिसाद सुरूवातीला वेगळे मत म्हणून स्विकारले होते. पण ते ट्रोलिंग कडे झुकले. ज्यात या धाग्याच्या विषयाचा काहीही संबंध नाही. तसेच एअर कंडीशनिंग आणि उपाशी बोका यांनी दिलेल्या लिंकांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. त्याला उत्तर द्यावे असे वाटले नाही. मात्र स्ट्रॉ मॅन ऑर्गुमेण्ट न्यायाने भरकटू नये म्हणून दखल घेतली.
अजिबात थांबू नये. लालसा आणि
अजिबात थांबू नये. लालसा आणि गरज यातील फरक ओळखून गरजा कमीत कमी ठेवाव्या याच वैयक्तिक मताचा मी आहे. आणि ते अमलात आणायचा सदैव प्रयत्न असतो.. पण आजूबाजूला बघितलं तर परिस्थिती विपरीत दिसते. अनेक कारणांनी कोणाला सांगायला जाऊ नये असं मत झालं आहे. तरी अपव्यय बघितला की त्रास होतोच.
म्हणूनच म्हटलं लेख आवडला, पण यावर आता काही इलाज शिल्लक आहे असं वाटत नाही. उद्वेगाने लिहितोय अर्थात.
जे होईल ते पहावे, माणूस हुशार आहे, शोधेल काहीतरी.
हो अमितव. तुमचा प्रतिसाद
हो अमितव. तुमचा प्रतिसाद समजला होता.
विचार करायला लावणारा लेख.
विचार करायला लावणारा लेख.
याबाबतीत आलेला एक ताजा अनुभव. सध्या भयंकर उकाडा जाणवत आहे यावर नातलगांत चर्चा सुरू होती. "एसी लावता का मग?" - इति एकाने मला केलेला प्रश्न.
"रोज नाही लावत एसी.." - मी.
"लाईट बिल जास्त येईल म्हणून का?" - माझ्या स्वभावाचा अंदाज असल्याने अर्थातच हा प्रश्न आला.
"ते तर आहेच. पण 'सवय' लागू नये म्हणूनही रोज एसी वापरत नाही." - मी
तर यावरून जी प्रतिक्रिया आली, ती ऐकून आधी जरा गप्प बसले मी. ते म्हणाले," मग पंख्याची सवय झाली आहे तर ते कसं चालतं? "
मग अमितव यांनी लिहिलेले आहे त्या आशयाचं उत्तर मी दिलं. पण नंतर मनात विचार आलाच - माझ्या आईच्या तोंडून ऐकलेलं की गिरगावात त्यांच्या घरात पंखाच नव्हता. तशी गरजही वाटली नाही. बहुतेक आजूबाजूच्या सगळ्या घरी तसंच होतं..
पण आता अर्थात पंख्याच्या पंखाखाली असणं अपरिहार्य झालंय.. असं बऱ्याच बाबतीत पूर्वी च्या गरजा आणि आताच्या 'गरजा' हा फरक जाणवतोच ना..याची कारणंही विविध प्रकारची आहेत.
बदल अवघड आहे खरा, पण अशक्य नसावा. निदान काही बाबतीत तरी.
लेख वाचला, तळमळ पोचली. काही
लेख वाचला, तळमळ पोचली. काही goals unrealistic वाटले.
-------
पाचसहा वर्षांपूर्वी ह्यूस्टनच्या म्यूझियममधे लोकांनी कचऱ्यात टाकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या मी कचऱ्यात हात घालून रिसायकल केल्या होत्या. माझी निसर्गाच्या ऱ्हासाबाबतची मतं फार naive/ एकांगी होती, आता किंवा पॅन्डेमिकपश्चात मला काही मतच राहिले नाही. पॅन्डेमिकने मला आतून साफ बदललं आहे. आता मी हेच थंडपणे बघू शकते. जेव्हा बघावं तेव्हा फारच निराशाजनक वाचण्यात येतं आणि वैयक्तिक पातळीवर (जे करत आहोत त्यापेक्षा वेगळी - नवीन) कृती काय करावी हेही स्पष्ट नसतं. इतरांवर नियंत्रण घालणं अशक्य आहे.
