भारताच्या रेल्वे इतिहासातील सर्वात दुर्दैवी व भीषण अपघात

Submitted by ढंपस टंपू on 3 June, 2023 - 23:49

भारताच्या रेल्वे इतिहासात आजवर अनेक अपघात झाले. पण परवा बालासोर इथे झालेला दुर्दैवी अपघात हा समोरासमोर तीन रेल्वेगाड्यांची टक्कर झाल्याने भारताच्या रेल्वे इतिहासातला अत्यंत भीषण अपघात म्हणावा लागेल. या आधी ६ जानेवारी १९८१ रोजी बिहार मधे बागमती नदीत रेल्वेगाडी घसरून ७०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हा आजवरचा सर्वात भीषण अपघात समजला जातो.

बालासोरच्या दुर्दैवी घटनेत आता पर्यंत २९४ मृत तर ११०० प्रवासी जखमी आहेत. जस जसे मदत कार्य पुढे जाईल तसतसा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पण ज्या पद्धतीने तीन ट्रेन्स एकमेकांना धडकल्या ते पाहता यात मानवी चूक आहे का असा प्रश्न पडतो. आतापर्यंत २९५ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नदीत पडल्याने मृतांचा आकडा जास्त असणार हे उघड आहे. ती घटनाही लाजिरवाणीच आहे. पण तीन गाड्या एकमेकांवर कशा काय धडकू शकतात ? यात मानवी चूक आहे का ?

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी आता कवच तंत्रज्ञानामुळे रेल्वे अपघात विसरून जा असे त्यांच्या एका प्रेझेंटेशन मधे सांगितले होते. तरी हा अपघात कसा काय झाला ?

जगभरात भारताच्या रेल्वेगाड्या, इंजिन्स निर्यात करण्याची घोषणा केली होती. या अपघातामुळे आयात करणार्‍या देशांवर परिणाम होईल का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवाचा अपघात सदोष सिग्नल यंत्रणेमूळे झाला , पण
हलदानी रेल्वे च्या खाली गॅस सिलेंडर फेकला गेला तर त्याच्या चिंधड्या उडाल्या .
असल्या समस्यांना काय करणार ?

<<नवी पुडी - त्या स्टेशनचा स्टेशन मास्टर मुस्लिम आहे आणि आता गायब आहे>>
ती खरं तर आता जुनी झाली आहे.
त्यानंतर तो मोहंती आहे दोषी नाही पण घाबरून पळाला होता ही पुडी काही काळ चालली.

ही कालची इंडिया टुडेची बातमी:
https://www.indiatoday.in/fact-check/story/odisha-train-accident-bahanag...

२)आणि @हस्तरनी काढलेला धागा
मला ' हे पान पाहायची परवानगी नाही '
>>>>>>>>>>>>
तो ग्रुप शोधून सबस्क्राईब करा !
Screenshot_20230607_063522_Chrome.jpg

जमलं.
पण 'शिवसेनेचं सूचक मौन' धाग्यावर जामर लावला आहे. प्रतिसाद बंद. ओके.

प्रचंड दबाव.
किंवा चर्चा स्फोटक होण्याची शक्यता..
ही दोन कारणे असावीत

सगळेच अडाणी कसे ?
तो ग्रुप सबस्क्राइब करा ना !
मला तर सगळे धागे चालू दिसत आहेत , फक्त ग्रूप मधील मेंबर पुरते मर्यादित केले असावेत.

प्रश्न अडाणी पानाचा नाही. इतके दिवस हे धागे सगळ्यांसाठी उघडे होते. ते अचानक ग्रुप मेंबर साठी कसे झाले?
धागे अश्याप्रकारे "साफ्ट उडवणे" झाले.

जोवर चर्चा 'नीट' चाललेली असते, तोवर धागे ओपन असतात. मग चर्चेचा दर्जा घसरला की धागा ग्रुप पुरता मर्यादित करणे, त्याला कुलूप घालणे असे उपाय अ‍ॅडमिन करतात. दर्जा घसरवणार्‍या आयडींना उडवून काही उपयोग नसतो कारण ते पुन्हा पुन्हा अवतार घेतच राहतात.

आम्हाला तर ce / pe वर ध्यान ठेवून भाजपची बाजू मांडायची असते तेही बिनपगारी !
लै जोखमीचे काम बाबा Happy

लूप लाईनवर अगोदरच मालगाडी होती, त्या गाडीवर १००- १३० किमी/ तासाने प्रवासी गाडी आदळली. या फॅक्टस आहेत.

लूप लाईनवर एक गाडी असतांना, दुसरी गाडी वेगाने यायलाच नको, आणि ११० किमी च्या वेगाने तर नाहीच नाही. प्रवासी गाडी आली कशी? सरळ जाण्यासाठी सिग्नल हिरवा होता पण सांधा बदललेला नव्हता असा एक अंदाज आहे..

सांधा का बदलला गेला नाही किंवा तिथे लाल सिग्नल का नव्हता हे शोधण्यासाठी आवश्यक असणारे तज्ञ रेल्वे बोर्डाकडे असतांना CBI कशासाठी? या आधी किती रेल्वे अपघाता मधे CBI मार्फत चौकशी झालेली आहे? कुठलाही प्रश्नाचे उत्तर द्यायचे नसेल, जबाबदारी टाळायची असेल, मुख्य म्हणजे दिरंगाई करायची असेल तर तपास CBI कडे सोपवायचा असा प्रकार आहे का?

