जगाच्या पर्यटक नकाशामध्ये ठळकपणे चमकणारी वेरूळ आणि अजिंठा हि दोन नावे म्हणजे मराठवाड्याच्या केंद्रस्थानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचे कंठमणीच. महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी फिरलो पण विदर्भ आणि मराठवाडा राहिलेला. यावर्षी ऑफिसच्या कामासाठी फेब्रुवारी महिन्यात नागपुरला जाणे झाले आणि ऑगस्ट महिन्यात आलेल्या सलग सुट्ट्यांचा फायदा घेत औरंगाबाद भटकंतीचा बेत ठरवला. नेटवर सर्च करून आणि औरंगाबादच्या मायबोलीकर डॉ.मानसीताई (सरीवा) यांच्याकडुन अधिक माहिती घेऊन (मायबोलीकर मानसीताई यांच्या घरचा पाहुणचार हा वेगळ्या धाग्याचा विषय होऊ शकतो. ) ५ दिवसाचा (पुण्याहुन) बेत आखला गेला. मुंबईहुन मी, संदीप, समीर आणि पुण्याहुन दिपक त्याच्या कारसोबत असे ४ जण फिक्स झालो. प्रवासाचा बेत साधारण असा होता.
मुंबई - वाकड (पुणे) - रांजणगाव महागणपती - अहमदनगर मार्गे - देवगिरी किल्ला, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी, बिबी का मकबरा, पाणचक्की, मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद), जिजाऊ स्मृती (सिंदखेड राजा), लोणार सरोवर (बुलडाणा) - जायकवाडी धरण, संत एकनाथ समाधी मंदिर, संत एकनाथ वाडा, नाग घाट, पैठण - अहमदनगर मार्गे रांजणगाव महागणपती - वाकड (पुणे) - मुंबई.
दिवस पहिला-
सकाळी पाच वाजता वाकड (पुणे) हुन औरंगाबादला निघालो. साधारण १०:३० - ११ वाजता औरंगाबादला पोहचलो.
तासभर आराम करून देवगिरी किल्ला पाहिला.(पूर्ण दिवस)
दिवस दुसरा:-
सकाळी लवकर उठुन घृष्णेश्वर मंदिर, वेरूळची लेणी. संध्याकाळी ५ वाजता बिबी का मकबरा
दिवस तिसरा:
सकाळी लवकर उठुन बीड बायपास मार्गे लोणार सरोवर आणि संध्याकाळी पुन्हा औरंगाबाद परत.
दिवस चौथा :
अजिंठा लेणी (पूर्ण दिवस)
दिवस पाचवा :
औरंगाबाद - पैठण (जायकवाडी धरण, संत एकनाथ समाधी मंदिर, संत एकनाथ वाडा, नाग घाट) मार्गे पुणे व रात्री मुंबई.
प्रवासाचे साधनः- दिपकची कार
राहण्याचे ठिकाणः Tourist Home, औरंगाबाद रेल्वे स्टेशनजवळ, पैठण रोड.
राहण्याच्या खर्च- ७०० रू.प्रत्येक दिवसाचे Twin Sharing Basis, Non AC
औरंगाबादविषयी थोडे:-
औरंगाबाद हि साक्षात इतिहास नगरीच आहे. कोरीव लेण्यांच्या रूपाने ती इसवीसनपूर्वीचा इतिहास सांगते तर नंतरचा मुस्लीम राजवटींचा इतिहास आजही इथल्या ऐतिहासिक वास्तुंच्या रूपाने बोलत असतो. पश्चिम भारतातील चार बलाढ्य राजवंश म्हणजे सातवाहन, राष्ट्रकूट, यादव आणि अगदी शेवटीच्या मुस्लीम शाह्या. त्यांच्या राजधान्या अनुक्रमे पैठण (प्रतिष्ठान), वेरूळ (एलापूर), देवगिरी आणि शेवटी औरंगाबाद ह्या परिसरातच नांदल्या. त्यामुळे इतिहास ह्या नगरीच्या रोमारोमात भिनलेला जाणवतो. पूर्वी औरंगाबाद शहराला ५२ दरवाजे होते असे इतिहास सांगतो. त्यांची आठवण देत आजही दिल्ली गेट, भडकल गेट, पैठण गेट, मकई गेट इ. प्रशस्त प्रवेशद्वारे उभी आहेत.
अजिंठा, वेरूळ लेणी, बिबी का मकबरा, पाणचक्की, देवगिरी किल्ला, पैठण अशा विविध पर्यटन स्थळांनी नटलेल्या व ५२ दरवाजांचे शहर नावाने ओळखल्या जाण्यार्या या ऐतिहासिक नगरीचा हा छोटासा चित्र परिचय.
