Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिक्रेट रुममध्ये फिजिकल त्रास देणार्याला काढतात,माने आणि प्रसाद जे काही करत आहेत ते दुसर्याला मानसिक त्रास देण्यासाठी आहे.जो अँक्चुअली गेम आहे.
मग त्यांना त्या रुममध्ये ठेवून काय फायदा?
त्यापेक्षा एव्हिक्शन परवडल.
किंवा मर्डर मिस्ट्री किंवा नॉमिनेशन टास्क साठी ठेवल रुममध्ये तर .ठीक आहे.

Secret रूम मध्ये मानेच जाऊ शकतात कारण प्रसाद already safe आहे ...eviction झालं तर देशमुख घरी जाईल आणि secret room असेल तर माने जातील secret room मध्ये...यशश्री किती रागात बाहेर पडली ...खेळाडू आणि स्वातंत्र विचार करणारी म्हणून ती खूप चांगली होती...पण एक व्यक्ती म्हणून अजिबातच नाही आवडली...कोणाशीच तिची pure मैत्री दिसली नाही....बाकी मैत्रीच्या बाबतीत A ग्रुप जबरदस्त आहे....बरेच extraa shots पाहिले...नुसती धम्माल आणि full on enjoy चालू असतो त्यांचा....कालचा episode च्या सुरवातीचा washroom मधला सीन पण खूपच कॉमेडी होता...

Secret रूम मध्ये मानेच जाऊ शकतात कारण प्रसाद already safe आहे.....
काल ममांनी सांगितल की जे सेफ आहेत त्यांनी हुरळून जाऊ नका कारण रविवारी त्यांच्यातलाही अनसेफ होऊ.शकतो.आता हे सेफवाल्यांना घाबरवण्यासाठी आहे की नाही माहित नाही,पण जर अनसेफपैकीच असेल आणि एव्हिक्शन असेल तर देशमुख जाईल आणि जर नसेल तर मग माने सिक्रेटरुममध्ये जातील.पण त्याने फक्त विकासवर परिमाम होईल बाकीच्यांना काहीच फरक पडणार नाही.तेजु आणि धोंगडे फक्त रडतील ,पण विकासचा अख्खा गेम बदलू शकतो.

काल ममांनी सांगितल की जे सेफ आहेत त्यांनी हुरळून जाऊ नका कारण रविवारी त्यांच्यातलाही अनसेफ होऊ.शकतो>>> ओह, हे नव्हतं ऐकलं मी...

>>जर नसेल तर मग माने सिक्रेटरुममध्ये जातील.
मांजरेकरांनी हिंट दिली की काल जाता जाता की उद्याचे एव्हिक्शन नेहेमी पेक्षा वेगळे असेल म्हणून!!

सिक्रेट रुम तो बनता है ..... मानेच जातील बहुतेक कारण बाकीच्यांना पाठवून काहीएक फायदा नाही!!

काल अमृता देशमुख बिचारी वाटली..... तिच्या दोन्ही सो कॉल्ड मित्रांनी घरात राहण्यासाठी तितक्याश्या ठामपणे तिचे नाव घेतले नाही.... अक्षयने तर तेजस्विनीचेच नाव घेतले आणि प्रसाद नेहमीप्रमाणे कंफ्यूज राहिला

एक जोरदार वाईल्डकार्ड पाहिजेल जो सगळ्यांचाच गेम बदलून टाकेल!!

सिक्रेट रुम असेल तर मानेच गेलेले योग्य.

प्रसाद घरातच बरा कटकट करत इतरांना त्रास द्यायला. प्रसाद खरोखर कन्फुस्ड आहे की दाखवतो, सतत बातमीत राहण्यासाठी.

एक जोरदार वाईल्डकार्ड पाहिजेल जो सगळ्यांचाच गेम बदलून टाकेल!! >>> आधी परांजपेचं नाव यायचं आता मणीराजचं येतंय, त्यापेक्षा अधिश वैद्यला आणा.

रविवारचा एपिसोड का ठेवतात. बोअर करतात.

त्या विकासला हुशारीच्या प्रश्नाबद्द्ल काहीच समजलं नाही खरंतर, अपुर्वाला बोलाऊन फसला, गोल गोल घुमत राहीला, घुमवत राहीला .

अपुर्वा कित्ती ओरडते, कान किटले. मानेंना नीटही सांगू शकली असती. काही पंचेस छान मारते मात्र.

आपल्यापैकी बऱ्याच जणांचा अंदाज बरोबर, माने सीक्रेट रूममध्ये.

प्रोमो दाखवला उद्याचा. इथे अजून व्हायचं आहे.