मालगाडी बाजूच्या साइडलाईनला ठेवलेली होती हा माझा तर्क. या दोन एक्स्प्रेस गाड्या गेल्यावर ती मेन लाईनवर येणार होती. परंतू मालगाडी बाजूला काढलेला सांधा तसाच राहावा म्हणून कुणी घातपात केला असेल. किंवा इलेक्ट्रॉनिक कनेक्शन तसेच राहावे म्हणूनही काही युक्ती केली गेली असेल.
___________
((कोणत्यातरी जाकी चानच्या सिनेमात गुंड टोळके जाकीच्याच शरीरावर धोकादायक उपकरण अडकवून पैशाची बॅग घेऊन यायला पाठवतात. रिमोट टोळक्याकडे असतो. त्याचे कनेक्शन कुणी काढले तर ट्रिगर चालू होतो. पण हा पठ्ठ्या त्याला टेलीफोनच्या वायरने बायपास करून ते काढून टाकतो. ))

सर्व मनाचे खेल आहेत.
घातपात ही शक्यताच झीरो आहे
तंत्र ज्ञान कुशल कर्मचारी ह्यांचं अभाव.
आधुनिक तंत्र ज्ञान कुशल असणारे कर्मचारी च नाहीत.
दुरुस्ती आणि त्या यंत्रणेची काळजी घेण्यास लायक स्टाफ च नाही.
जबाबदार अधिकारी नाही.
कर्मचारी फक्त पगार घेण्या पुरतेच
ह्याचा एकत्रित परिणाम म्हणजे अपघात.
घातपात आडून ह्या सर्व त्रुटी झाकण्याचा प्रयत्न होत आहे.
ट्रेन ला २४ डब्बे असतात .
एका डब्यात ३०० प्रवासी पकडले तरी ...7200 प्रवासी गाडीत असेल पाहिजेत .हा पण आकडा जास्त असेल तर 4000 नक्कीच असतील.
घातपात करणारा उलट्या काळजाचा असेल ..
तो 250 ते 300 लोकांचा जीव घेईल की 4000 मधील कमीत कमी 1000 ते 1500,लोकांचा जीव घेईल

ट्रेन ला २४ डब्बे असतात .
एका डब्यात ३०० प्रवासी पकडले तरी ...7200 प्रवासी गाडीत असेल पाहिजेत .हा पण आकडा जास्त असेल तर 4000 नक्कीच असतील. >>> लोकल ट्रेन नाही तर प्रवासी ट्रेन आहे, एका डब्यात ७२ जागा असतात, ३०० चा आकडा कुठून काढला?

ही बातमी एका वर्षापूर्वीची आहे. तुम्ही ती अशा प्रकारे लिहिली कि लोकांच्या् मनात संभ्रम निर्माण होईल. म्हणून मला वाटत कि नाव सांगणे उचित होते.
पोलिसांनी ही बातमी प्रसृत करू नका. अशी विनंती केली असताना देखील आपण ही बातमी इथे शेअर केली. का?

हल्डानी केस मधील आरोपीचे नाव सांगण्याची इतकी घाई ?
मग बालासोर अब्दुल नी घडवलं का ?
कुछ तो गड़बड़ है .

>>>> किती फालतूपणा. बालासोर दुर्घटनेत आरोपी आहे असे सुद्धा अजून माहिती नसताना उगाच तोंड का वाजवताय ?
जिथे तिथे, वेळ काळ न बघता घाण अजेंडा पसरवत राहायचा.

घातपात बिलकुल नाही.
रेल्वे मंत्री आणि ते खाते योग्य काम करत नाही.
त्या मुळे च अपघात झालेला आहे

सिझनल गीधाडे ॲक्टिव्ह झाली म्हणायचं .
हल्डवानी मधील आरोपीचे नाव इथे कोणी मागितले होते का?
बातमी जुनी आहे इतकेच सांगितले असते तरी भरपूर होते .
पण आरोपीचे नाव सांगून हिंदू धर्म अधोरेखित करण्याची खवखव मिटल्या शिवाय चैन कशी पडेल ?
दलालांना शेतकरी आंदोलन असू द्या किंवा महिला कुस्तीगीर चे आंदोलन असू द्या नाहीतर बालासोर दुर्घटना .
फक्त गिधाडा प्रमाणे लचके तोडणे माहित .

पोलिसांनी ही बातमी प्रसृत करू नका. अशी विनंती केली असताना देखील आपण ही बातमी इथे शेअर केली. का?
ह्याचे काय उत्तर?

पुरोगामी इथे हिंदू मुस्लिम हा विषय च नाही.
ना बलात्कारी ब्रीज भूषण केस मध्ये हिंदू मुस्लिम हा विषय आहे.
तुमची बुध्दी काम करत नाही की आयटी सेल पगार देणार नाही ह्याची भीती वाटत आहे..
नक्की तुमचा प्रोब्लेम काय आहे.

तुमची बुध्दी काम करत नाही की आयटी सेल पगार देणार नाही ह्याची भीती वाटत आहे..>>>>>>>
हस्तर ,तुमचे सगळे धागे आणि तुमचे प्रतिसाद पाहता तुमची बुध्दी उतुंग भराऱ्या मारतेय याची केंव्हाच खात्री पटली आहे .
तुम्ही नेहमीचे दक्षिण ,उत्तर , पूर्व आणि डायरेक्ट पश्चिम असे एकमेकांस छेद देणारे प्रतिसाद टाकत रहा Happy

Pages