अजिंठा लेणी
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०३
प्रचि ०४वेरूळ लेणी
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
देवगिरी किल्ला (दौलताबाद)
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७बिबी का मकबरा
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०जायकवाडी धरण, पैठण
प्रचि २१
पाणचक्की
प्रचि २२लोणार सरोवर
खरंतर लोणार सरोवर हे बुलडाण्या जिल्ह्यात येते पण औरंगाबाद भटकंतीत लोणार सरोवर समाविष्ट केल्याने त्याचेही प्रचि औरंगाबाद भटकंतीत देतोय.
प्रचि २३
प्रचि २४औरंगाबादचा मशहुर तारा पानवाला
इतकं सुरेख पान या आधी कुठेच खाल्लं नाही. पान होतं की मलई. तोंडात टाकल्या टाकल्या विरघळलं. अगदी १० रू. पासुन ५००० रू. पर्यंतचे पान उपलब्ध आहे. औरंगाबाद भटकंतीत आवर्जुन भेट देण्याचे एक ठिकाण म्हणजे तारा पानवाला.
प्रचि २५खादाडी
औरंगाबाद परिसरात खादाडीची अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यात आम्ही भोज रेस्टॉरण्ट (अप्रतिम राजस्थानी थाळी), शेगाव कचोरी सेंटर, देवगिरीच्या रस्त्यावरील शेळकेमामा ढाबा (यातील शेवगा हंडी आणि फोडणी दिलेलं पिठलं अप्रतिम), फौजी ढाबा, सिंदखेड राजा गावच्या आधी एक छोटासा ढाबा आहे त्यातील शेव भाजी आणि वांग अप्रतिम. औरंगाबादला आलात आणि भोले शंकर चाटवाला येथे भेट न दिलीत तर तुमची औरंगाबाद भटकंती व्यर्थच. अप्रतिम चवीचं शेवपुरी, रगडा पॅटिस, भेळ इ. पदार्थ येथे मिळतात.
प्रचि २६शेवभाजी
प्रचि २७चला औरंगाबाद भटकंतीला
प्रचि २८
प्रचि २९(क्रमशः)
सुरेख आलेत फोटो. अजिंठ्याचे
सुरेख आलेत फोटो. अजिंठ्याचे आणि कैलास लेण्यांचे फोटो विशेष आवडले.
खादाडी मध्ये गायत्रीची कचोरी आणि उत्तमची इमरती कशी काय राहून गेली? भोजची थाळी खाऊन बरीच वर्षं झालीत. लहानपणी बाहेर जेवायला जायचं म्हणजे क्रांतीचौकात खादाडी किंवा भोजची थाळी यापैकीच एक पर्याय निवडला जायचा.
दरवाजांचे फोटो बघायला आवडले असते. काढलेत का?
जिप्सी, खुप दिवसांनी भटकंतीचा
जिप्सी, खुप दिवसांनी भटकंतीचा धागा आला तुझा.
फोटो तर मस्तच!!
मस्त रे! त्या ५२
मस्त रे!
त्या ५२ दरवाज्यांपैकी काहींचेही फोटो टाक
वाह !! डो ळे निवले माझ्या
वाह !! डो ळे निवले माझ्या गावाची चित्रे बघुन ...सगळ्यात जास्त धरणात पाणी पाहुन.
मस्त फोटोज!
मस्त फोटोज!
अप्रतिम फोटो... आणी सुंदर लेख
अप्रतिम फोटो... आणी सुंदर लेख
मस्तच! अप्रतीम फोटो!
मस्तच! अप्रतीम फोटो!
सुंदर फोटो! एक पेक्षा एक
सुंदर फोटो! एक पेक्षा एक सरस!!
सगळे फोटो सह्ही... माझा
सगळे फोटो सह्ही...
माझा पहिला एन.सी.सी चा कॅम्प हा औरंगाबाद शहराचा होता.खुप खुप आठवणी आहेत इथल्या.देवगिरी चा किल्ला खासच.आता वाटतय खास खादाडीसाठी पुन्हा एकदा जाव.
जिप्सी, मस्त फोटो.
जिप्सी, मस्त फोटो.
सगळेच फोटो मस्त. आणि
सगळेच फोटो मस्त.
आणि सुरुवातीची माहिती पण अगदी उपयुक्त.
प्रचि १९ आणि २३ आवडले.
वा! काय सुरेख प्र.ची आणि
वा! काय सुरेख प्र.ची आणि वर्णन...
औरंगाबाद पुर्वी पाहिलेले.. पण तुझ्या कॉमेर्यातुन बघण्याची मजा काही औरच!!!
पुढच्या भागाची वाट बघतेय!!!
सगळेच फोटो मस्त. आणि
सगळेच फोटो मस्त.
आणि सुरुवातीची माहिती पण अगदी उपयुक्त.>>>>> +१००
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
तसेही बिल दिल्यानंतर कॉम्लिमेंटरी म्हणुन "सईदभाईंनी" दिलेली २ चॉकलेट पानांनी अजुन रंगत आली. >>>>क्या बात है!!
