फेव्हाकाँलचा जोड की सत्तेसाठी तडजोड?

Submitted by ashokkabade67@g... on 15 June, 2023 - 13:04

गेले दोन दिवस शींदे सेनेन दोन जाहिराती दिल्यात पहिली आक्रमक तर दुसरी शरणागती पत्करून दुरस्त केलेली पण या जाहिरातीवरून युती सरकारमधे अस्वस्थता पसरली आणि वादळही निर्माण केले जाहिरातीत राक्षसी महत्वाकांक्षेपोटी स्वताची नसलेली लोकप्रियता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण भाजपने जाहीररीत्या नाराजी व्यक्त करताच होणाऱ्या परिणामाची आणि खुर्चिच जाण्याची शक्यता लक्षात येताच सारवासारव करत तीच जाहिरात दुसऱ्या दिवशी दुरस्त करुन प्रसिद्ध करण्यात आलीखरतर हा भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न होतापण परिणाम समोर येताच आणि फडणवीसांनी हसून केलेल्या उपेक्षेन आणि दोन दिवस घातलेल्या बहिष्कारान शींदेगटाला उपरती झाली आणि मनोममिलनाचे नाटकं सुरू झालपण अद्यापही पोष्टरवार सुरूच आहे तरीही आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की जोड फेव्हाकाँलचा आहे पण खरतर ही सत्तेसाठी केलैली तडजोड आहे भाजप साठी मुंबई मनपा हे लक्ष आहे येनकेनप्रकारेण मनपा ताब्यात घेण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, त्यात शिंदेगटाची गरज आहे आणि शिंदेगटालाही हे माहीत आहे की भाजपची साथ सोडल्यास चाळीस पैकी चारही आमदार निवडून येणे कठीण आहेत्यामुळे युती टिकवणे ही मजबुरी आहे खरतर शींदेसेनेने केलेल हे धाडस शिंदेगटाला भविष्यात घातकच ठरणार आहे कारण गरज सरो वैद्य मरो ही भाजपची परंपरा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

प्रत्येक मोठ्या पक्षाला फुटण्याचा इतिहास आहे. बीजेपीही फुटली म्हणजे पक्ष तोच पण पाच नेत्यांना बाजूला सारून नवे नेते आले.

तुमच्या लेखातील मताशी संपूर्णपणे सहमत !
पण खूप वाईट वाटतंय हो .
उठा ला दाणकन अपटणाऱ्या शिंदे कडून जनतेचा भ्रमनिरास होईल अशी अपेक्षा नव्हती .
देव करो आणि यांची युती टिकून राहो Happy

<< कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की जोड फेव्हाकाँलचा आहे >>

------ फेविकॉल जोड हा दोन हत्तींमधे आहे... येथे जोड फुगलेला बेडूक - हत्ती यामधे आहे.

उदयजी पर तुमी ह्ये नाय सांगितल की हत्ती कोन नी बेडुक कोन त्येभी सांगुन टाका की राव.

जनतेत संभ्रम निर्माण करणे व प्रत्यक्षात अगदी पारंपरिक विरोधकांशीही मिलीभगत ठेवणे हे आजच्या अस्थिर व तत्वहीन राजकारणाचे सूत्र असावे. आता तर अशी अवस्था आहे की हे सगळे सत्तेसाठी होत आहे असेही म्हणण्यात अर्थ उरलेला नाही. जे सत्तेत नाहीत तेही मजबूत सत्ताकेंद्रे मुठीत बाळगून आहेत.

जनता एकमेकांचे गळे चिरायला उठली की झाले, एवढाच या सर्व नेत्यांचा उद्देश आहे. गेली कित्येक वर्षे सत्तेच्या आसपासही नसूनही चौतीस टक्के टोल कलेक्शन पदरी पाडून घेऊ शकणारे पक्ष महाराष्ट्रात आहेत. सत्तेत असण्यानेच काही विशिष्ट फायदे होऊ शकतात या धारणेला इंजिनाने केव्हाच पटरीबाहेर धुडकावले आहे.

'आमच्यात भांडणे आहेत' असा समज पसरवणे हेही एक राजकीय हत्यार ठरण्याचे दिवस आहेत.

<< उदयजी पर तुमी ह्ये नाय सांगितल की हत्ती कोन नी बेडुक कोन त्येभी सांगुन टाका की राव. >>
------
भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी बेडकाची उपमा दिली होती, " बेडूक किती फुगला तरी हत्ती होत नाही..."
भाजपा खासदाराला दोघांपैकी एक बेडूक वाटत असेल तर त्याला फेविकॉलने जोडणे अवघड आहे. फेविकॉलच्या जाहिरातीमधे हत्ती आहेत.
https://youtu.be/rscDWykqloE

शिंदे पण म्हणत आहेत, मी पुन्हा येणार.