अरे यशश्री गेली का ? मी हा सिझन बघत नाहीये पण ती आली तेव्हा मला वाटलेले कि ती पॉप्युलर आहे बाहेर, टॉप ५ पर्यंत जाईल. पण एकदा पाहिले तेव्हा काहीतरी विचित्र बोलत होती. त्यामुळे फनी वाटलेली.

Secret room मध्ये गेलेली व्यक्ती बाहेर येऊन घरातल्या लोकांशी संवाद साधत नाही...तर त्यांना शंका येत नाही का?

काल बॉटम ५ मध्ये ठेवताना प्रसादने रोहितला म्हटलं - तुझ्यामध्ये काय फॉल्ट्स आहेत ते मला माहीत नाही, पण तुला नक्कीच माहीत असणार.
वर स्वतःला बॉटम ५ मध्ये ठेवलं. याआधीही कोणीतरी असं केलं होतं आणि त्याची शाळा घेतली होती ना?

तर त्यांना शंका येत नाही का?.....
बहुतेक सगळ माहित असत त्यांना.कारण ममां घरात येऊन एव्हिक्शन करतात म्हणजेच काहीतरी ट्विस्ट आहे,हे मखहितच असत,आपल्याला अंदाज येतो त्यांना तर माहितच असणार.
म्हणूनच बरेच लोक म्हणत असावेत की हा स्क्रिप्टेड शो आहे.
आता या वेळेस तर नक्की वोटिंग लाईन्स बंद असतील कारण माने नाहीत रेसमध्ये या वीक मध्ये,आता नॉमिनेशन मध्ये मोस्टली बिबॉसला शेवटपर्यंत हवे असणारे पण वोटिंग कमी असणारे सदस्य असतील ,म्हणजे अपूर्वा, अक्षय,सम्रुध्दी. वगैरे.
हा सिझनच तसा फ्लॉप आहे,रंगतच नाही ,म्हणूनच आता बिबॉसने खेळायला सुरुवात केली.पहिला प्रयत्न-मानेंना खरतर विनाकारण सिक्रेटरुम.
मानेंना विकासच खररुप वगैरे दाखवण्याचा प्रयत्न.पण माने मँनिप्यलेट छान करतात .बाहेर आल्यावर अर्थात सिंपथी गेम खेळून,आधीसारख नाटक करून त्याला माफी वगैरे मागायला लावून जर परत पहिले पाढे पंच्चावन्न झाल तर बिबॉसच आपटेल.
मग दोघांपैकी एकाला काढाव लागेल.
त्यामुळे बिबॉसने प्लँन बी तयार ठेवावा.
यावर उत्तम उपाय म्हणजे दोन जबरदस्त वाईल्ड कार्ड पाठवून ,त्यांना तेराव्या आठवड्यापर्यंत ठेवण्याच ठरवून,अपूर्वा अक्षय यांचाही बाप ठरेल ,आणि संभाव्य विजेते वाटणार्यांनाही जरब बसेल,अश्या एंट्रीज करण.
नाहीतर बघ ,बसा तेच तेच टास्क देत.

म्हणूनच बरेच लोक म्हणत असावेत की हा स्क्रिप्टेड शो आहे.>>>जर हा show खरंच scripted असेल,तर रेशम टिपणीस,नेहा शितोळे,अपूर्वा सारखे नावाजलेले लोक स्वतः हून स्वतःच नाव खराब करून घेतील?
...अपूर्वा सारख्या गर्विष्ठ आणि कुणी काही बोललेले सहन न होणार्‍या मुलीला तर हे अजिबातच मान्य होणार नाही

अपूर्वा अक्षय यांचाही बाप ठरेल ,आणि संभाव्य विजेते वाटणार्यांनाही जरब बसेल,अश्या एंट्रीज करण.>>>असं काही ऐकलं की आदिशच आठवतो...

जर हा show खरंच scripted असेल,तर रेशम टिपणीस,नेहा शितोळे,अपूर्वा सारखे नावाजलेले लोक स्वतः हून स्वतःच नाव खराब करून घेतील......
याच कारण एकच.पैसापैसा आणि पैसा. हिंदीएवढा नसेल पण तरी बर्यापैकी पैसा मिळत असेल.नाहीतर कोण तयार होईल किंवा एखाद प्रोजेक्ट वगैरे.

Tya ruchira cha kahi kara baba.. aadhilasun mi tila insta war follow karat aahe..
Aata sagalya posts madhe Ruchira he karate ruchira te asa third party bolate rao...
#ruchirasays haa pahilyapasun hashtag aahe tichaa.. babare..

" Don't change urself for others #ruchirasays be urself" asala kahitari ..