वीस मिलियन वर्षं सुखनैव राहिलेल्या डायनासोरचा विध्वंस झाला आपण 'किस झाड की पत्ती' हे पण मनात येतं. Adapt to survive मंत्रानुसार वातावरणाशी जुळवून घेत रहाणं किंवा सहन करत रहाणं एवढंच आपल्या हातात...!
--------
अवेअरनेस म्हणून असे लेख अधुनमधून वाचायला हवेत हेही वाटतं. इथे नेटिव्ह इंडियन्स मधे एक म्हण आहे. मला त्यांची प्राचीन संस्कृती आणि विचार फार आवडतात.
वाचत राहीन एवढं सांगण्यासाठी ही पोस्ट.
"We do not inherit the Earth from our ancestors, we borrow it from our children” is an ancient Native American proverb that emphasizes the importance of preserving the planet for future generations.
जिज्ञासानी इथं लिहिलं तर आवडेल.
प्रतिसाद आवडला.
प्रतिसाद आवडला.
मानवाने विज्ञानाचा वापर विचार पूर्वक करावा. विज्ञान तत्वज्ञान वगैरे विषयावर टनाने लिहिले गेले आहे. आणि नैसर्गिक साधने जपून वापरा इत्यादी. पण त्याने काय होणार आहे? तीही कधीना कधी संपणार आहेतच. मग काय होईल? विज्ञानच कदाचित आपल्याला तारून नेईल. वैद्न्यानिक ह्यावर कायम विचार करत आहेत.
आणि हे सर्व व्हायच्या आधीच कदाचित आपण नष्ट होऊ. पृथ्वीचा विनाश होण्या साठी केवळ एक लघु ग्रह पुरेसा आहे. तेव्हा उद्याची चिंता करण्या ऐवजी आजचा दिवस मस्त एन्जोय करा.
अस्मिता, रेड इंडीयन्सच्या
अस्मिता, रेड इंडीयन्सच्या संस्कृती मधले हे वाक्य खूपच बोलके आणि एखाद्या म्हणीप्रमाणे थोडक्यात गहन आशय सांगते.
महामारीमुळे वैचारीक बैठक बदलते हे कबूल आहे. आरिअलिस्टिक गोल्स कोणते हे समजले तर फेरविचार करता येईल
पृथ्वीवर लघुग्रह आदळून जीवन नष्ट होणार आहे म्हणून काहीही विचार करू नये हे काही पटण्यासारखे नाही. तसेच विवेकाने जगणे, लाईफस्टाईल विवेकवादी बनवणे म्हणजे आनंदाने जगणे नव्हे हे ही. आनंदाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. जगातले सर्वात आनंदी राष्ट्र भूतान आहे. तेच राष्ट्र गरीबीच्या इंडेक्स मधे सर्वात वर आहे आणि विकासाच्या इंडेक्स मधे खाली.
एखाद्याचा आनंद पब मधे दारू पिणे आणि २०० च्या स्पीडने कारने लोकांना ठोकणे हा ही असू शकतो. समाजाचे नियम पाळले तर सहजीवन शक्य आहे. सर्वांच्या आनंदाचा विचार त्यात करता येत नाही किंवा आपल्या हातात नसलेल्या कारणांमुळे जीवन नष्ट होणारच आहे तर काढा बंदूका आणि माणसं मारायचा आनंद घ्या असेही करू देता येत नाही. हे थोडे टोकाचे आहे, पण नाईलाज आहे.
काही काही बाबतीत तुमच्या वेगळ्या मताशी सहमत आहे असे म्हणण्यासारखी स्थिती नसते. जर पटवून दिले तर मात्र स्विकारता येते.
तर कोणतेही शोध लागले तर
तर कोणतेही शोध लागले तर त्याच्या वापराआधी जो विरोध होतो त्याचे समाधान झाले पाहीजे. त्या उलट काही हुषार वादविवादपटूंची नेमणूक केली जाते. ते अशा आक्षेपांची नोंद घेतात. मग या आक्षेपांना गप्प करणारी उत्तरे तयार केली जातात. हे टूलकीट त्या त्या वापरकर्त्याच्या एजन्सीला दिले जाते. त्यांना प्रशिक्षण दिले जाते. अशा सेवा घेणार्या कंपन्या एकत्रित रित्याही नरेटिव्ह सेट करायच्या मागे लागतात. आता तर व्यापारी संघटना आहेत, उत्पादक संघटना आहेत. नव्या उत्पादनाच्या भावी आक्षेपांना मोडीत काढणार्या पीआर एजन्सीजचे हे सुगीचे दिवस>>>>
मला वैज्ञानिक क्षेत्राची फारशी माहिती नाही पण जे वाचलेय त्यावरुन माझे हे मत झालेय की जुन्या काळी वैज्ञानिक शोध व त्याचे दैनंदिन जीवनातील उपयोग याचा शोध लावणारे लोक वेगवेगळे होते.