<< जनतेत संभ्रम निर्माण करणे व प्रत्यक्षात अगदी पारंपरिक विरोधकांशीही मिलीभगत ठेवणे हे आजच्या अस्थिर व तत्वहीन राजकारणाचे सूत्र असावे. आता तर अशी अवस्था आहे की हे सगळे सत्तेसाठी होत आहे असेही म्हणण्यात अर्थ उरलेला नाही. जे सत्तेत नाहीत तेही मजबूत सत्ताकेंद्रे मुठीत बाळगून आहेत.
जनता एकमेकांचे गळे चिरायला उठली की झाले, एवढाच या सर्व नेत्यांचा उद्देश आहे. गेली कित्येक वर्षे सत्तेच्या आसपासही नसूनही चौतीस टक्के टोल कलेक्शन पदरी पाडून घेऊ शकणारे पक्ष महाराष्ट्रात आहेत. सत्तेत असण्यानेच काही विशिष्ट फायदे होऊ शकतात या धारणेला इंजिनाने केव्हाच पटरीबाहेर धुडकावले आहे.
'आमच्यात भांडणे आहेत' असा समज पसरवणे हेही एक राजकीय हत्यार ठरण्याचे दिवस आहेत.
Submitted by बेफ़िकीर on 16 June, 2023 - 09:42 >>

------- राजकारणांत कायम विरोधक /मित्र कुणी नसतो.

सत्तेच्या मोहापाई नारायण राणे यांच्या सारख्यांना पण गोंजारावे लागते, त्यांना जवळ करुन केंद्रात मंत्रीपद द्यावे लागते. त्या आधी नारायण राणे हे काँग्रेसमधे असतांना मोठे भ्रष्टाचारी होते, ED ने त्यांच्या विरुद्ध चौकशी चालवली होती. भाजपात गेले आणि चौकशी / फाईल काही काळासाठी बंद ठेवली आहे.

पुलवामा हल्ला याबद्दल राज ठाकरे यांनी जाहिर सभातून प्रश्न विचारले होते, " लाव रे व्हिडिओ... " ने तर लोक जागृत झाले असते. त्यांची ED/ CBI ने तब्बल ८ तास चौकशी चालवली होती, विरोध करण्यांतली हवाच काढली.

सत्ता स्वत: कडे ठेवणे भाजपाला किती महत्वाचे आहे हे दोन उदाहरणांत दिसते- स्पष्ट बहुमत नसतांनाही सत्तेमधे येण्यासाठी अजित पवारांच्या मदतीने (रे़कॉर्ड कमी काळासाठीचे) सरकार स्थापन करणे किंवा पुढे शिवसेनेला खिंडार पाडून शिंदे यांच्या सहाय्याने ED सरकार स्थापन करणे.
कुठेही तत्व दिसत नाही...

२०१४ नंतर, महाराष्ट्रात किती लोकांची ED/ CBI ने चौकशी केली आहे ? भाजपा प्रवेशानंतर ED चौकशी सुरुच राहिली असे एक तरी उदाहरण आहे का?

शुल्लक धार्मिक टिपण्णी वरून दिवसाढवळ्या गळे कापणाऱ्या विकृत जमातीची वकिली करणाऱ्यांना इडी , सी बी आय चे पक्षपातीपण दिसते , कमाल आहे !

त्या कंबोज ल पण सीबीआय नी क्लीन चिट दिली आहे.
किती तत्पर आहे सीबीआय.
सर्व मोक्याच्या ठिकाणी एक तर गुलाम वृत्तीचे किंवा गुजराती अधिकारी बसवून ठेवले आहेत.
..भारतीय प्रशासनिक व्यवस्थेचा पूर्ण खेल खंडोबा.
मोदी सरकार नी करून ठेवलेला आहेत.
त्या मुळे कमीत कमी pm पदावर तरी उच्च शिक्षित व्यक्ती असावा.
मनमोहन जी किंवा राहुलजी सारखा.

फुरोगामी, महाराष्ट्रात गोराक्षसांनी दिवसाढवळ्या एक मॉब लिंचिंग केलं. तुम्ही कसं सेलिब्रेट केलंत?

भरत , pissfully राक्षसांनी अमरावतीच्या उमेश कोल्हेचा सर तन से जुदा मोहीम मध्ये हत्या केली तेंव्हा तुम्ही कसे सेलिब्रेट केले जरा सांगा की !

भावनाशून्य मनमोहनजी पी एम पदासाठी योग्य उमेदवार हे मान्य !
पण राहुल ?
कैच्या काय !
तुम्हालाही बटाट्या पासून सोने बनवायचे आहे का ?

उबाठा च्या शिवसेनेतून अजून एक मोहरा गळून पडला !
शिशिर शिंदे ने पक्षात घुसमट होत असल्याचे कारण देवून उठा ला रामराम केला .

नेहरु संग्रहालयाचं नाव बदललं ते बघा ना! >>>>>>>
१५ पंतप्रधानांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नाव बदलले तर बिघडले कुठे ?
लेडी माउंटबॅटन ठेवले असते तर काँग्रेसची चिडचिड समजून घेता आली असती Happy

शिशिर शिंदे म्हणजे शिवसेना ते मनसे ते शिवसेना केलेला का ? आता फ20 चा गालगुच्छा घेणार।की मिंधेची दाढी कुरवळणार ते बघूया