Chakkar yenari bahuli

वीकेंड ची चावडी कसली बोअर केली यावेळी. गाण्याच्या भेंड्या वगैरे काय राव. ममां ना आरडाओरडा करु नका असा दम दिलेला दिसतोय चॅनेल ने किंवा त्यांच्या डॉक्टरांनी. खरतर या आठवड्यात खुप काही होतं बोलायला पण बोअर केलं. शनिवार तर बोअर होताच पण रविवार महाबोअर. कसले तेच तेच भंगार टास्क घेतात. चुगली मधे पण काही दम नाही. घरातले सदस्य समोरासमोर जे बोलतात एकमेकांना तेच चुगली म्हणुन पाठवलं तर काय अर्थ आहे. विकास ची चुगली म्हणजे आतापर्यंत ममांसकट सगळे जे त्याला सतत बोलत आलेत तेच वाक्य होतं. काहितरी नवीन द्याना Wink
आजकाल तिथले लोक एकमेकांबद्दल बोलताना पण म्हणतात, "हे चुगली मधे येउ शकतं पण येउदेत. मला नाही फरक पडत" हा हा हा.

यश गेली यात काहीच वाटलं नाही. जाणारच होती.
माने ना सिक्रेट रुम मधे टाकुन पण काय फायदा ते कळलं नाही. माने नसताना विकास अपुर्वा च्या मागे मागे करणार हे तर कोण पण सांगेल. आणि माने बाहेर आले की परत दाद्या सॉरी करुन त्यांना चिकटणार. या सगळ्यामधे टीआरपी कसा वाढवणार आहे चॅनेल ?
तसही ज्या पद्धतीने माने बाहेर पडलेत त्यावरुन आतल्यांनी लगेच ओळखले असणार की माने अजुन इथेच आहेत.
सगळ्यांना सगळा पॅटर्न माहिती झालाय तिथे त्यामुळे काहीच मजा येत नाहिये.

आज देशमुखच नॉमिनेशन चक्क बिबॉसने मानेंकडून करून घेतल.म्हणजे मानेंना सिक्रेटरुममध्ये घरातल्या लोकांचे खरे चेहरे पाहण्यासाठी नाही तर बिबॉसला मानेच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळता याव म्हणून टाकल आहे.
पण म्हणजे माने विनिंग रेसमधून गायब.कारण आज तेही खरतर बाहेरूनच गेम बघत आहेत आणि वोटिंग वाईन्स चालू असल्याने गेमही चालू आहे.
म्हणजे माने आठवा आठवडा तसा खेळणारच नाहीत.

आज देशमुखच नॉमिनेशन चक्क बिबॉसने मानेंकडून करून घेतल.म्हणजे मानेंना सिक्रेटरुममध्ये घरातल्या लोकांचे खरे चेहरे पाहण्यासाठी नाही तर बिबॉसला मानेच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळता याव म्हणून टाकल आहे. >>> खरोखर.

देशमुख जाईल बहुतेक आता.

प्रसाद नॉमिनेट व्हायला नको होता, चांगला खेळलेला. स्नेहलता व्हायला हवी होती.

म्हणजे कसं केलं?
मानेंनी सांगायचं आणि मग ते बिबॉ अनाऊंस करणार असं काही का? कारण माने सि.रु. मध्ये आहेत ते घरात माहित नाही (असं दाखवायचं तरी) आहे ना?

वारुळ आणि राणी मुंगी वगैरे काहीतरी फालतुपणा होता. राणी माशीने देशमुखला नॉमिनेट केलं असं बिग बॉसने सांगितलं. इथे राणी मुंगी म्हणजे माने. ट्वीस्टच्या नावाखाली काहीही खपवतात, हाहाहा. मी ही नीट बघितलं नाही पण मानेंना पॉवर दिली हे बघितलं, देशमुख नॉमिनेट झाली असती तर अशी पॉवर दिलीही नसती. बाकी माने खुश आहेत सिक्रेट रुम मधे.

ह्याची पाटी त्याच्या गळ्यात आणि मागच्या आठवड्यात नीट जे खेळले नाहीत त्यांना नॉमिनेट करायचे हा निकष होता, तो टास्क होता .

अपुर्वा, अक्षय, प्रसाद, रोहित, समृद्धी आणि देशमुख झाले बहुतेक नॉमीनेट.

इथे राणी माशी म्हणजे माने......
राणी मुंगी
खरण अचरटपणा आहे
खरतर नॉमिनेशन टास्क झाला होता,पण बिबॉसला देशमुख हवी होती,मग मानेंना पॉवर दिली बिबॉसने आणि त्यांना नॉमिनेट करायला सांगितल.मग काय आयत कोलीत मिळाल, त्यांनी देशमुखला नॉमिनेट केल आणि नॉमिनेट राणी मुंगीने केल अस सांगितल.
सदस्यांना वाटेल की वाईल्ड कार्ड येत आहे पण अक्षयसारख्या हुश्शार असलेल्या सदस्यांना नक्की मानेचा डाऊट येईल.
नॉमिनेटेड सदस्य.
अक्षय,अपूर्वा प्रसाद, सँम,रोहित आणि देशमुख.
मला रोहित जाईल अस वाटत आहे .

