Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 12 June, 2014 - 11:02
प्रत्येक वट पौर्णिमेला मला
न चुकता फसलेला यम आठवतो
बायका किती वस्ताद असतात
मी मनात अधोरेखीत करतो
पुन्हा संसारात आणलेल्या
सत्यवानाची कीव करतो
भोग बाबा आता आपल्या
कर्माची फळ, मनात म्हणतो .
सात पावलात अडखळलेले
ते हजार संसार आठवतो
वडाचे तुकडे घेवून जाणाऱ्या,
सुत गुंडाळणाऱ्या बायकांना मानतो
जणू अट्टाहासाने स्वत:साठीच
केलेली जाहिरात मी पाहतो
किती केविलवाण्या असतात
काही प्रथा, का आपण पाळतो
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
मस्तं
मस्तं