मान्यवर मायबोली प्रशासक,
सप्रेम नमस्कार,
गेल्या सुमारे चार-साडेचार महिन्यांपासून मी www.maayboli.com या संस्थळावर सदस्य आहे. मायबोलीचे सदस्यत्वं मी एका विशीष्ट हेतूने घेतले होते. वेगवेगळ्या भाषांतील संस्थळांवर विविध क्षेत्रातील लोकांचा असलेला वावर, त्यांची अभिव्यक्ती, संस्थळाच्या माध्यमातून जाणिवपूर्वक आणि अजाणतेपणी पसरवण्यात येत असलेले विचार आणि या सगळ्यात संस्थळाच्या अधिकारीवर्गाची भूमिका त्यांचा तौलानिक अभ्यास करण्याची कामगिरी माझ्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे. टीममधील मराठी सदस्यांपैकी एक म्हणून माझ्यावर एकंदर ३ मराठी संस्थळांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मायबोली हे त्यापैकीच एक संस्थळ.
एक मराठी संस्थळ आणि त्यावर असलेलं साहित्यं आणि माहिती म्हणून मायबोली इतर काही मराठी संस्थळांच्या तुलनेत निश्चितच उजवी आहे यात शंका नाही. अनेक वेगवेगळ्या विषयांवरील विपुल लेखन - कथा, कादंबर्या, चिंतनात्मक लेख, पाककृती, वैद्यकीय, गिर्यारोहण, आरोग्य, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन अशा विविध विषयांवरील प्रचंड माहिती मायबोलीवर आहे. अनेक वेगवेगळ्या विषयावरील कविता, मराठी गझला, विडंबनं यांचीही इथे रेलचेल आहे. अनेक सदस्यांचं सकस लेखन मायबोलीवर आहे. केवळ वाचनमात्रं असलेल्या सदस्यांनाही निखळ वाचनाचा आनंद देऊन जाईल असं भांडार इथे आहे. अनेक मराठी कार्यक्रमांवरचे आणि खासकरुन बथ्थड मालिकांवरचे धागे आणि चित्रपट परिक्षणं ही चार घटका करमणूकही आहे.
मायबोलीवरील माझा सदस्यत्व कालावधी केवळ साडेचार महिन्यांचा. मायबोली हे संस्थळ म्हणून सुमारे पंधरा वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असल्याने आधी घडून गेलेल्या कित्येक घटनांची मला कल्पना असणं शक्यं नव्हतं. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मी अनेक मायबोली सदस्यांशी संपर्क साधला. काही अपवाद वगळता बहुतेकांनी अतिशय आपलेपणाने मदत केली. वसुधैव कुटुंबकम् या उक्तीला जागणारे अनेक मराठी सृजन जगभरात पसरलेले आहेत हे चित्रं खूप आश्वासक आहे.
वरवर पाहता हे चित्रं खूप सुंदर आहे, परंतु....
ग्रूपिझम अर्थात कंपूबाजी हा न टाळता येण्याजोगा आजार मायबोलीला आहेच!
एखाद्या विशिष्ट प्रदेशातील, किंवा शहरातील लोकांचा ग्रूप असणं हे अनपेक्षित नाही, उलट परदेशांत असल्यास अशा ग्रूप्सच्या माध्यमातून आपल्या आसपास असलेले आपल्या मायभूमीतले लोक भेटणं हा अशा ग्रूप्सचा मोठा फायदा असतो. एखाद्या नवीन प्रदेशात आपण जात असल्यास तिथे आधीपासूनच राहत असलेल्या लोकांची ओळख असणं, त्यांच्याकडून माहिती मिळणं हा मोठा आधार असतो. विशेषतः तिथे राहण्याचा कालावधी लांबचा असल्यास ही माहिती फार महत्वाची ठरू शकते. दुर्दैवाने मायबोलीवरच्या ज्या दोन-तीन ग्रूप्समध्ये या माहितीची चौकशी केल्यावर एकच उत्तर मिळालं - गूगल करा! गूगल कोणालाही करता येईल, गूगलवर माहितीही मिळेल, परंतु वर्षानुवर्षे तिथे राहत असलेल्यांचे अनुभव गूगलपेक्षा मोलाचे असणार नाहीत का?