औरंगाबादचे किस्से कैक आहेत. सावकाश लिहीलच. >>>>अपरिचित, नक्की लिहा
@जिप्सी,पुढील खेपेला "सोनेरी महल",पडेगाव येथे असलेले" शिव-पार्वतीचे" पुरातनकालीन मंदिर, विद्यापीठ परिसरातील "गोगा बाबा" ह्यांना सुद्धा पर्यटनातील देण्याजोगे ठिकाणात समाविष्ट करा
म्हैसमाळ कराच. पावसाळ्यात तर एकदम अप्रतिम नजारा असतोय.
.>>>> हो बरीच ठिकाणं या ५ दिवसाच्या भटकंतीमध्ये बघायची राहिली, सो पुन्हा एकदा दौरा नक्कीच.
वरील प्रतिक्रीयांत राहून गेलेल्या गोष्टी,शूलीभंजन,परीयोंका तालाब,पैठणचे 'मऱ्हाठी'पैठणी केंद्र इ.बघण्यासाठी अजून एक दौरा मात्र करावाच लागणार आहे तुम्हाला!>>>>मानसीताई नक्कीच
पैठण ला बाग आहे ती सुस्थितीत आहे का कि फक्त देऊळ च पाहण्याजोगे आहे ?>>>>पैठणची बाग आम्ही गेलो तेंव्हा बंद होती. सकाळी ८ वाजता पोहचलेलो.
दरवाजांचे फोटो नाही काढलेस?
बहुतेक मित्राच्या कॅमेर्यात/मोबाईलमधुन काढला असेल. सापडला तर नक्की इथे डकवतो. 
दरवाजांचे फोटो बघायला आवडले असते. काढलेत का?
त्या ५२ दरवाज्यांपैकी काहींचेही फोटो टाक
>>>>श्यामली, अल्पना, फारएण्ड फक्त दिल्ली गेटचा फोटो काढला पण तो नक्की मोबाईलने काढला कि कॅमेरा/गो प्रो ने काढला तेच आठवत नाही आणि सापडतही नाही.
गायत्री ची कचोरी, उत्तम ची इम्रती अनिवार्य आहे. ते मिस केल्याबद्दल तुला पुन्हा एकदा औरंगाबादची सफर घडो. >>>>>आमेन
औरंगाबाद इतकं सुंदर नाहिच्चे... तु बनवलंस त्याला सुंदर...>>>>दक्षिणा, खरंच सुंदर आहे औरंगाबाद. मी तर औरंगाबादच्या प्रेमात पडलोय, आणि इतके दिवस का नाही इथे आलो असं वाटुन स्वतःला दोष देतोय
मस्त रे...वाईड अँगल भारी आले आहेत>>>>धन्यवाद प्रकाश. गो प्रो वापरला या भटकंतीत.
व्वा जिप्स्या... लय भारी.. तु
व्वा जिप्स्या... लय भारी..
तु नेहमी जळवायची काम करत असतोस..
दिवाळीनंतर ३ दिवस औरंगाबाद
दिवाळीनंतर ३ दिवस औरंगाबाद ट्रीप केली. इथल्या माहितीचा खूप उपयोग झाला. पहिल्या दिवशी पुण्याहून दुपारी २ पर्यंत पोचलो. जिप्सी यांनी सांगितलेल्या tourist home हॉटेलमध्ये राहिलो. पण जेवायची सोय तिथे नव्हती. त्यामुळे पुढचे २ दिवस तिथून जवळच असलेल्या MTDC मध्ये राहिलो. संध्याकाळी पैठण ला गेलो . औरंगाबाद - पैठण रस्ता अतिशय खराब आहे. ४० किलोमीटर जायला आम्हाला दीड तास लागला. पैठण चे ज्ञानेश्वर उद्यान अंधार झाल्याने पाहीले नाही. कारंजे बंद आहे. त्यामुळे पैठण स्किप केले असते तरी चालले असते असे वाटले. या वर्षी जायकवाडी धरण बऱ्यापैकी भरल्याने ते तरी पाहता आले. दुसऱ्या दिवशी वेरूळ , देवगिरीचा किल्ला आणि बीबी का मकबरा पाहिला. वेरूळ ला पार्किंग पासून लेणी पाहायला जायला ST ची सोय आहे. तिसरा दिवस पूर्ण अजिंठा बघण्यात गेला. अजिंठा येथील काहीच लेणी पाहण्याजोगी आहेत . चित्रे बरीचशी पुसट झाली आहेत. लेणी क्र. १,२,९,१०,१६,२६ पाहण्याजोगी आहेत. चालावे बऱ्यापैकी लागते. त्यामुळे अगदी लहान मुले बरोबर असतील तर जाण्यापूर्वी एकदा विचार करावा.
मस्तच रे जिप्सी! आपलेच शहर
मस्तच रे जिप्सी! आपलेच शहर इतकं सुंदर ! मोबाईलहून फोटो उघडायला वेळ लागतो त्यामूळे खूप इच्छा उत्कंठा असूनही धागा उघडला नाही. असो! नेहमीप्रमाणे डोळ्याचे पारणे फिटले. लोणारला तळ्यात उतरला नाहीस का ?
Pages