आज उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला एक वर्ष झाले.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2020 - 02:54

हो, फेसबूक मेमरीच आली आहे तशी.
माझी पोस्ट होती पिझ्झा खात सेलिब्रेट करायची. तेव्हा त्यावर प्रतिक्रिया आलेल्या की चार-सहा महिन्यात ढोकळा खायची तयारी ठेव. हे पिझ्झा-वडापावचे नाते फार टिकणार नाही. पण टिकले. त्यांनी टिकवून दाखवले.

माझ्यामते याचे सर्वाधिक श्रेय श्री उद्धव ठाकरे यांना जाते.

या काळात सेनेच्या हिंदुत्ववादावर बरीच टिका झाली. या सरकारमध्येही सर्वात जास्त टिका उद्धव ठाकरेंनाच झेलावी लागली. जसे राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यावर होतात तसे ईमेज खराब करायचे वैयक्तिक हल्ले झाले. पण ते विशेष रिॲक्ट झालेच नाहीत. भारी संयम!

आता सरकार टिकवणे याबद्दल कसले कौतुक? ते तर केलेल्या कामांवरून झाले पाहिजे ना?

सहमत!

पण सध्याच्या कोरोनाच्या संकटात एक स्थिर सरकार देणे हे सुद्धा फार गरजेचे होते असे मला वाटते. ते जमवले याबद्दल अभिनंदन.

तळटीप - मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक नसून वरची फेसबूक पोस्ट विनोदाच्या अंगाने टाकलेली. जिला सर्व पक्षीय मित्रांनी लाईक केलेले. हा धागा मात्र विनोदाच्या अंगाने नसून प्रामाणिक मत आहे. येथील सर्वपक्षीय सभासदांनी आपले प्रामाणिक मत नोंदवावे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अहो तिकडे लोक्स उलटी मागणी करताहेत - पल्लार समाज काही वर्षांपासून अनुसूचित जाती /जमाती च्या यादीतून डिलिस्ट करायची मागणी करतोय. पुढे सरका, जग पुढं चाललय

ववृ, कोलांटौड्या तुम्ही मारताय... मान्य करा. मंडल आयोग येण्या आधीपासुन हे इंग्रजांच्या काळापासुन सरकारात चिकटलेले होते. मंडल आल्यावर जनता शाणी होइपर्यंत बोक्यांनी बरेच लोणी ओरपले अन आता ह्या लोण्याच्या गोळ्यात नवीन वाटेकरी आणावेच लागणार हे दिसल्याक्षणी उरलेले लोणीच मातीत ढकलुन दिले..

असो... तुम्ही मान्य केले नाहीतरी मनात कुठेतरी सत्य बोचत राहील.

१२ तारखेला काकाचा बड्डये ला म्हणे ८० हजार लोकांना नोकऱ्या देणार !
देव करो आणि काकांचा बड्ड्ये रोज येवो !

काकांसाठी बड्डे ग्रिटिंग स्पर्धा पण आहे. चला माबोकरांनो पटापटा भाग घ्या. पण ही स्पर्धा सर्वांकरता आहे की लहान मुलांकरता हे काही कळले नाही. काल सकाळी टिव्हीवर बातमी होती, पण पेपरवाल्याच्या ओरडण्याच्या आवाजात नीट ऐकली नाही. नंतर दिवसभर लाईट गेल्याने बातमी ओम फस्स झाली,.

खरे तर कविता/ काव्य वाचन / चारोळ्या/ एकोळ्या अश्या स्पर्धा लाईव्ह भरवाव्यात. परीक्षक म्हणून रामदास फुटाणे.

सही अंगठ्याने सात बारा कोरा, काकांच्या डोक्याला खुराक झाला

झटक्यात झाली नोटाबंदी, काकांच्या धंद्याला आली मंदी

अरे जिएसटीचा आलाय फेरा, काळा पैसा बी व्हईना गोरा

का काकांच्या मागे लागला होता, ईडीचा फेरा

अरारारारा अरारारा अरारारा खतरनाक ! काकांचा बड्डे ! काकांचा बड्डे ! काकांचा बड्डे टारणाणाव !

रश्मी.. Rofl Rofl Rofl Rofl

रश्मी सहीच Lol

पण यातला इडीचा मागचा फेरा मात्र कार्यकर्ते जागृती फेरा ठरला, त्याचा काकांना फायदा झाला, इथे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसरा पाऊस पावला.

सोनी चा वाढदिवस आणि international anti corruption day एकाच दिवशी ! ९ डिसेंबर .
कसला योगा योग !
Happy

Lol
शेवटी त्यांनी काँग्रेस ला एप्रिल फूल केलेच की !
खरं म्हणजे राहुल चा १ एप्रिल ला पाहिजे होता Happy

त्या कार शेड च्या जागेवरून पण वाद चालला होता , शेवटी कोर्टाने पुरावे मान्य करून ती जागा केंद्र सरकार ची असल्याचा निर्णय दिला !
यांना पूर्वी प्रमाण वाटले असेल जागेच्या मालकाला न विचारता वडापाव ची हातगाडी लावण्या इतकं सोप्प असेल .....

केंद्र सरकार मुंबईच्या जनते साठी जागा देऊ शकणार नाही का..? की मुंबई म्हणजे पाकिस्तान आहे जागा न द्यायला..?