युद्धात भारी पडणार्या शत्रुला नमवण्यासाठी आण्विक शक्तीचा शोध लागला नाही. तो शोध लागताना त्याचे किती उपयोग व दुरुपयोग होऊ शकतील हे शोधकर्त्याच्या डोक्यात नसेलही. त्याला अणु रचनेसण्दर्भात काहीतरी लिड मिळाला, तो लिड पुढे नेत गेला आणि अणुच्या पोटातील ताकद त्याच्या लक्षात आली.
आता असे संशोधन किती होते माहित नाही. आताचे संशोधन उद्देश्य समोर ठेऊन होते असे समजण्यास वाव आहे. हे उद्देश्य समोर ठेऊन केलेल्या संशोधनास अर्थात तसेच आर्थिक बळही मिळते आणि हे आर्र्थिक बळ देणारे स्वहिताचे रक्षण करणारच. त्यासाठी नॅरेटिव सेट होणारच. हे स्वहित व शोध आधीच ठरलेले असल्यामुळे शोधाचे दुरगामी परिणाम बासनात गुंडाळले जाणार हे ओघाने आलेच.
(अणूर्जेचा शोध हे उदाहरण म्हणुन वाचावे. अणु उर्जेचा शोध असाच लागला असे मी म्हणत नाही)
एखाद्याचा आनंद पब मधे दारू
एखाद्याचा आनंद पब मधे दारू पिणे आणि २०० च्या स्पीडने कारने लोकांना ठोकणे हा ही असू शकतो. समाजाचे नियम पाळले तर सहजीवन शक्य आहे. सर्वांच्या आनंदाचा विचार त्यात करता येत नाही किंवा आपल्या हातात नसलेल्या कारणांमुळे जीवन नष्ट होणारच आहे तर काढा बंदूका आणि माणसं मारायचा आनंद घ्या असेही करू देता येत नाही. हे थोडे टोकाचे आहे, पण नाईलाज आहे. >>> हे कोण बोलले बोला ,,,
मी बोललो? शक्य आहे.
मला लेख अगदी 100% पटतो.पण
मला लेख अगदी 100% पटतो.पण यावर मानवाची हे सर्व करण्या साठीची इच्छाशक्ती आणि नैतिक मूल्ये वाढावी हा एकच उपाय आहे.कायदे चांगले बनावे,योग्य प्रोसेसिंग प्लांट जास्त प्रमाणात बनावे,पर्यावरणपूरक पर्याय योग्य खर्चात उपलब्ध व्हावेत.मॉल चं लायटिंग, झगमगाट सोलर पॉवर वर व्हावा.आणि पर्यावरणपूरक होण्याची किंमत पर्यावरण विरोधी असण्याच्या 2 पट पेक्षा जास्त असू नये(नॉर्मल शूज 300 रु आणि अप सायकल ट्रक टायर शूज 2200 रु, नॉर्मल अल्युमि7 फॉईल प्लेट 2 रु प्रति नग आणि प्रेस्ड उसाचे चिपाड प्लेट त्या साईझ ची 16 रु प्रति नग).
सरकारी इच्छा शक्ती(सर्वच देशात) वाढवणं जास्त गरजेचं आहे.(प्रतिसाद जास्त असंबद्ध वाटला तर सोडून द्या.विषय जिव्हाळ्याचा असल्याने मत लिखना तो बनता है.)
माझेही मत अस्मितासारखेच झालेय
माझेही मत अस्मितासारखेच झालेय. जो विध्वन्स झालाय तो पुसला जाणे अशक्य असे वाटुन खुप निराशा दाटुन येते. येणार्या पिढीला याची जाणिव झाली तरच आशा आहे.
लेख पटला व आवडला...
लेख पटला व आवडला...
आपल्या हातात आहे ते निक्षून करते..