ग्रूपिझमचा दुसरा उबग आणणारा प्रकार म्हणजे अर्थातच राजकारण!
मायबोलीवरील अनेक सदस्यांचं चरण्याचं राखीव कुरण म्हणजे राजकारणाला वाहिलेले धागे, अड्डे, कट्टे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. देशातील काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांना तन-मनाने अर्पण असलेले लोक जो काही धुमाकूळ घालतात ते पाहिल्यावर पुलं च्या पाळीव प्राणी या लेखातील - एकमेकांवर भुंकण्यात म्युन्सिपालटीचे सदस्य कुत्र्यांनाही हार जात नसल्याने कुत्र्यांना आपल्या मर्यादांची जाणिव असेल याबद्दल मला खात्री आहे या वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.
तुम्ही आमच्या पक्षाचे समर्थक नाही ना, मग चालते व्हा पाकिस्तानात ही भाजप समर्थकांची जनरल विचारसरणी काय, किंवा भाजपचे सरकार आल्यापासून सर्वस्व लुटलेल्या सिंध्याप्रमाणे उर बडवत फिरणार्या आणि शेंडा-बुडखा नसलेले आरोप करत सुटणार्या काँग्रेस समर्थकांची विचारसरणी काय, दोन्हीही सारख्याच नाहीत काय? महत्वाचं म्हणजे काँग्रेस किंवा भाजप यांचे समर्थक नसलेलेही इतर लोक अस्तित्वात असू शकतात आणि ते आम आदमी पार्टीछाप पक्षाच्या भजनी मंडळात नसू शकतात हेच मुळात राजकीय धाग्यांवरच्या महाभागांना मान्य नाही तिथे काय बोलणार? कोणतीही चर्चा मग ती राजकीय असो वा नसो कोणत्याही मुद्द्यावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप, मोदी विरुद्ध सोनिया किंवा राहुल गांधी, दीड वर्ष विरुद्ध ६५ वर्षांचा हिशोब यावर आणण्याची आवश्यकता आहे का? राजापेक्षा राजनिष्ठच जास्तं कडवे असतात आणि बाटगा हा सर्वात जास्तं धर्मनिष्ठ असतो या उक्तीचं वरचेवर प्रत्यंतर देणार्या या धाग्यांचा सामान्यं सदस्यांना किती उबग येत असेल याचा हे आक्रस्तळी सदस्य कधीतरी विचार करतात का? मुळात आत्मपरिक्षण नावाचा काही प्रकार असतो हे किती जणांच्या गावी आहे? दुर्दैवाने एकेकाळी चांगलं लेखन करणारे लोकही राजकारणाच्या या विकाराला बळी पडले आहेत. अभिव्यक्तीचा अभिनिवेश न राहता आवेश संचारला की काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणून राजकारणाच्या धाग्यांकडे बोट दाखवता येईल.
राजकीय धाग्यांचा दुसरा प्रकार म्हणजे अत्यंत साळसूदपणे नवनवीन जातीय वाद निर्माण करणे आणि त्याला चलाखीने ब्राम्ह्ण विरुद्ध अब्राम्हण, हिंदू विरुद्ध मुस्लिम, ३ टक्के विरुद्ध इतर, पिढ्यानपिढ्यांचे अत्याचार याचं वळन देऊन त्याबद्द्ल पद्धतशीरपणे बुद्धीभेद पसरवणे. यात तरबेज असलेले अनेक सिद्धहस्त सदस्य मायबोलीवर आहेत. जातीभेदाला विरोध करण्याच्या नावाखाली प्रत्येक प्रतिक्रियेत चलाखीने जातीयवाद पसरवण्याच्या त्यांच्या हातोटीपुढे अनेकांनी हात टेकले आहेत. त्यांच्याच जोडीला देशविघातक अतिरेकी तत्वज्ञानाचं समर्थन करणारे आणि एम आय एम सारख्या पक्षाचे छुपे आणि उघड समर्थकही इथे आहेत. मायबोलीच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे विचार आपण पसरवत आहोत हे यांच्या गावी तरी नाही, किंवा समजून-उमजून हे विचार पसरवणं सुरु आहे. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असलं तरी आमचा हेतू साध्य होतो आहे ना? मग बास!