फालतु बुलेट ट्रेन साठी महाराष्ट्राच्या बोकांडी हजारो करोडोंच्या भिका मागायला जमतंय अन मेट्रो साठी ८-१० एकर जमीन देऊ शकणार नाहीत का ते..?

अनाजी पंतुकड्याची पिलावळ उठुन महाराष्ट्र सरकार विरोधात कोर्टात गेली म्हणुन हा स्टे आला आहे.. तो फेब्रुवारी मधे उठेल. पण या सर्व प्रकारात मेट्रोच्या कामाल खीळ बसली त्यात नुकसान मुंबईकरांचेच अन पर्यायाने महाराष्ट्राचे होणार हे या पिलावळीच्या अन त्यांना साथ देणार्‍यांच्या गावीही नसावे याचे आश्चर्य वाटते.

ठाकरे म्हणजे बाळासाहेब हो, दुसरे म्हणजे राज ठाकरे. तर बाळासाहेब खूप स्पष्टवक्ते होते. बरं, या सोमवारचे चला हवा येऊ द्या कोणी पाहीले होते का?

अनाजी पंतुकड्याच्या पिलावळीला कंत्राट मिळाले आहे का उठ सुठ स्टे आणुन राज्याच्या विकासात खीळ घालण्यासाठी,..? Proud

यांच्या आबा-आज्ज्यापासुन हीच रीत आहे.. स्व-राज्याविषयी अत्यंत घृणा बाळगुन परकीयांचे आजन्म पाय चाटण्याची स्वप्ने बघत बसतात रा.डीचे. Biggrin

ठाकरे म्हणजे बाळासाहेब हो, दुसरे म्हणजे राज ठाकरे. तर बाळासाहेब खूप स्पष्टवक्ते होते. बरं, या सोमवारचे चला हवा येऊ द्या कोणी पाहीले होते का? >>>>>>
जाम खेचली हो उठा आणि संजू ची !
Lol
तो मुलाखतीचा कार्यक्रम लै बेस्ट झाला !
संजू ला दे धपाक ! धपक !!! रट्टे बसलेत
तरी ही सुधारणार नाही ......

अनाजी पंतुकड्याच्या सडेल पिलावळीकडुन स्व-राज्याचे हीत कधीच जोपासले जात नाही याचा नमुना त्याच्या प्रत्येक वंशजा कडुन वाचायला मिळत आहे..!! Biggrin

प्रविण डाळिंबकर एकदम पर्फेक्ट शोभतो संपादक म्हणून. Proud मागे भारत गणेशपुरे असायचा सेनापती म्हणून. पण सागरने मस्त रंग भरला.

सगळ्यात अवघड अवस्था होती रोहीत पवारची. बिचार्‍याला मोकळपेणाने हसता पण येईना सेनापतींच्या एंट्रीवर. Proud

डोक्याने चालण्याचे वांदे झाले म्हणुन मग इनोदी रंगमंचावर आली वाटते अनाजी पंतुकड्याची पिलावळ..! या या.. तिथेच शोभुन दिसता हो..!! Biggrin

बाय द वे, कालचा भाग बहुतेक झी ५ वर बघता येईल. कारण काल लाइट गेले नेमके. या वेळी त्यांनी राजकीय नेत्यांची तरुण पिढी बोलावली. नाहीतर मागे राणे, आठवले वगैरे येऊन गेलेच आहेत. काल केजरीवालची एंट्री झाली नी लाईट उडाले.

अरे एक सांगायचेच राहीले. काल आमच्या इथे मभआ चा एक कार्यकर्ता आला होता. तो मुळचा मावळ मधला आहे. त्याला आमच्या शेजारच्या बिल्डींग मधल्या मोहीते वहिनींच्या मामांनी डायरेक्ट प्रश्न केला की तुमचे सरकार समांतर चालले आहे का. त्याला वाटले की तिघाडी बद्दल विचारतायत. Uhoh तर मामा म्हणाले नाही, तसं नाही, पण बरेच लोक त्यांचे प्रश्न घेऊन उद्धव ऐवजी राज ठाकरेंकडे का जातायत. मग त्याची ट्युब पेटली. Proud तो म्हणाला राज साहेब आधीपासुनच लोकांची कामे करतात म्हणून असेल तसे.

दांडगं लक्ष असतं बुवा काही जणांचं... शेजारच्या बिल्डिंग मधल्या मोहिते वैनीच्या घरी कोण कोण आलं.. त्यातला मामा कोण आणि आगंतुक कोण. शिवाय आलेला आगंतुक कुणाचा कार्यकर्ता आहे.. कुठल्या गावचा आहे.. मोहिते बाइंच्या मामांनी त्या कार्यकर्त्याला काय काय विचारलं.. मग त्या कार्यकर्त्याची ट्युब पेटली की विझली अन मग त्याने काय काय उत्तरं दिली याची इत्यंभुत माहीती मिळत्ये बुवा..! Wink

सोसायटीला वॉचमन नसला तरी चालत असेल...

ओके.. म्हणजे १०५+१ = १०६ होतील... थेंबे थेंबे तळे साठवणार हं एक लब्बाड..!

Pages