शास्त्रज्ञ ह्या बद्दल काय करत
शास्त्रज्ञ ह्या बद्दल काय करत आहेत हे जाणून घ्यायची इच्छा असेल तर हा लेख वाचणे मस्ट.
https://futurism.com/the-kardashev-scale-type-i-ii-iii-iv-v-civilization
चर्चा वाचून डायसनचा गोळा
चर्चा वाचून डायसनचा गोळा आठवला उगाच.
जेव्हा सगळे उर्जा स्रोत संपुष्टात येतील तेव्हा आपण नामशेष होउ, त्या आधी उर्जेचा काहीतरी शोध लागेलच हा फक्त एका दिशेने विचार झाला.
उर्जा स्रोत तेवढे कमी पडण्याच्या आतही आपण नामशेष होऊ शकतो का सध्या ज्या दिशेने जात आहोत तसेच जात राहिलो तर? याचं उत्तर अर्थात ठामपणे कोणी हो किंवा नाही असे देउ शकत नाही पण ती संभाव्यता धुडकावुन लावण्या इतकी/ गांभिर्याने न घेण्या इतकी कमी आहे का?
होय मानव मला पण.
मानव सर
जैसे जिसकी सोच !
तुमची वरची पोस्ट आणि माझी
तुमची वरची पोस्ट आणि माझी एडिट करण्या आधीची पोस्ट क्रॉस पोस्ट झाली. त्यानंतर मी पुढील विचार लिहिण्यास एडिट केली. Dyson sphere चा उल्लेख तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये ही आहे, ती लिंक आता बघितली.
जैसे जीसकी सोच पेक्षा काय चुकते आहे अथवा पटत नाही हे दाखवून दिले तर अधिक चांगले वाटेल.
हे पहा माझा विद्न्यानावर
हे पहा माझा विद्न्यानावर पूर्ण विश्वास आहे. हाच मुलभूत फरक आहे. अर्थात मी मानतो कि आपण साधन संपत्ती विचारपूर्वक वापरली तर कदाचीत वैद्न्यानिकांना जास्त वेळ मिळेल.
अर्थात माणूस नष्ट होण्याची अनेक कारणे होतील. त्या साठी निराळा धागा पाहिजे.
आणि पूर्ण विनाश झाला तरी जीवन पुन्हा फुलणार आहेच. पहा Wall-E सिनेमा. ह्या सिनेमात सगळे काही आहे.
<< पण यातुन काही कृती घडून,
<< पण यातुन काही कृती घडून, मोठ्याप्रमाणावर सदसदविवेक जागृत होऊन चक्रे उलट फिरण्यावर विश्वास नाही. कालची लालसा, आजची गरज आणि उद्याचा हक्क बनतो. विनाश होईल तरी हे चक्र उलटे फिरणे शक्य नाही.
यातुन बाहेर पडायला आणखी नवं विज्ञान/ तंत्रज्ञानच मदत करू शकेल.
किमान गरजा या बदलत असतात. आजी-आजोबांच्या किमान गरजा, आई - वडिलांच्या नाहीत, आपल्या नाहीत आणि आपल्या गरजा आपल्या मुलांच्या नाहीत. आनंदी रहाणे असं सहज बदलता येत नाही, जग बदलतंय तसं एकतर तुम्ही प्रवाहपतित व्हायचं, कितपत व्हायचं, कसं व्हायचं... परत यात आनंदी राहुनच सगळं केलं तर काही अर्थ. मारुन मुटकुन काही करणे शाश्वत कसं असेल? थोडक्यात बदल घडणे सोपं वाटत नाही. >>
------- प्रतिसाद आवडला आणि सहमत.
आपण आपल्यापुरते जेव्हढे सहज करता येतील तेव्हढे बदल जरुर करावेत ( म्हणजे गरजा कमी कराव्यात ).
ओके, धन्यवाद तुम्हाला काय
ओके, धन्यवाद तुम्हाला काय म्हणायचे ते आलं लक्षात.
मानव नामशेष होण्यास अनेक कारणे असतील, जसे आधी उल्लेख आलेला आहे एखादा ग्रह आदळेल, एखादी अगदीच भयंकर साथ येईल इत्यादि किंबहुना अशी जरी कल्पना केली की संशोधना दरम्यान अपघात होऊन रेडिएशन्समुळे जीव नष्ट झाले तरी तो या धाग्याचा विषय नाही (असे मी तरी समजतो.) कारण तो एक अपघात असेल.