मायबोलीवरील सर्वात उबग आणणारा आणि संतापजनक प्रकार जर कोणता असेल तर तो म्हणजे इथल्या सदस्यांवर करण्यात येणारे वैयक्तीक हल्ले. एखाद्या सदस्यावर आपल्या जुन्या विरोधकाचा डुप्लिकेट आयडी असल्याचा आरोप करणं हे तर अगदीच क्षुल्लक वाटावं अशी एकापेक्षा एक अश्लाघ्य वक्तंव्य इथे केली जातात. एकमेकांचे संस्कार जाहिररित्या काढले जातात, मनोरुग्ण, विकृत, भिकारचोट (नाईलाजाने लिहावं लागत आहे) असल्या शेलक्या विशेषणांची बरसात असतेच, परंतु सदस्याच्या वैयक्तीक, वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थितीवरुनही अत्यंत अपमानास्पद शब्दांत संबोधनं दिली जातात जी केवळ तिरस्कारणीय आहेत. दोन दिवसांपूर्वीच पाहण्यात आलेला एक प्रकार म्हणजे एका अत्यंत गलिच्छा शिवीशी साधर्म्य दाखवणारं संबोधन पंतप्रधानांसाठी वापरणं आणि ते कसं योग्यं आहे याचं निरर्गल समर्थन करणं! समोरच्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीही माहित नसताना त्याच्याबद्दल काहिही बरळण्याची ही हिणकस मानसिकता कधी सुधारणार आहे का? आपण स्वतः गेंड्याच्या कातडीचे आहोत म्हणून समोरचाही तसाच असेल, आपल्या विकृतीमुळे त्याला त्रासच व्हावा ही इच्छा असल्यामुळे हे लोक सुधारण्यापलीकडे गेलेले आहेत हेच खरं!
या सगळ्या प्रकारात प्रशासक म्हणून आपण काही अंशी तरी अपयशी ठरलेले आहात असं खेदाने नमूद करावसं वाटतं. मायबोलीवर चाललेल्या तमाशांमुळे आज कित्येक जुने सदस्य एकही वाक्यं लिहीण्यास धजावत नाहीत. कारण कोण कसला अश्लाघ्य वैयक्तीक आरोप करेल याची काहिही शाश्वती नाही. असल्या प्रवृत्तींना वेळीच आवर घालण्यात आपल्याला फारसं यश येत नाही हे वेळोवेळी दिसून आलं आहे. प्रशासक मंडळातील काही सदस्यं हे वरकरणी आपण निष्पक्ष असल्याचा आव आणत असले तरी एका विशिष्ट कंपूच्या कारवायांकडे हे लोक डोळेझाक करतात हे लपून राहिलेलं नाही.
मायबोलीच्या एका जुन्या जाणत्य सदस्याशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी व्यक्तं केलेलं मत मायबोलीच्या सद्यस्थितीबाबत भाष्यं करुन जातं. त्या म्हणाल्या, "आजकाल मायबोलीवर असतं काय? तेच ते राजकारणावरचे धागे, तीच कंपूबाजी आणि तमाशे! मायबोलीवर येण्याची आजकाल इच्छा होत नाही! लाज वाटते असल्या लोकांची आणि त्यांच्या विचारांची!"
अद्यापही वेळ गेलेली नाही असं निदान माझं वैयक्तीक मत आहे. प्रत्येकाने - अगदी प्रशासकांपासून सामान्य सदस्यांपर्यंत आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक बाबतीत आपलंच मत शेवटचं हा हेका सोडायला हवा! विघातक प्रवृत्ती सर्वत्र असतात, परंतु त्यांना प्रबळ होऊ द्यायचं का मायबोलीचं सकस साहित्य आणि माहितीचं भांडार म्हणून अस्तित्व टिकवून ठेवायचं हे शेवटी आपल्याच हाती आहे.