ओहह सॉरी सॉरी राणी मुंगी. करते एडिट.

अक्षयने तेजाला दिलेला शब्द पाळला. मला वाटलं त्याच्या अपूर्वाताईला तिने नॉमीनेट केलं म्हणून तो हिला करतो की काय, नाही केलं.

आरारा!
यातला रोहित सगळ्यात रिकामटेकडा आहे. घालवुन टाका त्याला.

आज तेजस्विनी पाहिल्याच फेरीत किती सोयीस्करपणे पलटली.... अपूर्वाला शब्द का दिला मग तिने?तेजस्विनीचा खेळ चांगला आहे...पण ती खूप स्वार्थी आहे,खूप जपून खेळतेय ..deplomatic आहे...असं सारखं वाटतं...mentally मात्र खूपच stable आहे ती...फक्त या टास्क वरुन तिला judge करत नाहिये...पण एकदोनदा असं जाणवलं... खरेतर विनर म्हणून सध्या तीच deserve करते..50 च दिवस झालेत...हळूहळू खरे रंग दिसतील...विशाल सुद्धा सुरुवातीला खूप आवडायचा...नंतर असा काही मनातून उतरला की अजूनही राग येतो त्याचा....

माने सिक्रेट रुम मधे आहेत हे तिथल्या काही हुशार लोकांना नीट कळले आहे असे काल बघताना वाटले. सगळे सावधपणे खेळत होते.
विकास ला अपुर्वा फारच आवडते असे त्याच्या चेहेर्‍यावरुन वाटते. काल च्या टास्क मधे तर त्याला अपुर्वा च्या मागे मागे करायला चान्स च मिळाला.
अपुर्वा फटकळ आसुदेत पण जे आहे ते तोंडावर बोलते मागुन कुचुकुचु करत बसत नाही हे मला कधीकधी आवडतं. पण तिचा माज नाही आवडत. तो थोडा कमी करायला हवा. काल चक्क माने म्हणाले की त्यांना अपुर्वा चांगली वाटायला लागली आहे म्हणुन.
नॉमिनेशन मधे स्नेहलता ला वाचवायचा का प्रयत्न करत होती ते मात्र कळले नाही.
तेजा मात्र काल नाही आवडली. मागे धोंगडे आणि विकास कोणीच कॅप्ट्न होउ शकले नाहीत तेव्हा पण मनातल्या मनात खुष झालेली असं वाटलं.
चांगुलपणा दाखवते पण आतुन एकदम पक्की आहे.
राणी मुंगी ने नॉमिनेट केले हे कळले तेव्हा अदे चा चेहेरा एकदम भारी झाला होता. हे काय झालं नक्की तिला कळलच नाही .. हा हा हा मजा आली बघताना.
काल गंमत म्हणून लाईव्ह बघत होते तेव्हा असं जाणंवलं की अपुर्वा एरव्ही घरात पण एकदम छान आनंदी असते. तिच्याच अवतीभवती चे सीन सतत दाखवत राहातात. मस्त दंगा करत असते, येता जाता सगळ्यांची खेचते, खाण्याची प्रचंड शौकीन दिसतेय. एकंदर मस्तमौला स्वभाव दिसतोय. कोणाशी गोड गोड बोलणं हिला जमेल की नाही शंकाच आहे त्यामुळे फटकळ पणा कमी होईल असे वाटत नाही. Happy

अपुर्वा एरव्ही घरात पण एकदम छान आनंदी असते. तिच्याच अवतीभवती चे सीन सतत दाखवत राहातात.>>हेच लिहायला आले होते....मस्त एन्टरटेनर आहे अपूर्वा...तिचा सेन्स ऑफ ह्यूमर पण भारी आहे ...आत्ताच विकास सोबतचा तिचा प्रोमो बघितला...खूपच मजा येते त्या दोघांचे सीन्स बघायला...मानेचं ज्या पद्धतीने एव्हीक्शन केलं त्यावरून ते सिक्रेट रूममध्ये असतील असा सगळ्यांनाच अंदाज आलाच असेल...काल विकास बोललासुद्धा दादा कुठे गेला नाही इथेच आहे वगैरे Lol नॉर्मल एव्हीक्शन करून मग सीक्रेट रूममध्ये ठेवायला पाहिजे होतं...तर खरी मजा आली असती...या आठवडय़ात व्होटिंग लाईन्स बंद ठेवायला पाहिजे होत्या....देशमुखला फारच विचित्र पद्धतीने नॉमिनेट केलं..काहीही म्हणजे काहीही चालू आहे...

Pages