तर आपण ज्या दिशेने सध्या जात आहोत, ज्याला विकास मानत आहोत आणि अजुन त्याच दिशेने विकास करण्याची चढाओढ करत आहोत या दरम्यान होणाऱ्या सगळ्या गोष्टी प्रदूषण, केमिकल्सचा शरीरांवर होणारा मारा, ग्लोबल वार्मींग, जीवनशैली, बिघणारे हार्मोन्सचे संतुलन, मानसिक स्वास्थ्य इत्यादि साखळी आहे (यातील पूर्ण साखळीचा विचार करावा, एखादी कडी चुकीची लिहिली गेली असेल तर) यातूनच आपण नामशेष होण्याच्या संभाव्यतेबद्दल मी बोलत आहे.
तेव्हा इथे विज्ञानावरील विश्वास/अविश्वास, विज्ञानाला विरोध याचा काही संबंधच नाही.
कुणाला आपल्या अभ्यासानुसार, व्यासंगानुसार, बुद्धिमत्तेनुसार यातील मुद्दे खरंच एवढी काळजी करण्या सारखे नाहीत हे माहिती असेल किंवा जे काही काळजीचे आहेत त्यावर ठोसपणे नक्की संशोधन होत असून संशोधकांनी काळजी नसल्याचा निर्वाळा दिला आहे याची माहिती असेल त्यांनी विज्ञानावर पूर्ण विश्वास आहे म्हणण्यात काहीच गैर नाही.
माझ्या माहिती, बुद्धीच्या कुवतीनुसार मी तसे म्हटले तर योग्य ठरणार नाही कारण ते माझी विज्ञानावर पूर्ण श्रद्धा आहे असे म्हटल्यासारखे होईल.
आणि पूर्ण विनाश झाला तरी जीवन पुन्हा फुलणार>> सहमत.
राईट आणि प्रीव्हिलेज यातला
राईट आणि प्रीव्हिलेज यातला फरक समजून घेणे महत्वाचे आहे.
मानव, निपा >> +१
मानव, निपा >> +१
वैज्ञानिक टनाने लेख लिहितात त्याचा उद्देश जागृती असेल तर वैज्ञानिक कम्युनिटीच्या प्रतिनिधींनी त्याचा सामान्य, अतिसामान्य, अज्ञानी लोकांच्या जागृतीसाठी प्रचार प्रसार करणे हे त्या लेखकांच्या उद्देशाला पुढे नेणे असेल ना? या धाग्यावर विद्वानांनी अशा लेखांची ओळख करून दिली तरी उद्देश सफल झाला असे वाटेल.
लेख आणि प्रतिसाद दोन्ही छान
लेख आणि प्रतिसाद दोन्ही छान आहेत . आपले प्रयत्न फारच तुटपुंजे आहेत हे समजल्यामुळे टोकाचा निगेटिव्ह विचार येतो कधीकधी की मानवजात स्वतःचा विनाश ओढवून घेईल आणि मग पृथ्वीवर बाकीचे जीव सुखाने नांदतील .
दुसरा विचार असा की एक दोन शतकानंतर पृथ्वीची झालेली परिस्थिती बघून त्यावेळच्या पिढीला शहाणपण सुचेल आणि युद्धपातळीवर निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न केले जातील , जे जे शहाणपण आज मोजक्याच लोकांना पटतं आहे ते त्यावेळी पूर्ण लोकसंख्या मनापासून पाळेल , कंपन्या - फॅक्टऱ्या लोकमताच्या , राजकिय दडपणाच्या खाली असतील आणि कोणतीही निसर्ग विघातक कृती करायला धजावणार नाहीत , किंबहुना ते चालवणारे लोकही शहाणपण आलेल्याच नव्या पिढीतील असल्यामुळे क्षुद्र आर्थिक स्वार्थासाठी निसर्गाचा विध्वंस करावा असं त्यांना वाटणार नाही .
एक दोन पिढ्यांनंतर कदाचित मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल प्रचलित होईल .. खंडीभर वस्तू , ब्रँडेड महाग वस्तू घेऊनही असमाधानी आहोत हे लक्षात येऊन नवीन पिढी साध्या आयुष्याकडे वळून समाधानाचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल .
Pages