मायबोलीवरील अनेक धाग्यांवर असलेल्या माझ्या पोस्ट्स या त्यावर काय प्रतिक्रीया येतात हे आजमावण्यासाठी लिहीलेल्या होत्या. त्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसाच तो या पत्रातही तो नाही. यापुढे कोणत्याही धाग्यावर माझी पोस्ट दिसणार नाही.
आपली नम्र
वैष्णवी धारप
एक सूचना : काही अप्रिहार्य
एक सूचना : काही अप्रिहार्य कारणांमुळे प्रशासकांनी धागा वाचलेला नाही.
(डोळे आलेत हे उघड करायचे नसल्याने तो उल्लेख टाळला आहे याची कृपया नोंद घेऊ नये)
मराठीची शिकवणी घेणार्या बाई
मराठीची शिकवणी घेणार्या बाई तयारच आहेत. वर्गात पुरेशी मुलं जमली की वर्ग सुरू होईल. त्या आधी चुकणार्या पोरांना एकेकटे पकडून धोपटले जाईल.
- दुसर्या एका धाग्यावरच्या हुकुमावरून.
मराठीत भाषांतर करा. पिछले साठ
मराठीत भाषांतर करा.
पिछले साठ साल मे ऐसा नही हुआ था जो अब हो रहा है
पंधरा दिनोंमे, सिर्फ पंधरा दिनोंमे मेरे बहनों और भईयों..
हमे सौ से भी ज्यादा पुरस्कार प्राप्त हुए है, और रुकने का नाम ही नही ले रहे, बढते ही जा रहे है, बढते ही जा रहे है ...
क्या कभी सुना था ऐसा ???
वैष्णवीताई, खरं खरं सांगा..
वैष्णवीताई,
खरं खरं सांगा.. हा धागा पण तूम्ही एक्स्पेरीमेंट म्ह्णून काढला होता कि नाही ? अगदी तूम्हाला अपेक्षित होत्या तश्याच पोस्टी पडल्या कि नाहीत ?
शिवाय काय आहे नं, काही लोकांचे जूनाट कंड आहेत. आग आग होते मग पाठी खाजवून घेतात. आणि मग कंड पसरतो हो. तरी बरं एक उकिर्डा गावाबाहेर बांधून दिलाय पण तिथली घाण सगळीकडे पसरवायला नव्याने भर्ती झालीय जणू.
काय आहे ना वाईट वाट्टं हो, माझ्या गेल्या अझार्बैजानच्या भेटीत एका हकिमांची पाटी दिसली होती. सगळ्या कंडांवर हमखास ईलाज करतात म्हणे. मी नेले असते हो पण या मेल्या विमानकंपन्या अर्ध्यापेक्षा खालचे तिकिटच देत नाही मुळी.
लगाव बत्ती !!
अरारारारारारा..... सौम्य
अरारारारारारा..... सौम्य वावराचा सौम्य गंध पसरला की ओ!
खावो खुजावो बत्ती बुझावो
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अब औकात पे आ गये ना?
तो घर जाके सो जावो!
खाओ खुजाओ बत्ती बुझाओ
खाओ खुजाओ बत्ती बुझाओ ...
तुम्ही न खाता न खाजवता उजेडातच करा.. कोण अडवलय ?
गप्पा गोड, मी काय रिकामटेकडी
गप्पा गोड, मी काय रिकामटेकडी नाही हो
आमचे हे यायची वेळ झाली. त्यांना सगळं कसं जागच्या कागी आणि व्यवस्थित लागतं.
भाजीसाठी आणलेली आणलेली गवार, गव्हाचं पीठ, ड्राय बाल्कनीमधे धुवायचे कपडे ते फ्रेश होईपर्यंत ठेवले ना कि
आमचे हे पाच मिनिटात गवार चिरून मीठ मसाला टाकून गॅसवर ठेवतात, कपडे वॉशिंग मशीन मधे टाकतात आणि भाजी होईपर्यंत तांदूळ निवडून कुकर लावून कणीक तिंबून पोळ्या बनवून ठेवतात.
हे काय, आलेच वाटतं...
तरी बरं एक उकिर्डा गावाबाहेर
तरी बरं एक उकिर्डा गावाबाहेर बांधून दिलाय पण तिथली घाण सगळीकडे पसरवायला नव्याने भर्ती झालीय जणू.<<
या वाक्याचा अर्थ काय आहे?
गावा बाहेर?
कोण कोणाला काय म्हणतय ते एका
कोण कोणाला काय म्हणतय ते एका वाक्यात लिहा.
गाळलेल्या जागा भरा.
जोड्या लावा.
सन्दर्भासहीत स्पष्टीकरण लिहा.
( दिपान्जलीची पोस्ट उत्तम आहे- हे माझे मत आहे, तरी वरील प्रश्नान्ची उत्तरे लिवा वो बाप्पु- बाई)
दिनेशदा, नेम अचूक
दिनेशदा, नेम अचूक![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
स्कोर सेटलिंग चालू झालेले
स्कोर सेटलिंग चालू झालेले दिसतंय. धागा इग्नोर करायच्या लायकीचा झाला.
गावाबाहेर घरे बांधून देण्याची
गावाबाहेर घरे बांधून देण्याची मनोवृत्ती मंदार जोशींमध्ये असली तरी दिनेशदांमधे नसावी, असा होरा आहे.
तेव्हा, ...., ...ऽ..! व दिनेशदा, जरा उत्तर देणार का?
(No subject)
जुन्या लोकांची कंपूबाजी
जुन्या लोकांची कंपूबाजी परवडली, ते निदान लिहीत तरी बरे होते, भांडण/वादविवादातही एक दर्जा राखून होते
सध्या मात्र सगळाच उजेड आहे!
लिंकपिसाट मामा बैलवान 'नष्ट '
लिंकपिसाट मामा बैलवान 'नष्ट ' झाले काय? कितव्यांदा ?
नवीन अवतार कोणता?
भाऊंचा धक्का भाऊ तोरसकरांचे
भाऊंचा धक्का
भाऊ तोरसकरांचे पंखे असल्याने घेऊ शकतात असा आयडी.
माय्बोलि चे ' सत्यकथा'
माय्बोलि चे ' सत्यकथा' झालेले आहे. फक्त विचार्वन्त लेखकान साठी चे मासिक !
दुसरे यावर लेखन करने अत्यन्तकिच्कत्ट आहे. मी तर २ वर्शापुर्विच फारक्त घेत्ली. वैशाली ताई आपन ही तसेच करावे ही विनन्ती. साहित्यात आणि खेलात कम्पुस्शाही झाली दुद्ध नासते. असो.
दीपांजली, तुमची पोस्ट उत्तम
दीपांजली, तुमची पोस्ट उत्तम आहे.
मात्र
ज्या कंपुंमधे आपलं पटतं त्या बीबीज वर जा एवढाच काय तो उपाय आहे स्मित.
हे पाळायचे तर मा़झी पंचाईत होईल. मा़झे कुठेच पटत नाही, जिथे पटते तिथली चर्चा झेपत नाही.
म्हणून तर मग असल्या बीबीज वर येऊन उथळ व पांचट (!) लिहीत बसायचे. नाहीतर विचारप्रवर्तक, (वादाचे नवीन विषय) लिहायचे.
म्हणून तर मग असल्या बीबीज वर
म्हणून तर मग असल्या बीबीज वर येऊन उथळ व पांचट (!) लिहीत बसायचे. नाहीतर विचारप्रवर्तक, (वादाचे नवीन विषय) लिहायचे.>>>>> असच लिहीत रहा.:फिदी: म्हणजे या भान्डणामधून थोडी तरी करमणूक होईल. नाहीतरी एकमेकान्चे गालगुच्चे घेतल्याशिवाय दिवस सरत नाहीत मायबोलीकरान्चे.
लिंकपिसाट मामा बैलवान 'नष्ट '
लिंकपिसाट मामा बैलवान 'नष्ट ' झाले काय? कितव्यांदा ? नवीन अवतार कोणता? >> मामांना नविन अवतार प्राप्त झालेला आहे. योग्य समयी ते प्रकट होतीलच.
वरच्या प्रश्नाच माझ्या परीने
वरच्या प्रश्नाच माझ्या परीने उत्तर द्यायच झाल तर अशा मुद्दाम उचकावणार्या आय डी वर कारवाई करतच राहिल पाहिजे .
ताज उदाहरण ..
उगाच मटण चॉप्स अन बुंदीचे लाडू अशा सरळ चाललेल्या धाग्यावर जाऊन उगाच मांसाहार अन मांसाहारी लोकाना नाव ठेवण किंवा आपल्याच धाग्यावर "फराळ अन तोही शाकाहारी " अशा खवचट पोस्ट लिहून काय कन्स्ट्र्क्टिव्ह साध्य होणार असते ? हे फक्त अन फक्त उचकावणे नव्हे काय ?
मी स्वतःंमांसाहारी आहे . पण एखादा माणूस मांसाहार चांगला नाही म्हणत असेल तर मी समजू शकतो .
पण "कसली तुम्ही ई लोक मट्ण खाता" किंवा त्यावरही "कसली तुम्ही रानटी / असंस्कॄत लोक मटण खाता" अस म्हणाला तर माझी सटकते. एखाद्याच्या खाण्याबद्द्ल अनुद्गार काढ्णार्या व्यक्तीबद्द्ल माझ्या मनात काडीचाही आदर नाही . मग आता मी काही उलट सुलट बोललो तर मी चुकीचा कसा ?
जोवर तुम्ही उचकावणार्याला थांबवत नाही तोवर याला अंत नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
जाऊ दे . ९ दिवस दिवाळीची सुटी आहे . शुभ दिपावली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केदार सात्विक जेवण घेतात ना
केदार
सात्विक जेवण घेतात ना ते म्हणून मांसाहारी लोकांकडे जाऊन आपली रोजीरोटी कमावतायत. त्यात कमीपणा नाही हो!
जाऊ दे . ९ दिवस दिवाळीची सुटी
जाऊ दे . ९ दिवस दिवाळीची सुटी आहे . >>
देवा, नेमकं कुठे काम करता तुम्ही? आमच्या मुलांच्या शाळेलाही नाही इतकी सुटी!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शुभदीपावली !
अहो सातीजी , ९ दिवस सुटी
अहो सातीजी , ९ दिवस सुटी म्हणजे त्यात ३ दिवस रजा आहे. पण सलग ९ दिवस कितीतरी दिवसानी गावी जायला मिळतय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माय-बोली साम्राज्यम सर्वोत्तम
माय-बोली साम्राज्यम
सर्वोत्तम प्रचेयम
दिक्कालम आठेयं
जन येथे करती प्रणाम
खुशहाली वैभवशाली
समृद्धी निराळी
धन्य धन्य हो इथे प्रजा
धरतीचा तो स्वर्ग हा
मायबोलीची पताका
सदा असो गगनचुंबी
जालदेव संग गुगळदेव मिळुनी
स्वर्ग सिंहासनी विराजे
या पत्रामुळे आता नारायण धारप
या पत्रामुळे आता नारायण धारप यांच्या कथा वाचतांनाही हसू आवरणार नाही याची भीती वाटू लागलेली आहे.
इथल्या प्रत्येक आयडी त एक
इथल्या प्रत्येक आयडी त एक माणूस दडलेला आहे. फक्त तो जागा करण्याची आवश्यकता आहे.
प्रत्येक माणसात, एक जनावर
प्रत्येक माणसात, एक जनावर दडलेलं असतं. ते ड्युआयडीतून डोकावतं.
सर्च देताना अचानक समोर आलं.
सर्च देताना अचानक समोर आलं. मोठ्या उत्सुकतेने वाचले. विचारात पडले.
अस्सं झालं.
शेवटी प्रतिसाद वाचतांना
सर्च देताना अचानक समोर आलं.
सर्च देताना अचानक समोर आलं. मोठ्या उत्सुकतेने वाचले. विचारात पडले.
शेवटी प्रतिसाद वाचतांना Lol अस्सं झालं.
नवीन Submitted by कांदामुळा on 8 August, 2019 - 01:09
विचारात पडले. ???
प्रो फा ई ल मध्ये पुरुष असं लिहिलंय ना?
Pages